शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

विदेशी चलनाची उलाढाल ३० टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:02 IST

पर्यटन, शिक्षण, नोकरी आणि वैद्यकीय मदत या मुख्य कारणांमुळे औरंगाबादचे नागरिक परदेशात जातात आणि विदेशातील लोक औरंगाबादला येतात. परंतू ...

पर्यटन, शिक्षण, नोकरी आणि वैद्यकीय मदत या मुख्य कारणांमुळे औरंगाबादचे नागरिक परदेशात जातात आणि विदेशातील लोक औरंगाबादला येतात. परंतू आता कोरोनामुळे नोकरीनिमित्त बाहेरदेशात गेेलेल्या औरंगाबादकरांचे शहरात येणेही खूप कमी झाले आहे. शिक्षण आणि नोकरीनिमित्त काही लोकांनी आता बाहेर पडण्यास सुरूवात केली आहे, पण त्याचे प्रमाणही गतवर्षांच्या तूलनेत खूपच कमी आहे. शहरात येणारे विदेशी पर्यटक तर पुर्णपणे थांबले आहेत. या सगळ्याचा परिणाम विदेशी चलनाच्या देवाण- घेवाणीवर झाला असून हा व्यवसाय अवघ्या ३० टक्क्यांवर आला आहे.

याविषयी सांगताना संबंधित कंपनीचे अधिकारी म्हणाले की, सध्या औरंगाबादेतून बाहेर पडणारे लोक दुबई, अमेरिका, जर्मनी आणि मालदिव येथेच जात आहेत. यापैकी मालदिवचा पर्याय औरंगाबादकरांकडून पर्यटनासाठी निवडला जात आहे. पण मागील वर्षीच्या तुलनेत पर्यटनासाठी मालदीवला जाणाऱ्या औरंगाबादकरांचे प्रमाण अवघे १० ते १५ टक्केच आहे.

चौकट :

- विदेशी पर्यटक शहरात ५ ते ६ दिवस राहण्याच्या हिशेबाने येतात. याशिवाय त्यांची पैसे खर्च करण्याची मानसिकता आणि क्षमता भारतीय पर्यटकांपेक्षा खूप जास्त असते. याचा फायदा हॉटेल व्यावसायिकांपासून ते पर्यटन स्थळी असणाऱ्या फेरीवाल्यांपर्यंत सगळ्यांनाच व्हायचा. तो आता पूर्णपणे थांबलेला आहे.

- हिमरू शाल, मफलर, बेडसीट याप्रमाणेच हस्तकलेच्या वस्तूही विदेशी पर्यटकांकडूनच अधिक प्रमाणात घेतल्या जायच्या. या सगळ्या व्यवहारातून मोठ्या प्रमाणावर होणारी विदेशी चलनाची देवाण- घेवाण आता जवळपास ठप्प झाली आहे.