शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

मराठवाड्यातील चार मोठे प्रकल्प मृतसाठ्यातच

By admin | Updated: September 12, 2016 23:24 IST

औरंगाबाद : अपुऱ्या पावसामुळे सलग पाचव्या वर्षीही मराठवाड्यावर दुष्काळाचे ढग घोंगावू लागले आहेत. पावसाळ्याचे साडेतीन महिने उलटल्यानंतरही विभागात सरासरीच्या ७२ टक्केच पाऊस झाला आहे.

औरंगाबाद : अपुऱ्या पावसामुळे सलग पाचव्या वर्षीही मराठवाड्यावर दुष्काळाचे ढग घोंगावू लागले आहेत. पावसाळ्याचे साडेतीन महिने उलटल्यानंतरही विभागात सरासरीच्या ७२ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे विभागातील लहान मोठे तलाव, धरणे रिकामीच आहेत. विभागातील अकरा मोठ्या प्रकल्पांपैकी चार प्रकल्प मृतसाठ्यातूनही बाहेर येऊ शकलेले नाहीत. उर्वरित प्रकल्पांमध्ये सरासरी ३४ टक्केच पाणीसाठा आहे. मराठवाड्यात केवळ विष्णूपुरी हा एकच प्रकल्प शंभर टक्के भरला आहे.मराठवाड्यात गेल्या चार वर्षांपासून सातत्याने अपुरा पाऊस पडत आहे. त्यामुळे दरवर्षीच मराठवाडा विभाग दुष्काळात होरपळून निघत आहे. यंदा पावसाने चांगली सुरुवात केली; परंतु महिनाभरापासून पावसाने जवळपास पाठ फिरविली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील जलसाठ्यांमध्ये अजूनही पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. विभागात लहान, मध्यम आणि मोठे असे मिळून एकूण ८४३ प्रकल्प आहेत. याशिवाय गोदावरी, मांजरा आणि इतर नद्यांवर सुमारे ३९ बंधारे आहेत. या सर्वांची साठवण क्षमता ७२९९ दलघमी आहे. परंतु या धरणांमध्ये आतापर्यंत एकूण २५५० दलघमी म्हणजे ३४ टक्केच पाणीसाठा होऊ शकला आहे. ८२९ लघु प्रकल्पांमध्ये ३२ टक्के आणि ७५ मध्यम प्रकल्पांमध्ये २२ टक्के इतकाच पाणीसाठा आहे. जायकवाडीसह मराठवाड्यात एकूण अकरा मोठे प्रकल्प आहेत. त्यापैकी माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा आणि सिना कोळेगाव हे चार प्रकल्प अजूनही मृतसाठ्यातच आहेत. या धरणांच्या उपयुक्त साठ्यात थोडेही पाणी आलेले नाही. विभागात केवळ नांदेड जिल्ह्यातील विष्णूपुरी हे एकमेव धरण शंभर टक्के भरले आहे. तर निम्न दुधना धरणात ७० टक्के, जायकवाडी धरणात ६४ टक्के, सिद्धेश्वर धरणात ३० टक्के, निम्न मनार धरणात १० टक्के, येलदरी धरणात ११ टक्के जलसाठा आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वात कमी पाऊसमराठवाड्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ७२ टक्केच पाऊस झाला आहे. त्यातही उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे केवळ ५२ टक्केच पाऊस झाला आहे. जालना जिल्ह्यात ७७ टक्के, हिंगोली ७२ टक्के, नांदेड ७१ टक्के, लातूर ७० टक्के, औरंगाबाद ६३ टक्के, परभणी ६० टक्के आणि बीड जिल्ह्यांत ५६ टक्केच पाऊस झाला आहे.