शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
2
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
3
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
4
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
5
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
6
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
7
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
8
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
9
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
10
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
11
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
12
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
13
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
14
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
15
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
16
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
17
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
18
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
19
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
20
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?

४ लाख विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके

By admin | Updated: May 29, 2014 00:52 IST

नांदेड : सर्व शिक्षा अभियानातंर्गत जिल्ह्यात जवळपास ४ लाख बालकांना मोफत पाठ्यपुस्तके मिळणार असून १४ तालुक्यांत पाठ्यपुस्तके पोहोचली आहेत़

नांदेड : सर्व शिक्षा अभियानातंर्गत जिल्ह्यात जवळपास ४ लाख बालकांना मोफत पाठ्यपुस्तके मिळणार असून १४ तालुक्यांत पाठ्यपुस्तके पोहोचली आहेत़ शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मिळतील याबाबत नियोजन केले जात आहे़ लातूर येथील बालभारतीतून पुस्तकांचा हा पुरवठा केला जात आहे़ सर्व शिक्षा अभियानांतर्गत अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येतात़ या अभियानांतर्गत वाटप करावयाची पुस्तके उपलब्ध होत आहेत़ जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये गटस्तरावर पुस्तके पोहोचली आहेत़ जिल्ह्यात इयत्ता पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांची संख्या २ लाख ४५ हजार ७५० आहे़ तर उच्च प्राथमिक गटातील इयत्ता ६ वी ते ८ वी तील विद्यार्थ्यांची संख्या १ लाख २८ हजार ७८३ आहे़ तसेच उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांची जिल्ह्यात एकूण संख्या ही १७ हजार २४० आहे़ त्यात पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची संख्या ही ११ हजार १६२ तर ६ वी ते ८ वी तील विद्यार्थ्यांची संख्या ६ हजार ७८ आहे़ जिल्ह्यात असलेल्या ४ मॉडेल स्कूलमधील विद्यार्थ्यांनाही या पाठ्यपुस्तक योजनेचा लाभ मिळणार आहे़ त्यात ६ ते ८ वी तील विद्यार्थ्यांची संख्या ही ४८० इतकी आहे़ जिल्ह्यात आजघडीला नांदेड तालुक्यात १ लाख ९ हजार २७४ पुस्तके प्राप्त झाली आहेत़ अर्धापूर तालुक्यात ८३ हजार ८२१, मुदखेड - ८८ हजार ७२५, लोहा - १ लाख १० हजार १५६, कंधार - १ लाख २८ हजार ७४०, देगलूर - १ लाख ६१ हजार २२५, नायगाव - १ लाख ७९ हजार ५८५, मुखेड - १ लाख ३ हजार ९४७, बिलोली - १ लाख १२ हजार ३७७, धर्माबाद - ९५ हजार ७५०, उमरी तालुक्यात ९६ हजार ७३८ पुस्तके आणि भोकर तालुक्यात १ लाख ५३ हजार ४८ पुस्तके उपलब्ध झाली आहेत़ उर्वरित चार तालुक्यांतही ३१ मे पर्यंत पुस्तके पोहोचणार असल्याची माहिती सर्व शिक्षा अभियान विभागातून देण्यात आली़ (प्रतिनिधी) शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके वाटप - कºहाळे जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये शाळा उघडण्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात येणार असल्याचीा माहिती जि़प़चे शिक्षण व बांधकाम सभापती संजय पाटील कºहाळे यांनी दिली़ याबाबत संबंधितांना सूचना दिल्या आहेत़ कामात हयगय करणार्‍यांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले़ मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत वाटप करावयाची बहुतांश विषयांची पुस्तके उपलब्ध झाली आहेत़ त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक सोय होणार असल्याचे कºहाळे म्हणाले़ शाळा प्रवेशासाठी पालकांची तारांबळ जिल्ह्यातील अनेक खाजगी शाळांमध्ये प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे़ या प्रवेश प्रक्रियेत पालकांची मोठी तारांबळ उडत आहे़ अनेक शाळांमध्ये पालकांना आपल्या पाल्यांना शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी रांगा लावाव्या लागत आहेत़ या प्रक्रियेदरम्यान पालकांची लूट होत असल्याची तक्रार मोठ्या प्रमाणात होत आहे़ याकडे शिक्षण विभागाला गंभीरतेने लक्ष द्यावे लागणार आहे़ त्यासह आरटीई कायद्याची अंमलबजावणी करण्यासही अनेक शाळांमध्ये हलगर्जीपणा केला जात आहे़