शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

मध, डिंक, गोडंबीसह ‘वनधन’ पुन्हा मिळणार; बंद पडलेला उपक्रम लवकरच सुरू होणार

By साहेबराव हिवराळे | Updated: September 20, 2022 21:09 IST

वन विभागातील दोन वर्षांपूर्वी बंद पडलेले ‘वनधन’चे दुकान आता नव्याने सुरू होत असल्याने ‘वनधन’ शहरवासीयांसाठी उपलब्ध होईल.

औरंगाबाद : लॉकडाऊनच्या काळात बंद पडलेल्या 'वनधना'ची दुकाने पुन्हा बहरणार असून, दुर्मीळ ‘वनधन’ शहरवासीयांना मिळणार आहे. वनातील मध, डिंक, बिब्याच्या गोडंबीसह ‘वनधन’ रानभाज्याही शहरवासीयांना चाखता येणार आहेत. आरोग्यदायी ‘वनधन’ आणि रानभाज्या आता १२ महिने उपलब्ध होणार आहेत.

वन विभागाने ग्रामीण आणि वनक्षेत्रातील बचत गटाच्या हाताला काम, तसेच त्यांच्या श्रमाला मोल मिळावे यासाठी एका छताखाली हा उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला होता. लॉकडाऊनच्या काळात तो बंद पडला. त्यामुळे या दुकानाला टाळे लागले आणि शहरवासीयांची मोठी निराशा झाली होती.

कन्नड येथील बचत गटाला वन विभागाने दुकान उपलब्ध करून दिले. त्या दुकानाची सफाई तसेच पंचनामा करून ते ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या दसरा, दिवाळीत, तसेच एरव्ही बारा महिने वनधन उपलब्ध व्हावे, अशी शहरवासीयांचीही मोठी मागणी असल्याने बंद पडलेला उपक्रम सुरू होत आहे. वन क्षेत्रातील बचत गटाच्या महिलांना या उपक्रमाचा फायदाच होणार आहे. लवकरच शहरवासीयांना ‘वनधन’ मिळेल, असे वन परिक्षेत्र अधिकारी दादा तौर यांनी सांगितले.

रानभाज्या औषधी गुणधर्म असून, त्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. भाजी मंडईत कधी तरी उपलब्ध होतात. त्या कधी तरी आणल्यावर बनवायच्या कशा, याविषयी अनेक नव्या पिढीला माहीत नसते. त्यावरही येथे माहिती देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हिवाळ्यात आवर्जून प्रत्येक घरात काही विशिष्ट आरोग्यदायी खाद्यपदार्थ बनविले जातात. परंतु त्यासाठी लागणारे साहित्य हे पूर्णत: दर्जेदार व शुद्ध मिळेलच, याची हमी नसते. ते येथे मिळेल. यासोबतच खेड्यातील आणि वनक्षेत्रालगतच्या महिलांनाही शहरात बाजारपेठ मिळवून देण्याचा वनविभागाचा हा उपक्रम पुन्हा सुरू होत आहे.

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद