शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

विदेशी चलनाची उलाढाल ३० टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:02 IST

पर्यटन, शिक्षण, नोकरी आणि वैद्यकीय मदत या मुख्य कारणांमुळे औरंगाबादचे नागरिक परदेशात जातात आणि विदेशातील लोक औरंगाबादला येतात. परंतू ...

पर्यटन, शिक्षण, नोकरी आणि वैद्यकीय मदत या मुख्य कारणांमुळे औरंगाबादचे नागरिक परदेशात जातात आणि विदेशातील लोक औरंगाबादला येतात. परंतू आता कोरोनामुळे नोकरीनिमित्त बाहेरदेशात गेेलेल्या औरंगाबादकरांचे शहरात येणेही खूप कमी झाले आहे. शिक्षण आणि नोकरीनिमित्त काही लोकांनी आता बाहेर पडण्यास सुरूवात केली आहे, पण त्याचे प्रमाणही गतवर्षांच्या तूलनेत खूपच कमी आहे. शहरात येणारे विदेशी पर्यटक तर पुर्णपणे थांबले आहेत. या सगळ्याचा परिणाम विदेशी चलनाच्या देवाण- घेवाणीवर झाला असून हा व्यवसाय अवघ्या ३० टक्क्यांवर आला आहे.

याविषयी सांगताना संबंधित कंपनीचे अधिकारी म्हणाले की, सध्या औरंगाबादेतून बाहेर पडणारे लोक दुबई, अमेरिका, जर्मनी आणि मालदिव येथेच जात आहेत. यापैकी मालदिवचा पर्याय औरंगाबादकरांकडून पर्यटनासाठी निवडला जात आहे. पण मागील वर्षीच्या तुलनेत पर्यटनासाठी मालदीवला जाणाऱ्या औरंगाबादकरांचे प्रमाण अवघे १० ते १५ टक्केच आहे.

चौकट :

- विदेशी पर्यटक शहरात ५ ते ६ दिवस राहण्याच्या हिशेबाने येतात. याशिवाय त्यांची पैसे खर्च करण्याची मानसिकता आणि क्षमता भारतीय पर्यटकांपेक्षा खूप जास्त असते. याचा फायदा हॉटेल व्यावसायिकांपासून ते पर्यटन स्थळी असणाऱ्या फेरीवाल्यांपर्यंत सगळ्यांनाच व्हायचा. तो आता पूर्णपणे थांबलेला आहे.

- हिमरू शाल, मफलर, बेडसीट याप्रमाणेच हस्तकलेच्या वस्तूही विदेशी पर्यटकांकडूनच अधिक प्रमाणात घेतल्या जायच्या. या सगळ्या व्यवहारातून मोठ्या प्रमाणावर होणारी विदेशी चलनाची देवाण- घेवाण आता जवळपास ठप्प झाली आहे.