शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मोफत बियाणे द्यावेत

By admin | Updated: May 8, 2016 23:47 IST

औसा : दुष्काळ निवारणासाठी शासनाचे प्रयत्न अपुरे पडत आहेत़ त्यामुळे शेतकरी होरपळत आहे़ गेल्या मोसमात पेरण्या झाल्या नाहीत़

औसा : दुष्काळ निवारणासाठी शासनाचे प्रयत्न अपुरे पडत आहेत़ त्यामुळे शेतकरी होरपळत आहे़ गेल्या मोसमात पेरण्या झाल्या नाहीत़ त्यामुळे आता शेतकऱ्यांकडे पेरण्या करण्यासाठी पैसा नाही, अशा परिस्थितीत शासनाने मोफत बी-बियाणे व खताचा पुरवठा करणे आवश्यक आहे, असे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी येथे रविवारी व्यक्त केले़औसा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने नगर परिषदेच्या मैदानावर रविवारी दुष्काळ परिषद झाली़ यावेळी ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते़ मंचावर माजीमंत्री आ़मधुकरराव चव्हाण, आ़बसवराज पाटील, आ़अमर राजुरकर, माजी आ़शिवाजीराव पाटील कव्हेकर, जि़प़अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर, प्रदीप राठी, जिल्हा काँग्रसचे अध्यक्ष व्यंकट बेद्रे, अशोकराव पाटील निलंगेकर, अप्पासाहेब पाटील, रामकिसन ओझा, अ‍ॅड़अस्मिता काटे, ज्योती पवार, सुलोचना बिदादा, अ‍ॅड़मुजीबोद्दीन पटेल, स्वयंप्रभा पाटील, निता सुर्यवंशी, अमर खानापूरे, पांडुरंग चेवले, कोमल सुर्यवंशी, नारायण लोखंडे, शरण पाटील, बिरबल देवकते, बसवराज धाराशिवे, प्रा़सचिन आलुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी अशोक चव्हाण म्हणाले, खरीप हंगामासाठी मोफत खत, बी-बियाणे सरकारने दिली पाहीजेत़ त्याच बरोबरच विद्यार्थ्यांची शुल्क, महामंडळाचे कर्ज माफ करून दावणीला चारा उपलब्ध करून दिला पाहीजे़ शेती मालाला हमीभाव देऊन कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार व बागायतदारांना ५० हजार रुपये अनुदान देण्यात यावे़ शेतकरी, शेतमजुरांना कायमस्वरुपी पेन्शन योजना लागू करावी़ पशुधनाचा विमा उतरविण्यात यावा असेही ते म्हणाले़ मराठवाड्यात मोठा दुष्काळ पडला आहे़ परंतू, देशाचे पंतप्रधान दुष्काळ पाहण्यासाठी आले नाहीत, पण त्यांना मराठवाड्यातील दुष्काळ दाखविण्याची गरज आहे़ आम्ही सत्तेत असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत सरकारवर ३०२ चा गुन्हा दाखल करण्याची भाषा करणारे आता सत्तेत आहेत़ त्यांना सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसत नाहीत़ यावेळी आत्महत्या केलेल्या १८ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० हजारांची मदत दिली. प्रास्ताविक आ़बसवराज पाटील यांनी केले़ यावेळी माजीमंत्री आ़मधुकर चव्हाण, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़व्यंकट बेद्रे, माजी आ़शिवाजीराव पाटील कव्हेकर, अशोकराव पाटील यांची भाषणे झाली़ (वार्ताहर)विलासराव देशमुख यांनी काहीच केले नाही, असे विरोधकांकडून शब्द वापरले जात आहेत़ मात्र विलासरावांनी मराठवाडा आणि महाराष्ट्राचा चौफेर विकास केला आहे़, हे विरोधकांना दिसत नाही़ स्वत:चे अपयश झाकण्यासाठी सत्ताधारी टीका करीत आहेत़ काँग्रेसची सत्ता असताना जिल्ह्या-जिल्ह्यात विकासकामे झाली़ परंतु, या दुष्काळावर राज्य शासन गंभीर नाही़ त्यांना सरकार चालविता येत नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काही पडेल, याची शक्यता नसल्याचे खा़चव्हाण यावेळी म्हणाले़