शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

कंधारात चार टन मासळीची विक्री

By admin | Updated: June 9, 2014 01:11 IST

कंधार : मृग नक्षत्राच्या दिवशी मासे खाण्याची मोठी परंपरा आहे़ राज्यासह परप्रांतातून आणलेली ४ टन मासळीची विक्री झाली़

कंधार : मृग नक्षत्राच्या दिवशी मासे खाण्याची मोठी परंपरा आहे़ राज्यासह परप्रांतातून आणलेली ४ टन मासळीची विक्री झाली़ हातोहात मासळी संपल्याने अनेकांचा हिरमोड झाला़ परंतु मिळणाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते़ त्यातून लाखोंची उलाढाल झाल्याची बाब समोर आली आहे़भारतीय संस्कृतीत अनेक परंपरा मोठ्या नेटाने पाळल्या जातात़ शेतकऱ्यांचे अन् व्यापाऱ्यांचे चांगले मुहूर्त भिन्न असतात़ शेतकरी गुढी- पाडव्याला नवीन वर्ष मानतो़ आणि सालगडी याच दिवशी करारबद्ध केले जातात़ पेरणीपूर्व मशागतीला जोमात सुरुवात केली जाते़ आपली कामे आटोपून शेतकरी मृग पावसाची प्रतीक्षा करतो़ बी-बियाणे, रासायनिक खताची खरेदी करून आकाशाकडे डोळे लावतो़ पर्जन्यमान चांगले व्हावे, अशी अपेक्षा करत निसर्गाला साकडे घातले जातात़मृग नक्षत्रापासून पावसाने योग्य हजेरी लावली तर पेरणी चांगली होते़ पिकांची योग्य वाढ होते़ शेती पिकांनी बहरली अन् पिकांचा उतारा चांगला येतो़ त्यात पिकाला योग्य भाव लागला की, शेतकऱ्यांची उन्नती होते़ यासाठी पावसाळा उत्तम राहणे बळीराजासह सर्वांच्याच हिताचे असते़ त्यासाठी निसर्गाला शेतकरी मृगनक्षत्रादिवशी पावसासाठी साकडे घालतो़ असा एक मतप्रवाह ग्रामीण भागात आजही रूढ आहे़ मृग नक्षत्राच्या दिवशी मासे सेवन केले की मनाजोगता पाऊस पावसाळ्यात पडतो़ त्यासाठी मोठी झुंबड खरेदीसाठी उडते़ मत्स्य व्यावसायिकांनी ८ जून रोजी नांदेड, बारूळ, पेठवडज, घागरदरा, जगतुंग समुद्र आदी ठिकाणाहून ४ टन मासे विक्रीसाठी आणले होते़ मासे कमी पडू नयेत म्हणून आंध्र प्रदेशातून ७० किलो मासे आणल्याचे समजले़ संकरीत व गावरान मासळीने मासळी बाजार गजबजला होता़ त्यात गावरान मासळी मरळ आणि वाबंटला प्रति किलो ३०० रुपये भाव होता़ बळव २६०, कतला १४०, रहू १४०, मिरगल १४०, कटरना २००, सुपरनस २६० रुपये प्रतिकिलो भाव होता़ तरीही अनेकांना मासे मिळाले नसल्याने हिरमोड झाला़ तरीही ४ टन मासळीवर हजारो जणांनी ताव मारला़ त्यातून लाखोंची उलाढाल झाली़ (वार्ताहर)मृग नक्षत्रादिवशी मासे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते़ त्यासाठी विविध जातीची मासे विक्रीसाठी आणली जातात़ अपुरा मासळी व्यवसाय राहू नये, यासाठी नांदेड, म्हैसा येथून मासे आणले होते. - शंकर गंदलवाड, राम गंदलवाड (मत्स्य व्यावसायिक)मासळीत मेद, चरबी कमी प्रमाणात असल्याने आरोग्याला लाभदायक आहे़ त्यात प्रथिने व व ई जीवनसत्व आहे़ बलवर्धक आहे़ त्यामुळे सेवन करणे आरोग्यास चांगले असते़ - डॉ़राजेश गुट्टे, (आयुर्वेदाचार्य, कंधार)