शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

फुकटच्या प्रसिध्दीची हौस भारी !

By admin | Updated: June 16, 2014 01:16 IST

प्रतिनिधी ल्ल उस्मानाबाद सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण करणे, हा कायद्यानुसार गुन्हा आहे.

प्रतिनिधी ल्ल उस्मानाबादसार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण करणे, हा कायद्यानुसार गुन्हा आहे. परंतु, उस्मानाबाद शहरातील विविध शासकीय कार्यालयाच्या संरक्षक भिंती, बसस्थानक आदी ठिकाणांकडे पाहता कुणालाही या कायद्याचा धाक राहिल्याचे दिसत नाही. त्यामुळेच फुकटच्या प्रसिध्दीसाठी विविध संस्था, संघटनांनी भिंती रंगवून पोस्टर, भित्तीपत्रके चिटकवून सार्वजनिक ठिकाणांची वाट लावल्याचे दिसत आहे.चौका-चौकात जाहिरातबाजी करण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने ठराविक शुल्क आकारून होर्र्टींग्ज उभारण्यासाठी रीतसर परवानगी देण्यात येते. परंतु, फुकटच्या प्रसिध्दीसाठी अनेक संस्था, संघटना छोट्या-छोट्या कार्यक्रमांचे, मेळावे आदींची जाहिरातबाजी ही अशा सार्वजनिक ठिकाणी असलेल्या संरक्षक भिंती, झाडे, रस्ता दुभाजक आदी ठिकाणी पोस्टर चिटकावून केली जात असल्याचे सर्रास दिसून येते. सार्वजनिक ठिकाणी कोणाचीही परवानगी न घेता पोस्टर किंवा पॉम्लेट चिटकावून किंवा तेथील भिंती रंगवून करण्यात येणाऱ्या या जाहिरातबाजीकडे प्रशासनही कानाडोळा करीत असल्याने यावर कुणाचाच अंकुश नसल्याचे दिसते. शहराचे विद्रुपीकरण थांबविण्यासाठी प्रशासनाने गांभिर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. झाडे होताहेत कमकुवतएकीकडे ‘झाडे लावा झाडे जगवा’ या ब्रिदातून शासन पर्यावरण रक्षणाचा संदेश देत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात पैसाही खर्च होत आहे. असे असतानाच दुसरीकडे मात्र काही जण केवळ जाहिरातबाजीसाठी झाडांना इजा पोहोचविण्यास मागेपुढे पाहत नसल्याचे दिसत आहे. शहरातील अनेक झाडांवर बिनदिक्कतपणे फलक ठोकल्याचेही दिसते. विशेषत: मुख्य रस्त्यांच्या झाडांचा यासाठी वापर होत असल्याचे दिसते. यामुळे झाडे कमकुवत होत असून, वन कायदा एवढा सक्षम असतानाही त्याचा कुणाला धाक नसल्याचेच यावरून दिसून येते. कायद्याची भीती कुणाला ?सार्वजनिक मालमत्तेच्या ठिकाणी म्हणजेच रस्त्याच्या कडेला व दुभाजकांवर तसेच शासकीय तथा निमशासकीय कार्यालये या ठिकाणी पोस्टर लावणे, भिंती रंगविणे हा महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा कलम ३ अन्वये गुन्हा आहे. या गुन्ह्यात दोन वर्षांची कैद आणि एक हजार रूपयांपर्यंतच्या दंडाचीही तरतूद आहे. शहरातील सार्वजनिक मालमत्तांवर नजर टाकल्यास या कायद्याची कुणालाही भीती राहिली नसल्याचे दिसून येते.