शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

कपाशीचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज

By admin | Updated: April 18, 2016 00:59 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात यंदा कपाशीच्या क्षेत्रात भरीव वाढ होण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात यंदा कपाशीच्या क्षेत्रात भरीव वाढ होण्याची शक्यता आहे. खरीप हंगामात कपाशीचे क्षेत्र ३० हजार हेक्टरने वाढून ४ लाख २५ हजार हेक्टरपर्यंत जाण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. गतवर्षी कमी पावसामुळे जिल्ह्यात खरिपाची उशिराने पेरणी झाली. त्यामुळे खरिपाचे क्षेत्र घटले होते. कपाशी, सोयाबीन, सूर्यफूल, तूर, मूग, उडीद अशा सर्व प्रकारच्या पिकांची मिळून एकूण ६ लाख ४९ हजार हेक्टरवर लागवड झाली होती. मात्र, यंदा हे क्षेत्र ८६ हजार हेक्टरने वाढविण्याचा अंदाज कृषी विभागाने खरीप हंगामाच्या अहवालात दर्शविला आहे. यामध्ये सर्वाधिक ३० हजार हेक्टर क्षेत्र हे कपाशीचे वाढणार असून, त्यापाठोपाठ बाजरी, मका यासारख्या तृणधान्याच्या क्षेत्रात १५ हजार हेक्टरची वाढ होणे अपेक्षित आहे. सोयाबीन, सूर्यफूल, भुईमूग यासारख्या तेलबियांचे क्षेत्र काही प्रमाणात वाढेल, असे कृषी विभागाने म्हटले आहे. मागील वर्षी जिल्ह्यात ३ लाख ९४ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली होती. यंदा हे क्षेत्र ४ लाख २५ हजार हेक्टर होणे अपेक्षित आहे. वैजापूर तालुक्यात सर्वाधिक ८७ हजार हेक्टर इतके कपाशीचे क्षेत्र राहील. तर कपाशीचे सर्वात कमी २४ हजार हेक्टर क्षेत्र हे सोयगाव तालुक्यात असेल. तृणधान्याचे क्षेत्र यंदा २ लाख १५ हजार हेक्टर आणि तेलबियांचे क्षेत्र २३ हजार हेक्टर होण्याचा अंदाज आहे.देशी कपाशीचे क्षेत्र ५० हजारजिल्ह्यात सर्वत्र बीटी कपाशीची लागवड होते. परंतु कृषी विभागाकडून यंदा देशी कापसाच्या वाणासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. जिल्ह्यात किमान ५० हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाच्या देशी वाणाची लागवड केली जाईल, असे कृषी विभागाने म्हटले आहे.