शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

मताधिक्याची शिवसेनेची परंपरा कायम

By admin | Updated: May 18, 2014 00:27 IST

लोकसभा निवडणुकीत वसमत विधानसभा मतदार संघातून आघाडीला भरपूर मताधिक्य राहिल, असे चित्र रंगवल्या जात होते.

लोकसभा निवडणुकीत वसमत विधानसभा मतदार संघातून आघाडीला भरपूर मताधिक्य राहिल, असे चित्र रंगवल्या जात होते. तालुक्यातील झाडून सर्व नेते शिवसेनेला पाडण्यासाठी सज्ज झाले असल्याचे चित्र निवडणुकीपर्यंतचे होते. मात्र निकालानंतर या विधानसभा मतदार संघात पुन्हा शिवसेनेलाच मताधिक्य मिळाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून या निकालाने तालुक्यातील राजकीय गणित गुंतागुंतीचे होवून बसल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसनेने खा. सुभाष वानखेडे यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने वसमत तालुक्यातील शिवसेनेच्या नेत्यांनी नाराजीचा सूर काढण्यास सुरू केली होती. शिवसेनेचे माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा व खा. सुभाष वानखेडे यांच्यातील विळ्या भोपळ्याचे सख्य सर्वश्रूतच होते. त्यामुळे मुंदडा गटाकडून वानखेडेंच्या प्रचाराकडे पाठ फिरवल्यागेली होती. वानखेडेच्या प्रचाराकडे शिवसेनेचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते उतरत नसल्याने वानखेडेच्या प्रचाराचा टेंम्पो अखेरपर्यंत तयारच झाला नव्हता. डॉ. मुंदडाची नाराजी वानखेडेला भोवणार हेच चित्र सुरुवातीपासून होते. त्यामुळे वानखेडेची बाजू कमजोर दिसत होती. वसमत तालुक्यात मतदारांनी वानखेडेंना नाही तर मोदींना मतदान केल्याचे निकालाने स्पष्ट केले. मोदींची लाट असतानाही शिवसेनेच्या काही पदाधिकार्‍यांनी शिवसेनेची मते आघाडीकडे वळवण्यात यश मिळवले. विशेषत: शहरातील शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातही आघाडीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाल्याचे धक्कादायक चित्र पहावयास मिळाले आणि या प्रकारामुळेच वानखेडेंना निसटत्या पराभवाचे तोंड पहावे लागले. डॉ. मुंदडाची नाराजी वानखेडेला भोवाल्याचीच प्रतिक्रिया सर्व सामान्यांतून व्यक्त होत आहे. पराभव झाला तरी वानखेडेंनी वसमत विधानसभा मतदारसंघात ९ हजार ९१ आघाडी घेवून सर्वच राजकीय नेत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. नेते कोणाकडेही गेले तरी मतदार आपल्या जागी कायमच असतात. हा धडाही या निकालाने पहावयास मिळाला. लोकसभा निकालाने वसमत विधानसभा मतदारसंघातील राजकीय गणित पूर्णपणे बिघडल्याचे चित्र आहे. माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांचे राजकीय भवितव्य काय असेल? हा प्रश्नही या निकालाने उभा राहिला आहे. सर्व शक्ती पणाला लावून व विरोधकही सोबत असताना ग्रामीण भागात शिवसेनेलाच आघाडी मिळाल्याने आ. जयप्रकाश दांडेगावकरांनाही हा धक्का समजला जात आहे. लोकसभेत चाललेले मराठा कार्ड पाहता विधानसभेत एखादा मराठा चेहरा समोर आला तर पुन्हा एकदा काटे की टक्कर पहावयास मिळू शकते. दोन्ही जयप्रकाशांसाठी समाधानाची बाजू अशी की, तालुक्यात तिसरा कोणी प्रबळ संभाव्य उमेदवार तयार नाही. त्यामुळे ते निर्धास्त असतात; परंतु लोकसभेच्या निकालाने मतदार राजा कोणालाही डोक्यावर घेवू शकतो. हा संदेश दिल्याने दोन्ही जयप्रकाश यांच्या चिंता वाढू शकतात.