शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
2
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
3
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
4
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
5
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
6
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
7
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
8
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
9
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
10
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
11
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
12
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
13
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
14
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
15
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
16
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
17
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
18
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
19
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
20
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी

पोलिस भरतीसाठी साडेचार हजार उमेदवार

By admin | Updated: June 4, 2014 01:32 IST

उस्मानाबाद : येथे ६ जून पासून पोलिस भरती प्रक्रिया सुरू होत असून, यासाठी ४ हजार ६८१ उमेदवारांनी आवेदनपत्र भरली आहेत.

उस्मानाबाद : येथे ६ जून पासून पोलिस भरती प्रक्रिया सुरू होत असून, यासाठी ४ हजार ६८१ उमेदवारांनी आवेदनपत्र भरली आहेत. दरम्यान, ही भरती पूर्णपणे गुणवत्तेनुसारच होणार असून, कोणीही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले आहे. तसेच या भरती प्रक्रियेत गैरमार्गाचा अवलंब करणार्‍या उमेदवार व इतर इसमांविरूध्द कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिला आहे. येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर जिल्हा पोलिस दलातील पोलिस शिपायांच्या १४० पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. यासाठी ३ हजार ९८० पुरूष आणि ७०१ महिला उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या भरती प्रक्रियेदरम्यान समाजातील काही दलाल अगर तत्सम व्यक्ती उमेदवारांना भरतीचे खोटे आमिष दाखवून पोलिस खात्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांची ओळख असल्याचे सांगून उमेदवारांची फसवणूक करण्याची शक्यता असते. परंतु, भरतीची प्रत्येक प्रक्रिया पारदर्शक व शासकीय नियमानुसार काटेकोरपणे होणार आहे. यात कोणत्याही प्रकारची वशिलेबाजी, ओळखीला थारा राहणार नाही. त्यामुळे कोणाच्याही ओळखीला अथवा आमिषाला बळी पडू नये, असे त्यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी) भरती प्रक्रियेत दलालांवर पाळत ठेवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व गुप्तचर विभाग यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच जिल्हा पोलिस घटकातील गुप्तचर पथकेही नेमण्यात आलेली आहेत. कुठलाही गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितांवर तात्काळ कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. शिवाय गैरप्रकरात सामील होणार्‍या उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येईल, असा इशाराही अधीक्षक पाटील यांनी दिला आहे. कोणी आमिष दाखविल्यास येथे साथा संपर्क पोलिस भरतीसाठी आलेले उमेदवार किंवा त्यांच्या नातेवाईकांना कोणी भरतीसंदर्भात आमिष दाखवीत असेल तर अशा लोकांची माहिती दूरध्वनीवरूनही देता येईल. यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालय (०२४७२/२२७६२०), अपर पोलिस अधीक्षक (२२०२०), पोलिस उपअधीक्षक (२२७६२२), पोलिस नियंत्रण कक्ष (२२२७००, २२२९००) या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे. तसेच कोणी लाचेची मागणी करीत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. दररोज ७५० उमेदवार अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांपैकी दररोज ७५० उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी बोलाविण्यात येणार आहे. सर्व उमेदवारांनी आपल्या प्रोफाईलवरून कागदपत्र पडताळणी व शारीरिक चाचणीचा दिनांक व वेळ याची नियमितपणे खात्री करत जावी, असेही पोलिस अधीक्षकांनी कळविले आहे.