शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
4
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
5
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
6
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
7
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
8
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
9
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
10
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
12
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
13
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
14
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
15
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
16
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
17
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
18
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
19
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
20
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा

कंधारात चार टन मासळीची विक्री

By admin | Updated: June 9, 2014 01:11 IST

कंधार : मृग नक्षत्राच्या दिवशी मासे खाण्याची मोठी परंपरा आहे़ राज्यासह परप्रांतातून आणलेली ४ टन मासळीची विक्री झाली़

कंधार : मृग नक्षत्राच्या दिवशी मासे खाण्याची मोठी परंपरा आहे़ राज्यासह परप्रांतातून आणलेली ४ टन मासळीची विक्री झाली़ हातोहात मासळी संपल्याने अनेकांचा हिरमोड झाला़ परंतु मिळणाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते़ त्यातून लाखोंची उलाढाल झाल्याची बाब समोर आली आहे़भारतीय संस्कृतीत अनेक परंपरा मोठ्या नेटाने पाळल्या जातात़ शेतकऱ्यांचे अन् व्यापाऱ्यांचे चांगले मुहूर्त भिन्न असतात़ शेतकरी गुढी- पाडव्याला नवीन वर्ष मानतो़ आणि सालगडी याच दिवशी करारबद्ध केले जातात़ पेरणीपूर्व मशागतीला जोमात सुरुवात केली जाते़ आपली कामे आटोपून शेतकरी मृग पावसाची प्रतीक्षा करतो़ बी-बियाणे, रासायनिक खताची खरेदी करून आकाशाकडे डोळे लावतो़ पर्जन्यमान चांगले व्हावे, अशी अपेक्षा करत निसर्गाला साकडे घातले जातात़मृग नक्षत्रापासून पावसाने योग्य हजेरी लावली तर पेरणी चांगली होते़ पिकांची योग्य वाढ होते़ शेती पिकांनी बहरली अन् पिकांचा उतारा चांगला येतो़ त्यात पिकाला योग्य भाव लागला की, शेतकऱ्यांची उन्नती होते़ यासाठी पावसाळा उत्तम राहणे बळीराजासह सर्वांच्याच हिताचे असते़ त्यासाठी निसर्गाला शेतकरी मृगनक्षत्रादिवशी पावसासाठी साकडे घालतो़ असा एक मतप्रवाह ग्रामीण भागात आजही रूढ आहे़ मृग नक्षत्राच्या दिवशी मासे सेवन केले की मनाजोगता पाऊस पावसाळ्यात पडतो़ त्यासाठी मोठी झुंबड खरेदीसाठी उडते़ मत्स्य व्यावसायिकांनी ८ जून रोजी नांदेड, बारूळ, पेठवडज, घागरदरा, जगतुंग समुद्र आदी ठिकाणाहून ४ टन मासे विक्रीसाठी आणले होते़ मासे कमी पडू नयेत म्हणून आंध्र प्रदेशातून ७० किलो मासे आणल्याचे समजले़ संकरीत व गावरान मासळीने मासळी बाजार गजबजला होता़ त्यात गावरान मासळी मरळ आणि वाबंटला प्रति किलो ३०० रुपये भाव होता़ बळव २६०, कतला १४०, रहू १४०, मिरगल १४०, कटरना २००, सुपरनस २६० रुपये प्रतिकिलो भाव होता़ तरीही अनेकांना मासे मिळाले नसल्याने हिरमोड झाला़ तरीही ४ टन मासळीवर हजारो जणांनी ताव मारला़ त्यातून लाखोंची उलाढाल झाली़ (वार्ताहर)मृग नक्षत्रादिवशी मासे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते़ त्यासाठी विविध जातीची मासे विक्रीसाठी आणली जातात़ अपुरा मासळी व्यवसाय राहू नये, यासाठी नांदेड, म्हैसा येथून मासे आणले होते. - शंकर गंदलवाड, राम गंदलवाड (मत्स्य व्यावसायिक)मासळीत मेद, चरबी कमी प्रमाणात असल्याने आरोग्याला लाभदायक आहे़ त्यात प्रथिने व व ई जीवनसत्व आहे़ बलवर्धक आहे़ त्यामुळे सेवन करणे आरोग्यास चांगले असते़ - डॉ़राजेश गुट्टे, (आयुर्वेदाचार्य, कंधार)