शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

दगडफेक चाळीस लाखांची

By admin | Updated: June 11, 2014 00:28 IST

विजय मुंडे , उस्मानाबाद कोणत्याही स्वरूपाचे आंदोलन असो प्रवाशांची ‘धमणी’ म्हणून धावणाऱ्या बसवर दगडफेक झालीच म्हणून समजा़

विजय मुंडे , उस्मानाबादकोणत्याही स्वरूपाचे आंदोलन असो प्रवाशांची ‘धमणी’ म्हणून धावणाऱ्या बसवर दगडफेक झालीच म्हणून समजा़ फेसबुक या सोशल मीडियावर महापुरूषांच्या छायाचित्रांची विटंबना झाल्याचा प्रकार घडला आणि दहा दिवसात उस्मानाबाद विभागाला तब्बल ४१ लाख, २६ हजार रूपयांचा फटका बसला़ प्रवाशांची झालेली हेळसांड वेगळीच! वारंवर होणारी आंदोलने आणि टार्गेट होणारी बस याबाबत ‘लोकमत’ने प्रवाशांसह वाहक, चालकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या़ त्यावेळी समोर आलेला मतप्रवाह ‘एसटी’ला टार्र्गेट करणाऱ्यांना विचार करायला लावणारा आहे़‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ ‘रस्ता तेथे एसटी’ हे ब्रीद घेवून काम करणारी बस प्रवाशांची ‘धमणी’ म्हणून ओळखली जाते़ प्रवासासाठी प्रवाशांची पहिली पसंत बसला आहे़ सर्वसामान्यांच्या सेवेसाठी असणारी ही बस मात्र, शेतकऱ्यांचा प्रश्न असो अथवा देव-देवता, महापुरूषांच्या विटंबनेचा प्रकार असो किंवा राजकीय आरोप-प्रत्यारोपातून, राजकीय मुद्यांवरून पेटणारे आंदोलन असो सर्वत्र बसला टार्गेट करण्याचा प्रकार गत अनेक वर्षांपासून सुरू आहे़ दगडफेक, जाळपोळ यामुळे महामंडळाचे मोठे नुकसान होतेच. शिवाय बसमधून प्रवास करणाऱ्या युवक, महिला, युवती, शालेय विद्यार्थ्यांसह वयोवृध्दांचे मोठे हाल होतात़ या आंदोलनात एखाद्या बसस्थानकावर प्रवासी ताटकळून थांबला तर खाण्या-पिण्याचे वांधे होतातच. शिवाय घरच्यांच्या काळजाचा ठेकाही चुकतो़ संबंधित व्यक्ती, मुलगा-मुलगी घरी येईपर्यंत अनेकांना चैन पडत नाही़ कोणत्याही आंदोलनात कार्यकर्त्यांनी बसवर दगडफेक केली म्हणून प्रश्न सुटतो असे होत नाही़ तरीही बसवर सुरू असलेली दगडफेक धोकादायक असून, याबाबत सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे़अबालवृध्दांसह महिलांचेही हालगत दहा ते बारा दिवसात एसटी महामंडळाचे सरासरी ५० लाख रूपयांचे नुकसान झाले आहे़ हे नुकसान भरून न येणारे असूून, फुटलेल्या काचाही बाजारपेठेत वेळेवर मिळत नाही़ शिवाय दगडफेकीमुळे बसेस कोणत्याही आगारात थांबवून ठेवण्यात येतात़ त्यामुळे प्रवाशांची होणारी हेळसांड ही वेगळीच आहे़ नुकसानीबाबत आम्ही पोलिसात तक्रार देण्यासह जिल्हाधिकारी कार्यालयालाही माहिती देवून बसच्या नुकसानीस जबाबदार असलेल्यांकडून भरपाईसाठी प्रयत्न करतो़ सर्वसामान्यांच्या सेवेसाठी असलेल्या बसवर दगडफेकीनंतर नुकसान होतेच शिवाय प्रवाशांचेही मोठे हाल होतात़ त्यामुळे आंदोलकांनी बसवर दगडफेक करू नये, असे आवाहन विभागीय अधिकारी नवनीत भानप यांनी केले़गत काही दिवसांपासून समाजकंटकांकडून सोशल मीडियावर महापुरूषांसह देव-देवतांच्या छायाचित्रांची विटंबना करण्याचा प्रकार सुरू आहे़ समाजा-समाजात तेढ निर्माण करून सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्याचे काम सुरू आहे़ त्यामुळे समाजकंटकांचे हेतू साध्य होवू न देण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे़ दगडफेक, बंदमुळे सर्वसामान्य नागरिकांनाच त्रास सोसावा लागतो़३३ बसेस फोडल्याफेसबुकवर महापुरूषांच्या छायाचित्रांची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ दहा दिवसात तब्बल ३३ बसेसवर दगडफेक झाली आहे़ यात बसच्या समोरील, पाठीमागील, खिडक्यांच्या काचा फुटल्याने ५ लाख,२६ हजार रूपयांचा फटका महामंडळाला बसला आहे़ या आंदोलनामुळे प्रवाशांच्या तिकीटातून उभारलेल्या एसटीचे नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांचे नुकसान झाल्याचे म्हटले जात आहे़बस फेऱ्यांची संख्या घटलीफेसबुक या सोशल मीडियावर महापुरूषांच्या छायाचित्रांची विटंबना झाली आणि क्षणातच बसवर दगडफेक सुरू झाली़ हा प्रकार सोमवारीही सुरू होता़ सातत्याने बसवर दगडफेक होवू लागल्याने महामंडळाकडून बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या़ बसफेऱ्या रद्द झाल्यामुळे उस्मानाबाद विभागाला तब्बल ३६ लाखांचे मोठे नुकसान सोसावे लागले आहे़नागरिकांचे हालपोलिस भरतीसाठी ६ जून पासून अंबेजोगाई येथील माझे अनेक मित्र पोलिस भरतीसाठी उस्मानाबाद येथे आले होते़ रविवारीही बसेस बंद असल्याने आमच्या गावच्या युवकांना इथेच थांबावे लागले़ बसवर दगडफेक करून काहीच निषपन्न होत नाही़ लोकशाही मार्गाने आंदोलन करणे योग्य असल्याचे मला वाटते, असे भरतीसाठी अंबाजोगाईहून आलेला युवक सुरेश चामनेर याने सांगितले़नेत्यांनी घ्यावी काळजी आंदोलनातील दगडफेकीमुळे मलाही प्रवासादरम्यान काही वेळा बसस्थानकावर अडकून थांबावे लागले आहे़ आंदोलन असो अथवा निषेध असो त्यावेळी नेत्यांनी कार्यकर्त्यांना बसवर व इतर वाहनावर दगडफेक करू नका, असे आवाहन करणे गरजेचे आहे़ दगडफेकीमुळे प्रवाशांचे अतोनात हाल होतात़ त्यामुळे नेत्यांनीच काळजी घ्यावी, असे मत उस्मानाबाद येथील बिभिषण जगदाळे यांनी व्यक्त केले़निष्पन्न काय होणार?बसवर दगडफेक केल्याने महामंडळाचे नुकसान तर होतेच शिवाय प्रवाशांची मोठी हेळसांड होते़ आपल्या कुटुंबातील एखादा व्यक्ती इतर ठिकाणी अडकून पडला तर अख्ख्या कुटुंबाला झोप येत नाही़ बसवर दगडफेक करून काहीच निषपन्न होणार नाही़ लोकशाही मार्गाने आंदोलने करून निषेध व्यक्त करणे कधीही चांगले असल्याचे उस्मानाबादेतील रहिवाशी हकीम शेख यांनी सांगितले़प्रचंड हेळसांड होतेयआंदोलनादरम्यान बसवरच दगडफेक करण्यात येत आहे़ दगडफेक होवू लागल्याने अनेक बसेस बंद करण्यात आल्या होत्या़ मी पुण्याहून नातेवाईकांच्या लग्नासाठी गावी आलो होतो़ येताना खूप हेळसांड झाली़ मी परत निघालो असून, अनेक ठिकाणी आंदोलन सुरू असल्याने जातानाही मला टप्प्या-टप्प्यानेच पुणे गाठावे लागणार असल्याचे धुत्ता येथील रामेश्वर पिंपरे यांनी सांगितले़प्रवाशांचे हाल होतातआंदोलनात दगडफेक झाल्यानंतर आम्हा वाहक-चालकांसह प्रवाशांचे मोठे हाल होतात़ एखाद्या गावात बस असेल तर वरिष्ठांच्या सूचनेनुसार पुढील आगारात नेवून बस थांबवावी लागते़ आंदोलन केव्हा थांबेल याचा पत्ता नसतो त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होतात़ त्यात सोबत कुटुंब आणि लहान मुले असणाऱ्यांची तर त्रेधातिरपट उडते, असे अनुभवाचे बोल वाहक आऱडी़माने यांनी व्यक्त केले़अडचणी निर्माण होतातआंदोलनादरम्यान बसवर दगडफेक झाली तर मोठ्या अडचणी निर्माण होतात़ बसच्या काचा फोडणे, जाळपोळ करण्याचे प्रकारही काही ठिकाणी घडले आहेत़ अशावेळी आम्हाला वरिष्ठांकडून मिळणाऱ्या सूचनेनुसार बस आगारात थांबवावी लागते़ त्यावेळी दूरवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे, विशेषत:बालके, वयोवृध्दांचे मोठे हाल होतात, असे चालक बी़व्हीग़ुरव यांनी सांगितले़