शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

नियमांचे पालन आता तरी करा ! १५ दिवसांत १८ वरून कोरोना रुग्णसंख्या अडीचशेच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 11:38 IST

रुग्णसंख्या वाढत असली तरी त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

ठळक मुद्दे गरजेनुसार कोविड सेंटरची संख्या वाढवली जाईल.ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही,

औरंगाबाद : पंधरा दिवसांपूर्वी कोरोना रुग्णसंख्या १८ होती, ती आता अडीचशेच्या घरात पोहचली असून, तपासणीचे प्रमाण वाढविले आहे. वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या असून, नागरिकांनी नियमांचे पालन करून दक्ष राहण्याचे आवाहन महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी केले.

सिडको येथील प्रियदर्शनी उद्यानात स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामाची पाहणी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केली. यावेळी त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर पाण्डेय म्हणाले की, शहरात हळूहळू कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा व महापालिका प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. शाळा, महाविद्यालये बंद केले आहेत. गर्दीच्या ठिकाणी जाऊन आरोग्य पथक तपासण्या करीत आहे. मास्क वापरण्यावर अधिक भर दिला असून, कडक कारवाई होत आहे. दररोज मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. नागरिकांना मास्क वापरणे, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग, हात स्वच्छ धुणे आदी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. या नियमांचे पालन केले तर शहरात कोरोना आटोक्यात येईल.

रुग्णसंख्या वाढत असली तरी त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. गरजेनुसार कोविड सेंटरची संख्या वाढवली जाईल. मागच्या वर्षी कोविडच्या काळात आलेले अनुभव लक्षात घेऊन ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, याचे नियोजन केले आहे. मेल्ट्रोन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लांट उभा केला जात आहे. महानगरपालिकेने विविध उपाययोजना हाती घेतल्या असून, कोणत्याही परिस्थितीत कोरोना रुग्णसंख्या वाढणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. मात्र, नागरिकांनीही तेवढीच काळजी घेणे गरजेचे आहे, असे पाण्डेय यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाSubhash Desaiसुभाष देसाई