शहरं
Join us  
Trending Stories
1
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
2
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
3
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
4
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
5
संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
6
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
7
लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?
8
इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर, विषारी पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, हजारो जण बाधित
9
DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली
10
आईशी भांडली, रागाने घराबाहेर पडली, नराधमाच्या तावडीत सापडली; तरुणीसोबत घडलं भयंकर
11
ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
12
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?
13
आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
14
कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू
15
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
16
"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
17
शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक
18
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
19
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
20
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

मोलकरणींपासून ते औद्योगिक क्षेत्र, सर्वांना कामगार कायद्याचे सुरक्षा कवच; पण नोंदणी आवश्यक

By साहेबराव हिवराळे | Updated: May 2, 2024 16:08 IST

कामगारांच्या यादीत मोलकरीण, घरगडी, मजूर, पानटपरीपासून ते गटई कामगार, शेतमजूर आणि गॅरेजवर काम करणाऱ्यांंचाही समावेश आहे.

छत्रपती संभाजीनगर : १ मे रोजी कामगार दिन हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येतो. औद्योगिक क्रांतीनंतर कामगारांचा छळ करणे, त्यांच्याकडून वेठबिगारी करून घेणे असे शोषणाचे प्रकार निदर्शनास आले होते. प्रतिदिवस आठ तास काम हक्कासाठी कामगार संघटनांकडून आंदोलने झाली. कामगार कायद्याचे सुरक्षा कवच केवळ नोंदणीकृत कामगारांना आहे. काही कायद्यांत काळानुरूप बदल झालेले आहेत.

कामगारांच्या यादीत मोलकरीण, घरगडी, मजूर, पानटपरीपासून ते गटई कामगार, शेतमजूर आणि गॅरेजवर काम करणाऱ्यांंचाही समावेश आहे. मात्र त्यासाठी नोंदणी करावी लागते. त्यांना विमा कवच देण्यात आलेले आहे. प्रतिवर्षी कामगार उपायुक्त कार्यालयात या कामगारांनी आपले कार्ड अपडेट करायला हवे. आता तर त्यांना घरकुल, मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती तसेच परदेशात उच्च शिक्षणाची संधी दिली जाते.

१ मे १९८६ रोजी अमेरिकेतील शिकागो येथे कामगारांच्या हक्कांसाठी एक मोठे आंदोलन झाले होते. घटनेत काही पोलिस आणि मजुरांचाही बळी गेला. या घटनेनंतर प्रशासनाने कामगार संघटनांची ८ तासांच्या कामाच्या वेळेची मागणी मान्य केली. या घटनेच्या स्मरणार्थ कामगार दिन साजरा करण्याचा विचार पुढे आला. भारतात १९२३ साली पहिल्यांदा तामिळनाडूमध्ये लेबर किसान पक्षाकडून कामगार दिन साजरा करण्यात आला होता. त्यानंतर भारतात सर्वत्र कामगार दिन साजरा करण्याची पद्धत प्रचलित झाली.

कामगार कायद्यात अडचण..कामगारांच्या कायद्यात उद्योग क्षेत्रात हळूहळू बदल करण्यात आले. कामाचे तासही वाढविले आहेत. आरोग्य सेवेसाठी आर्थिक भुर्दंड होत आहे. मेकॅनिक व गॅरेजवर काम करणाऱ्यांचाही विमा काढला पाहिजे.- सुरेश वाकडे, कामगार नेता

कामगारांना नियमानुसार विविध लाभ..कामगारांना कारखान्यात काम केल्यानंतर त्यांना पीएफ तसेच राज्य कामगार विमा योजनेकडून आरोग्य सेवा देखील कुटुंबाला मिळतात. महिलांना पगारी सुटी व आरोग्य सेवेचाही समावेश आहे. कामगारांनी आपल्या हक्कासाठी सजग राहावे.- जी. बी. बोरसे, सहायक आयुक्त

टॅग्स :AurangabadऔरंगाबादLabourकामगार