शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
3
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
4
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
5
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
6
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
7
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
8
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
9
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
10
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
11
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
13
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
14
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
15
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
16
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
17
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
18
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
19
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
20
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?

अक्षम्य दुर्लक्ष ! कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा आरोग्य यंत्रणेला पडला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 14:05 IST

No contact tracing in Aurangabad : एका बाधित रुग्णाच्या संपर्कातील किमान २० जणांची तपासणी करावी, असे निकष ठरविण्यात आले.

ठळक मुद्देकोरोना आजारामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हा नवीन प्रकार नागरिकांना कळाला. वर्षभरापूर्वी बाधित रुग्णांच्या घराजवळ महापालिकेकडून निर्जंतुकीकरण करण्यात येत होते. बाधितांच्या कुटुंबातील कोणाचीही तपासणी नाही

औरंगाबाद : वर्षभरापूर्वी बाधित आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील नातेवाइकांना, शेजारी, वसाहतीमधील नागरिकांना नेऊन कोरोनाची तपासणी करण्यात येत होती. आता तर एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आला तर त्याच्या कुटुंबातील सदस्यांची सुद्धा महापालिकेकडून तपासणी होत नाही. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हा प्रकार पूर्वीही होता आणि आजही कायम आहे. मात्र, महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेचे या प्रकाराकडे गंभीर दुर्लक्ष होत आहे. कोरोना संसर्ग वाढण्यास यामुळे मदत होत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वर्षभरापूर्वी बाधित रुग्णांच्या घराजवळ महापालिकेकडून निर्जंतुकीकरण करण्यात येत होते. कोरोना आजारामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हा नवीन प्रकार नागरिकांना कळाला. एका बाधित रुग्णाच्या संपर्कातील किमान २० जणांची तपासणी करावी, असे निकष ठरविण्यात आले. हे निकष आजही जशास तसे आहेत. मात्र, औरंगाबाद महापालिकेला याचा विसर पडला आहे. मागील काही दिवसांपासून महापालिकेने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हा प्रकार जवळपास बंदच करून टाकला आहे. रुग्णाच्या कुटुंबातील सदस्य घाबरून स्वतःहून तपासणी करून घेत आहेत. अनेकजण तपासणीच करीत नाहीत. बाधित आलेल्या प्रत्येक रुग्णाचा नंबर, पत्ता महापालिकेकडे असतो. मात्र, त्यांना तपासणीसाठी महापालिकेकडून सांगण्यात येत नाही. कुटुंबातील इतर सदस्य कोरोनाबाधित असू शकतात. त्यांना शोधून काढण्याचे काम महापालिकेकडून होत नाही.

मनपाकडून विचारणाही नाहीसिडको एन-८ भागातील ३८ वर्षीय तरुण बाधित आला. त्याच्या कुटुंबातील आणखी एक सदस्य नंतर बाधित आला. दोन्ही रुग्णांची संपूर्ण माहिती महापालिकेकडे होती. मात्र, मागील आठ दिवसांमध्ये महापालिकेने संबंधित रुग्णांना विचारलासुद्धा केलेली नाही. कुटुंबातील इतर सदस्यांची तपासणी झाली किंवा नाही हेसुद्धा विचारले नाही.

५ जणांचीही तपासणी नाहीएका बाधित रुग्णाच्या कुटुंबातील किमान पाच सदस्यांची तरी महापालिकेने दररोज तपासणी केली तर १५०० रुग्णांच्या संपर्कातील ७५०० जणांची तपासणी करावी लागेल. संपूर्ण शहरात दररोज तीन ते चार हजार जणांची तपासणी होत आहे. या सर्व तपासण्या नागरिक रांगा लावून करीत आहेत, हे विशेष.

रुग्णवाढीमुळे थोडेसे दुर्लक्षएका बाधित रुग्णाच्या संपर्कातील किमान तीन जणांची तरी तपासणी करण्याकडे महापालिकेचा कल आहे. तपासणीसाठी कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. दररोज दहा हजार नागरिकांच्या तपासणीचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवण्यात आले आहे. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील आणि आसपासच्या नागरिकांची तपासणी करण्यात येईल.- डॉ. बाळकृष्ण राठोडकर, प्रभारी आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद