शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

माळकोंडजीत चारा छावणीवरच पोळा

By admin | Updated: September 13, 2015 00:05 IST

रमेश शिंदे ,औसा बैलपोळा म्हटलं की, शेतकरी आपण ज्या बैलाच्या जीवावर शेती कसतो, त्या बैलाच्या कष्टातून ऋणमुक्त होण्याचा प्रयत्न करतो. पण यावर्षी पाऊसच न झाल्यामुळे

रमेश शिंदे ,औसा बैलपोळा म्हटलं की, शेतकरी आपण ज्या बैलाच्या जीवावर शेती कसतो, त्या बैलाच्या कष्टातून ऋणमुक्त होण्याचा प्रयत्न करतो. पण यावर्षी पाऊसच न झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पशुधन आज चारा छावणीवरच होते़ त्या शेतकऱ्यांनी पशुधनासह छावणीवरच मोठ्या उत्साहात पोळा साजरा केला. या सणाचा संपूर्ण खर्च छावणी चालविणाऱ्या माणदेशी फाउंडेशनने केला. पावसाळा सुरु होऊन तीन महिने संपले तरीही औसा तालुक्यात पाऊस झाला नव्हता. चाऱ्याअभावी पशुधनाची ससेहोलपट होत होती. जनावराच्या चाऱ्यासाठी शासनाने चारा छावण्या सुरु करण्याचा निर्णय घेतला. ३० आॅगस्टरोजी औसा तालुक्यातील माळकोंडजी येथे माणदेशी फाऊंडेशनने चारा छावणी सुरु केली. या चारा छावणीमध्ये सध्या ८८८ जनावरे आहेत. यात २५० बैल आहेत. चारा छावणी सुरु झाल्यानंतर माणदेशी फाउंडेशनने येथे शेतकऱ्यांना चारा, पाणी, पशुखाद्य आदी सुविधा पुरविल्या आहेत. बैल पोळा हा सण शेतकरी मोठ्या उत्साहात साजरा करातो. पण यावर्षी आर्थिकदृष्ट्या कोलमडून पडलेल्या शेतकऱ्यांना पोळ््याचा सण कसा साजरा करावा याची चिंता भेडसावत होती. मात्र त्यासाठी ही माणदेशी फाउंडेशन पुन्हा पुढे आली. आपलीच जनावरे समजून त्यांनी २५० बैलांना म्होरक्या, कंडे, शिंगासाठी रंग, बेगड यासह अन्य सजावटीचे साहित्य दिले. छावणीवरच वाजत-गाजत बैल पेळ््याचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यासंदर्भात बोलताना माणदेशी फाउंडेशनच्या कार्यकारी संचालक रेखा कुलकर्णी, छावणीचे प्रमुख रविंद्र वीरकर म्हणाले, आम्ही छावणी चालवतो म्हणजे येथील सर्वच पशुधन आमचे ही भावना ठेवून मुक्या जनावरांचा हा सण उत्साहात साजरा करायचा असे ठरविले आणि सणांसाठी लागणारा सर्व खर्चही फाउंडेशनने उचलला आहे. लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ त्यामुळे यंदा पोळा सण अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. सायंकाळी पूजेनंतर जिल्हाभरात ठिकठिकाणी झालेल्या पावसामुळे पशुपालकांसह बळीराजा सुखावला आहे. गत तीन वर्षांपासून सातत्याने लातूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे चारा-पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, पशुपालकांना पशुधन जगविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. परिणामी, दुष्काळाच्या कचाट्यात अडकलेल्या पशुपालकांना यंदा पोळा ‘रिन काढून सण’ करावा लागला. यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. यातून खरीप पीक पूर्णत: वाया गेले. परिणामी, पाण्यासह तीव्र चाराटंचाई जाणवत आहे.