शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षे उलटली तरी तपास शून्य

By admin | Updated: April 17, 2016 01:31 IST

औरंगाबाद : अख्ख्या औरंगाबादला हादरवून सोडणाऱ्या श्रुती विजय भागवत (४६) यांच्या खुनाचे गूढ उलगडण्यात तब्बल चार वर्षांनंतरही पोलिसांना यश आले नाही.

औरंगाबाद : अख्ख्या औरंगाबादला हादरवून सोडणाऱ्या श्रुती विजय भागवत (४६) यांच्या खुनाचे गूढ उलगडण्यात तब्बल चार वर्षांनंतरही पोलिसांना यश आले नाही. स्थानिक पोलीस अजूनही अंधारातच चाचपडत आहेत. अधिकृत नाही; पण अनधिकृतपणे पोलिसांनी या प्रकरणाची ‘फाईल’ जवळपास बंद केल्यासारखेच चित्र आहे. चार वर्षांमध्ये इंचभरही तपास पुढे न सरकल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांचा पोलिसांवरील विश्वास संपला आहे. त्यामुळे हे प्रकरण आता सीआयडीकडे सोपविण्याची मागणी श्रुती भागवत यांचे भाऊ मुकुल करंदीकर यांनी केली आहे.मुकुल करंदीकर (रा. अहमदाबाद, गुजरात) हे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेण्यासाठी औरंगाबादला आले आहेत. शनिवारी सायंकाळपर्यंत त्यांची पोलीस आयुक्तांशी भेट झाली नव्हती. १८ एप्रिल २०१२ रोजी उल्कानगरीतील श्रीनाथ अपार्टमेंटमध्ये तळमजल्यातील फ्लॅट क्रमांक १ मध्ये पहाटे ३.५० वाजता धूर निघत असल्याची माहिती जवाहरनगर पोलिसांना मिळाली होती. त्यावरून तत्कालीन पोलीस निरीक्षक एम.एस. वराडे यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तेव्हा श्रुती भागवत यांचा मृतदेह गादीत गुंडाळून पेटवून दिल्याचे स्पष्ट झाले होते. डोक्यात कुदळ, फावडे यासारख्या अवजाराने मारून त्यांचा निर्घृण खून करण्यात आला होता. खून आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरुवातीला पोलिसांनी पाच पथके तयार करून सर्व बाजूंनी तपास केला. दरोडा घालण्यासाठी आलेल्या चोरट्यांनीच खून केला असावा, असा अंदाज पोलिसांनी बांधला; परंतु घरातून काहीही चोरीला गेले नाही, असे तपासात उघड झाले होते. नंतर जवळच्याच कोणीतरी हा खून केला असावा, अशी शंकाही पोलीस खाजगीत वर्तवित होते; परंतु पोलिसांचे हात शेवटपर्यंत रिकामेच राहिले. पुढे या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. मात्र, त्यानंतरही पोलिसांना यश आले नाही. सुरुवातीला दीड ते दोन महिने पोलीस श्रुती भागवत यांच्या नातेवाईकांच्या संपर्कात होते. तपासातील कोणत्याही मुद्यांबाबत ते चर्चा करीत असत. मात्र, त्यानंतर अद्यापपर्यंत पोलिसांनी संपर्क साधला नाही. तपास सुरू आहे की नाही, याबाबत त्यांनी काहीही कळविले नाही. सध्या या प्रकरणाचा तपास नेमका कोणाकडे आहे याचीही माहिती आमच्याकडे नाही, अशी खंत करंदीकर यांनी बोलून दाखविली.