शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील चार मोठे प्रकल्प मृतसाठ्यातच

By admin | Updated: September 12, 2016 23:24 IST

औरंगाबाद : अपुऱ्या पावसामुळे सलग पाचव्या वर्षीही मराठवाड्यावर दुष्काळाचे ढग घोंगावू लागले आहेत. पावसाळ्याचे साडेतीन महिने उलटल्यानंतरही विभागात सरासरीच्या ७२ टक्केच पाऊस झाला आहे.

औरंगाबाद : अपुऱ्या पावसामुळे सलग पाचव्या वर्षीही मराठवाड्यावर दुष्काळाचे ढग घोंगावू लागले आहेत. पावसाळ्याचे साडेतीन महिने उलटल्यानंतरही विभागात सरासरीच्या ७२ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे विभागातील लहान मोठे तलाव, धरणे रिकामीच आहेत. विभागातील अकरा मोठ्या प्रकल्पांपैकी चार प्रकल्प मृतसाठ्यातूनही बाहेर येऊ शकलेले नाहीत. उर्वरित प्रकल्पांमध्ये सरासरी ३४ टक्केच पाणीसाठा आहे. मराठवाड्यात केवळ विष्णूपुरी हा एकच प्रकल्प शंभर टक्के भरला आहे.मराठवाड्यात गेल्या चार वर्षांपासून सातत्याने अपुरा पाऊस पडत आहे. त्यामुळे दरवर्षीच मराठवाडा विभाग दुष्काळात होरपळून निघत आहे. यंदा पावसाने चांगली सुरुवात केली; परंतु महिनाभरापासून पावसाने जवळपास पाठ फिरविली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील जलसाठ्यांमध्ये अजूनही पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. विभागात लहान, मध्यम आणि मोठे असे मिळून एकूण ८४३ प्रकल्प आहेत. याशिवाय गोदावरी, मांजरा आणि इतर नद्यांवर सुमारे ३९ बंधारे आहेत. या सर्वांची साठवण क्षमता ७२९९ दलघमी आहे. परंतु या धरणांमध्ये आतापर्यंत एकूण २५५० दलघमी म्हणजे ३४ टक्केच पाणीसाठा होऊ शकला आहे. ८२९ लघु प्रकल्पांमध्ये ३२ टक्के आणि ७५ मध्यम प्रकल्पांमध्ये २२ टक्के इतकाच पाणीसाठा आहे. जायकवाडीसह मराठवाड्यात एकूण अकरा मोठे प्रकल्प आहेत. त्यापैकी माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा आणि सिना कोळेगाव हे चार प्रकल्प अजूनही मृतसाठ्यातच आहेत. या धरणांच्या उपयुक्त साठ्यात थोडेही पाणी आलेले नाही. विभागात केवळ नांदेड जिल्ह्यातील विष्णूपुरी हे एकमेव धरण शंभर टक्के भरले आहे. तर निम्न दुधना धरणात ७० टक्के, जायकवाडी धरणात ६४ टक्के, सिद्धेश्वर धरणात ३० टक्के, निम्न मनार धरणात १० टक्के, येलदरी धरणात ११ टक्के जलसाठा आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वात कमी पाऊसमराठवाड्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ७२ टक्केच पाऊस झाला आहे. त्यातही उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे केवळ ५२ टक्केच पाऊस झाला आहे. जालना जिल्ह्यात ७७ टक्के, हिंगोली ७२ टक्के, नांदेड ७१ टक्के, लातूर ७० टक्के, औरंगाबाद ६३ टक्के, परभणी ६० टक्के आणि बीड जिल्ह्यांत ५६ टक्केच पाऊस झाला आहे.