शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

एकाच रात्रीत चार घरफोड्या

By admin | Updated: June 1, 2014 00:27 IST

कुरूंदा : वसमत तालुक्यातील गिरगाव येथे ३० मे च्या रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत चार ठिकाणी घरफोडी केली.

कुरूंदा : वसमत तालुक्यातील गिरगाव येथे ३० मे च्या रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत चार ठिकाणी घरफोडी केली. यात अंदाजे पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला असून चोर्‍यांच्या या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, चार ठिकाणी चोरी होवूनही कुरूंदा ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली नाही. कुरूंदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या गिरगाव येथे मागील काही दिवसांपासून चोरटे सक्रिय झाले आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने ग्रामस्थ उकाड्यापासून बचावासाठी घराच्या छतावर, पत्र्यांवर झोपत आहेत. ही संधी साधून चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री १ ते ३ वाजेदरम्यान गिरगावात धुमाकूळ घातला. यामध्ये एका पाठोपाठ चार घरे फोडून सोन्याचे दागीने, रोख रक्कम व इतर साहित्य असा अंदाजे पाच लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. गिरगावातील देवीदास पांचाळ यांच्या घरातील सर्व सदस्य छतावर झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे समोरील दोन्ही दरवाजे तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर आलमारीचे कुलूप तोडून रोख १५ हजार रूपये व ९ तोळे वजनाचे सोने काढून केले. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा संभाजी सोनटक्के यांच्या घराकडे वळविले. सोनटक्के कुटुुंबिय लग्नासाठी बाहेरगावी गेलेले असताना ही चोरी झाली. यात चोरट्यांनी घरातील कपाट व सुटकेस मधील ५ ग्रॅम सोने, नगदी ५ हजार रूपये, लहान मुलांचे १८०० रुपये किंमतीचे बाजूबंद लंपास केले. तसेच बंडू दत्तराम सोनटक्के यांच्या घरातून नगदी ६०० रुपये तसेच डब्यामध्ये ठेवलेले पैसे व इतर साहित्य चोरून नेले. सिद्धरामआप्पा धर्मले यांच्या घरावरही चोरट्यांनी डल्ला मारला. दरम्यान, गिरगाव येथे रात्रीच्या वेळी भारनियमन सुरू असल्याने ग्रामस्थ छतावर, पत्र्यांवर झोपण्यासाठी जात आहेत. शुक्रवारी रात्री ज्या-ज्या ठिकाणी चोर्‍या झाल्या, त्या घरातील सदस्य गच्चीवर झोपलेले होते. एकाच रात्री चार ठिकाणी चोर्‍या झाल्यामुळे ग्रामस्थ व व्यापार्‍यांमध्ये भिती पसरली आहे. गिरगाव येथे चोरट्यांनी चार ठिकाणी घरफोडी केल्याची माहिती देवूनही पोलिस घटनास्थळी लवकर पोहोचले नाहीत. तसेच कुरूंदा ठाण्याचे पोलिस निरीक्षक नानासाहेब नागदरे यांनी शनिवारी सायंकाळपर्यंत गावास भेट दिली नव्हती. पोलिसांनी गिरगावातील चोर्‍यांचा प्रकार गंभीरतेने घेणे गरजेचे असताना त्याकडे साफ दुर्लंक्ष केल्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, गिरगावचे बीट जमादार बी.टी. केंद्रे यांनी चोरी झालेल्या ठिकाणची माहिती घेतली; परंतु शनिवारी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. चार चोरी झालेली असली तरी नेमका किती रुपयांचा ऐवज चोरीला गेला? याची माहिती पोलिसांनी दिली नाही. जमादार केंद्रे यांनी आपला मोबाईल बंद करून ठेवला होता. यासंदर्भात वसमतचे उपविभागीय पोलिस अधिकारी पियुष जगताप यांना विचारले असता, कुरूंदा ठाण्याचे पोनि नागदरे हिंगोली येथे मिटिंगसाठी गेले असून त्यांना गिंरगाव येथे जाण्यास सांगितले आहे. मिटींगहून परत आल्यावर ते गावास भेट देतील, असे त्यांनी सांगिंतले.(वार्ताहर)कुरूंदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या गिरगाव येथे मागील काही दिवसांपासून चोरटे सक्रिय झाले आहेत. शुक्रवारी रात्री गावातील चार ठिकाणी घरफोडी झाली आहे.उन्हाळ्याचे दिवस असल्याने ग्रामस्थ उकाड्यापासून बचावासाठी घराच्या छतावर, पत्र्यांवर झोपत आहेत. ही संधी साधून चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री १ ते ३ वाजेदरम्यान गिरगावात धुमाकूळ घातला. गिरगावात चोरट्यांनी चार ठिकाणी घरफोडी केल्याची माहिती देवूनही पोलिस घटनास्थळी लवकर पोहोचले नाहीत. तसेच कुरूंदा ठाण्याचे पोलिस निरीक्षक नानासाहेब नागदरे यांनी शनिवारी सायंकाळपर्यंत गावास भेट दिली नव्हती.