शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

चारा,पाण्याचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: August 17, 2014 00:31 IST

हिंगोली : जिल्ह्यात चाराटंचाई निर्माण झाल्याने पशूपालकांनी जनावरांना कसायाच्या दावणीला बांधण्यास सुरूवात केली.

हिंगोली : पैशांपायी नगदी पिके घेण्याचा कल वाढल्यामुळे चारावर्गीय पिकांकडे साफ दुर्लक्ष झाले असताना यंदा पाऊस लांबला. परिणामी जिल्ह्यात चाराटंचाई निर्माण झाल्याने पशूपालकांनी जनावरांना कसायाच्या दावणीला बांधण्यास सुरूवात केली. शिवाय खरीप हंगामातही ज्वारी आणि मक्याचे क्षेत्र घटल्याने भविष्यात चाराटंचाईचा प्रश्न भेडसावणार आहे. दुसरीकडे पावसाळ्यात ३५ विंधन विहिरीचे प्रस्ताव आल्याने पाणी टंचाईने रौद्ररूप धारण करण्यास सुरूवात केली. परिणामी चारा व पाण्याच्या नियोजनासंदर्भात शनिवारी अप्पर जिल्हाधिकारी राम गगरानी यांनी बैठक घेतली. जिल्ह्यात दीड महिन्यांच्या उशिराने दाखल झालेल्या पावसात सातत्य नाही. अद्यापही एकही नदी, नाला, ओढा वाहिला नसल्याने चारा आणि पाणीटंचाईने डोके वर काढले. आजघडीला २ ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू असताना ३५ विंधन विहिरीचे प्रस्ताव आले आहेत. अद्याप पावसाळाही सरला नसताना धरणांत पुरेसे पाणी उपलब्ध नाही. पाणीपुरवठ्याच्या बहुतांश योजना बंद असताना काही ठिकाणी महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरलेला नाही. लवकर पाऊस न झाल्यास गावागावात पाणीटंचाईने ग्रामस्थांची भटकंती वाढेल. आजही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असताना चाऱ्यापायी पशूपालकांनी जनावरांना बाजार दाखवण्यास सुरूवात केली.गतवर्षी खरिपात अतिवृष्टी आणि रबी हंगामात अवकाळी पावसाने चाराच नष्ट झाल्याने यंदा चाराटंचाई उद्भवली. यंदाच्या खरीपात चारावर्गीय पिकांना उत्पादकांनी नाकारले. ४४ हजार ८९० पैकी १२ हजार हेक्टवर ज्वारी आणि केवळ १ हजार हेक्टर क्षेत्रावर मक्याची पेरणी झाली. या क्षेत्रावरील पिकांचा चारा साडेचार लाख जनावरांची भूक भागविणारा नाही. आताच चाराटंचाईने पशुपालक हैराण असताना भविष्यात जनावरांच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)