शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

मराठवाड्यातील चार मोठे प्रकल्प मृतसाठ्यातच

By admin | Updated: September 12, 2016 23:24 IST

औरंगाबाद : अपुऱ्या पावसामुळे सलग पाचव्या वर्षीही मराठवाड्यावर दुष्काळाचे ढग घोंगावू लागले आहेत. पावसाळ्याचे साडेतीन महिने उलटल्यानंतरही विभागात सरासरीच्या ७२ टक्केच पाऊस झाला आहे.

औरंगाबाद : अपुऱ्या पावसामुळे सलग पाचव्या वर्षीही मराठवाड्यावर दुष्काळाचे ढग घोंगावू लागले आहेत. पावसाळ्याचे साडेतीन महिने उलटल्यानंतरही विभागात सरासरीच्या ७२ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे विभागातील लहान मोठे तलाव, धरणे रिकामीच आहेत. विभागातील अकरा मोठ्या प्रकल्पांपैकी चार प्रकल्प मृतसाठ्यातूनही बाहेर येऊ शकलेले नाहीत. उर्वरित प्रकल्पांमध्ये सरासरी ३४ टक्केच पाणीसाठा आहे. मराठवाड्यात केवळ विष्णूपुरी हा एकच प्रकल्प शंभर टक्के भरला आहे.मराठवाड्यात गेल्या चार वर्षांपासून सातत्याने अपुरा पाऊस पडत आहे. त्यामुळे दरवर्षीच मराठवाडा विभाग दुष्काळात होरपळून निघत आहे. यंदा पावसाने चांगली सुरुवात केली; परंतु महिनाभरापासून पावसाने जवळपास पाठ फिरविली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील जलसाठ्यांमध्ये अजूनही पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. विभागात लहान, मध्यम आणि मोठे असे मिळून एकूण ८४३ प्रकल्प आहेत. याशिवाय गोदावरी, मांजरा आणि इतर नद्यांवर सुमारे ३९ बंधारे आहेत. या सर्वांची साठवण क्षमता ७२९९ दलघमी आहे. परंतु या धरणांमध्ये आतापर्यंत एकूण २५५० दलघमी म्हणजे ३४ टक्केच पाणीसाठा होऊ शकला आहे. ८२९ लघु प्रकल्पांमध्ये ३२ टक्के आणि ७५ मध्यम प्रकल्पांमध्ये २२ टक्के इतकाच पाणीसाठा आहे. जायकवाडीसह मराठवाड्यात एकूण अकरा मोठे प्रकल्प आहेत. त्यापैकी माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा आणि सिना कोळेगाव हे चार प्रकल्प अजूनही मृतसाठ्यातच आहेत. या धरणांच्या उपयुक्त साठ्यात थोडेही पाणी आलेले नाही. विभागात केवळ नांदेड जिल्ह्यातील विष्णूपुरी हे एकमेव धरण शंभर टक्के भरले आहे. तर निम्न दुधना धरणात ७० टक्के, जायकवाडी धरणात ६४ टक्के, सिद्धेश्वर धरणात ३० टक्के, निम्न मनार धरणात १० टक्के, येलदरी धरणात ११ टक्के जलसाठा आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वात कमी पाऊसमराठवाड्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ७२ टक्केच पाऊस झाला आहे. त्यातही उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे केवळ ५२ टक्केच पाऊस झाला आहे. जालना जिल्ह्यात ७७ टक्के, हिंगोली ७२ टक्के, नांदेड ७१ टक्के, लातूर ७० टक्के, औरंगाबाद ६३ टक्के, परभणी ६० टक्के आणि बीड जिल्ह्यांत ५६ टक्केच पाऊस झाला आहे.