शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

४ लाख विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके

By admin | Updated: May 29, 2014 00:52 IST

नांदेड : सर्व शिक्षा अभियानातंर्गत जिल्ह्यात जवळपास ४ लाख बालकांना मोफत पाठ्यपुस्तके मिळणार असून १४ तालुक्यांत पाठ्यपुस्तके पोहोचली आहेत़

नांदेड : सर्व शिक्षा अभियानातंर्गत जिल्ह्यात जवळपास ४ लाख बालकांना मोफत पाठ्यपुस्तके मिळणार असून १४ तालुक्यांत पाठ्यपुस्तके पोहोचली आहेत़ शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मिळतील याबाबत नियोजन केले जात आहे़ लातूर येथील बालभारतीतून पुस्तकांचा हा पुरवठा केला जात आहे़ सर्व शिक्षा अभियानांतर्गत अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येतात़ या अभियानांतर्गत वाटप करावयाची पुस्तके उपलब्ध होत आहेत़ जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये गटस्तरावर पुस्तके पोहोचली आहेत़ जिल्ह्यात इयत्ता पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांची संख्या २ लाख ४५ हजार ७५० आहे़ तर उच्च प्राथमिक गटातील इयत्ता ६ वी ते ८ वी तील विद्यार्थ्यांची संख्या १ लाख २८ हजार ७८३ आहे़ तसेच उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांची जिल्ह्यात एकूण संख्या ही १७ हजार २४० आहे़ त्यात पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची संख्या ही ११ हजार १६२ तर ६ वी ते ८ वी तील विद्यार्थ्यांची संख्या ६ हजार ७८ आहे़ जिल्ह्यात असलेल्या ४ मॉडेल स्कूलमधील विद्यार्थ्यांनाही या पाठ्यपुस्तक योजनेचा लाभ मिळणार आहे़ त्यात ६ ते ८ वी तील विद्यार्थ्यांची संख्या ही ४८० इतकी आहे़ जिल्ह्यात आजघडीला नांदेड तालुक्यात १ लाख ९ हजार २७४ पुस्तके प्राप्त झाली आहेत़ अर्धापूर तालुक्यात ८३ हजार ८२१, मुदखेड - ८८ हजार ७२५, लोहा - १ लाख १० हजार १५६, कंधार - १ लाख २८ हजार ७४०, देगलूर - १ लाख ६१ हजार २२५, नायगाव - १ लाख ७९ हजार ५८५, मुखेड - १ लाख ३ हजार ९४७, बिलोली - १ लाख १२ हजार ३७७, धर्माबाद - ९५ हजार ७५०, उमरी तालुक्यात ९६ हजार ७३८ पुस्तके आणि भोकर तालुक्यात १ लाख ५३ हजार ४८ पुस्तके उपलब्ध झाली आहेत़ उर्वरित चार तालुक्यांतही ३१ मे पर्यंत पुस्तके पोहोचणार असल्याची माहिती सर्व शिक्षा अभियान विभागातून देण्यात आली़ (प्रतिनिधी) शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके वाटप - कºहाळे जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये शाळा उघडण्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात येणार असल्याचीा माहिती जि़प़चे शिक्षण व बांधकाम सभापती संजय पाटील कºहाळे यांनी दिली़ याबाबत संबंधितांना सूचना दिल्या आहेत़ कामात हयगय करणार्‍यांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले़ मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत वाटप करावयाची बहुतांश विषयांची पुस्तके उपलब्ध झाली आहेत़ त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक सोय होणार असल्याचे कºहाळे म्हणाले़ शाळा प्रवेशासाठी पालकांची तारांबळ जिल्ह्यातील अनेक खाजगी शाळांमध्ये प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे़ या प्रवेश प्रक्रियेत पालकांची मोठी तारांबळ उडत आहे़ अनेक शाळांमध्ये पालकांना आपल्या पाल्यांना शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी रांगा लावाव्या लागत आहेत़ या प्रक्रियेदरम्यान पालकांची लूट होत असल्याची तक्रार मोठ्या प्रमाणात होत आहे़ याकडे शिक्षण विभागाला गंभीरतेने लक्ष द्यावे लागणार आहे़ त्यासह आरटीई कायद्याची अंमलबजावणी करण्यासही अनेक शाळांमध्ये हलगर्जीपणा केला जात आहे़