शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

चारा,पाण्याचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: August 17, 2014 00:31 IST

हिंगोली : जिल्ह्यात चाराटंचाई निर्माण झाल्याने पशूपालकांनी जनावरांना कसायाच्या दावणीला बांधण्यास सुरूवात केली.

हिंगोली : पैशांपायी नगदी पिके घेण्याचा कल वाढल्यामुळे चारावर्गीय पिकांकडे साफ दुर्लक्ष झाले असताना यंदा पाऊस लांबला. परिणामी जिल्ह्यात चाराटंचाई निर्माण झाल्याने पशूपालकांनी जनावरांना कसायाच्या दावणीला बांधण्यास सुरूवात केली. शिवाय खरीप हंगामातही ज्वारी आणि मक्याचे क्षेत्र घटल्याने भविष्यात चाराटंचाईचा प्रश्न भेडसावणार आहे. दुसरीकडे पावसाळ्यात ३५ विंधन विहिरीचे प्रस्ताव आल्याने पाणी टंचाईने रौद्ररूप धारण करण्यास सुरूवात केली. परिणामी चारा व पाण्याच्या नियोजनासंदर्भात शनिवारी अप्पर जिल्हाधिकारी राम गगरानी यांनी बैठक घेतली. जिल्ह्यात दीड महिन्यांच्या उशिराने दाखल झालेल्या पावसात सातत्य नाही. अद्यापही एकही नदी, नाला, ओढा वाहिला नसल्याने चारा आणि पाणीटंचाईने डोके वर काढले. आजघडीला २ ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू असताना ३५ विंधन विहिरीचे प्रस्ताव आले आहेत. अद्याप पावसाळाही सरला नसताना धरणांत पुरेसे पाणी उपलब्ध नाही. पाणीपुरवठ्याच्या बहुतांश योजना बंद असताना काही ठिकाणी महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरलेला नाही. लवकर पाऊस न झाल्यास गावागावात पाणीटंचाईने ग्रामस्थांची भटकंती वाढेल. आजही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असताना चाऱ्यापायी पशूपालकांनी जनावरांना बाजार दाखवण्यास सुरूवात केली.गतवर्षी खरिपात अतिवृष्टी आणि रबी हंगामात अवकाळी पावसाने चाराच नष्ट झाल्याने यंदा चाराटंचाई उद्भवली. यंदाच्या खरीपात चारावर्गीय पिकांना उत्पादकांनी नाकारले. ४४ हजार ८९० पैकी १२ हजार हेक्टवर ज्वारी आणि केवळ १ हजार हेक्टर क्षेत्रावर मक्याची पेरणी झाली. या क्षेत्रावरील पिकांचा चारा साडेचार लाख जनावरांची भूक भागविणारा नाही. आताच चाराटंचाईने पशुपालक हैराण असताना भविष्यात जनावरांच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)