शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
7
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
8
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
9
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
10
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
11
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
12
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
13
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
14
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
15
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
16
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
17
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
18
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
19
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 

चार गावांचा पाणीप्रश्न गंभीर

By admin | Updated: October 28, 2014 00:57 IST

तेर : उस्मानाबाद शहरासह तेर, ढोकी, कसबे तडवळे आणि येडशी या चार गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या येथील तेरणा धरणात सद्यस्थितीत केवळ बारा टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने

तेर : उस्मानाबाद शहरासह तेर, ढोकी, कसबे तडवळे आणि येडशी या चार गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या येथील तेरणा धरणात सद्यस्थितीत केवळ बारा टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने या चार गावांचा पाणीप्रश्न गंभीर होत चालला आहे. येत्या काही दिवसांत या गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाला पर्यायी व्यवस्था करावी लागण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. येथील तेरणा नदीवरील तेरणा धरणातून तेर, ढोकी, तडवळा आणि येडशी या चार गावांना महाराष्ट्र जीवन प्राधीकरणामार्फत पाणीपुरवठा केला जातो. यातील तेर गावाची लोकसंख्या १२ हजार ४७१, ढोकीची १४ हजार, येडशीची १९ हजार तर तडवळ्याची लोकसंख्या वीस हजार आहे. यंदा धरण परिसारत अत्यल्प पाऊस झाल्यामुळे अपेक्षित पाणीसाठा होऊ शकलेला नाही. चार गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्राधीकरणाला दररोज ८० लाख लिटर पाण्याचा उपसा करावा लागतो. याशिवाय उस्मानाबाद शहरालाही याच धरणातून पाणीपुरवठा होतो. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा केवळ दोन महिने पुरू शकेल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे चारही गावांना जानेवारी महिन्यापासूनच पाणीटंचाईच्या झळा जाणवण्याची शक्यता निमारण झाली आहे. (वार्ताहर)तेर गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी सध्या ग्रामंचायतीचे दोन बोअर, तीन आड व दोन हातपंप या स्त्रोतांचा वापर केला जात आहे. या स्त्रोतांद्वारे गावाला सध्या तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असून, पुढील काळात खाजगी स्त्रोतांचे अधिग्रहण करून तेरवासियांची तहान भागविण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे. पाण्याचा अपव्यय४तेर गावाला अगोदरच तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना दुसरीकडे ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी जलवाहिनीला गळतीलागली असून, काही ठिकाणी वॉल्व्हमधून पाणी वाया जात असल्याचे दिसत आहे. याकडे लक्ष देऊन पाण्यचा अपव्यय थांबविण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.