शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

माळकोंडजीत चारा छावणीवरच पोळा

By admin | Updated: September 13, 2015 00:05 IST

रमेश शिंदे ,औसा बैलपोळा म्हटलं की, शेतकरी आपण ज्या बैलाच्या जीवावर शेती कसतो, त्या बैलाच्या कष्टातून ऋणमुक्त होण्याचा प्रयत्न करतो. पण यावर्षी पाऊसच न झाल्यामुळे

रमेश शिंदे ,औसा बैलपोळा म्हटलं की, शेतकरी आपण ज्या बैलाच्या जीवावर शेती कसतो, त्या बैलाच्या कष्टातून ऋणमुक्त होण्याचा प्रयत्न करतो. पण यावर्षी पाऊसच न झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पशुधन आज चारा छावणीवरच होते़ त्या शेतकऱ्यांनी पशुधनासह छावणीवरच मोठ्या उत्साहात पोळा साजरा केला. या सणाचा संपूर्ण खर्च छावणी चालविणाऱ्या माणदेशी फाउंडेशनने केला. पावसाळा सुरु होऊन तीन महिने संपले तरीही औसा तालुक्यात पाऊस झाला नव्हता. चाऱ्याअभावी पशुधनाची ससेहोलपट होत होती. जनावराच्या चाऱ्यासाठी शासनाने चारा छावण्या सुरु करण्याचा निर्णय घेतला. ३० आॅगस्टरोजी औसा तालुक्यातील माळकोंडजी येथे माणदेशी फाऊंडेशनने चारा छावणी सुरु केली. या चारा छावणीमध्ये सध्या ८८८ जनावरे आहेत. यात २५० बैल आहेत. चारा छावणी सुरु झाल्यानंतर माणदेशी फाउंडेशनने येथे शेतकऱ्यांना चारा, पाणी, पशुखाद्य आदी सुविधा पुरविल्या आहेत. बैल पोळा हा सण शेतकरी मोठ्या उत्साहात साजरा करातो. पण यावर्षी आर्थिकदृष्ट्या कोलमडून पडलेल्या शेतकऱ्यांना पोळ््याचा सण कसा साजरा करावा याची चिंता भेडसावत होती. मात्र त्यासाठी ही माणदेशी फाउंडेशन पुन्हा पुढे आली. आपलीच जनावरे समजून त्यांनी २५० बैलांना म्होरक्या, कंडे, शिंगासाठी रंग, बेगड यासह अन्य सजावटीचे साहित्य दिले. छावणीवरच वाजत-गाजत बैल पेळ््याचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यासंदर्भात बोलताना माणदेशी फाउंडेशनच्या कार्यकारी संचालक रेखा कुलकर्णी, छावणीचे प्रमुख रविंद्र वीरकर म्हणाले, आम्ही छावणी चालवतो म्हणजे येथील सर्वच पशुधन आमचे ही भावना ठेवून मुक्या जनावरांचा हा सण उत्साहात साजरा करायचा असे ठरविले आणि सणांसाठी लागणारा सर्व खर्चही फाउंडेशनने उचलला आहे. लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ त्यामुळे यंदा पोळा सण अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. सायंकाळी पूजेनंतर जिल्हाभरात ठिकठिकाणी झालेल्या पावसामुळे पशुपालकांसह बळीराजा सुखावला आहे. गत तीन वर्षांपासून सातत्याने लातूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे चारा-पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, पशुपालकांना पशुधन जगविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. परिणामी, दुष्काळाच्या कचाट्यात अडकलेल्या पशुपालकांना यंदा पोळा ‘रिन काढून सण’ करावा लागला. यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. यातून खरीप पीक पूर्णत: वाया गेले. परिणामी, पाण्यासह तीव्र चाराटंचाई जाणवत आहे.