शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

फूल तो अब भी खिलते हैं; खुशबू तेरे साथ गयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 12:26 IST

औरंगाबादचे भूषण, शायर बशर नवाज यांचा आज चौथा स्मृतिदिन. यानिमित्त बशरसाहेबांचे चाहते डॉ. संदीप शिसोदे यांनी त्यांच्या जागविलेल्या आठवणी.

‘‘सिर्फ हम ही नहीं हर एक ने जीने के लिएचंद ख्वाबों के खिलौनों से बहलना चाहा’’

हो हो यापलीकडे काय आहे, ते म्हणजे शब्दांची पकड. त्याची खोली. त्या शब्दांची ताकद आणि ती जाणून तिला चपखल जागी बसवण्याची कसब. ही फक्त बशर नवाज साहेब सारख्या जोहरीकडेच असू शकते. याचा प्रत्यय त्यांच्या गजलमध्ये येतो. वारंवार वाचताना येणारा नवनवीन अनुभव जबरदस्त असतो. आज त्यांची चौथी  पुण्यतिथी. त्यांच्यासोबत घालवलेले क्षण, आठवणी ताज्या झाल्या. त्यांच्यासोबतचाक्षण म्हणजे एक नवा अनुभव समृद्ध करणारा. ऊर्जा देणारा मानसिक ताकद देणारा सामर्थ्याचा अनुभव. 

‘‘धूप पी पी के झुलस जाये जमी... तब बरसे हैं घटाओं के भी अंदाज निराले कितने’’

बशर साहेबांचे राहणीमान अगदी साधे-सरळ; पण त्यांच्या गजलेत बेभान होऊन निघालेले शब्द म्हणजे एक दिव्य अनुभव. वरचे शब्द द्या धूप पी पी के झुलस जमीन बापरे काय आहे हे वर आग ओकणारा सूर्य आणि एकेक थेंबासाठी तहानलेली जमीन किती सत्वपरीक्षा आहे. यानंतर भावविभोर होऊन उठलेले आभाळ, बरसणारे आभाळ, कोसळणारं आभाळ किती छोटं किती रंग. प्रत्येक शब्द एक नवा शब्दकोश तयार होईल, असा बाबा म्हणायचे. त्यांना, सगळे बाबा बाबा म्हणजे वडील-वडील समान म्हणजे बाप गजलेचा या अर्थाने...त्या नजाकततेचा शब्द सौंदर्याचा खजाना म्हणजे बाबा एका गजलेत ते म्हणतात,‘‘नजरें ठहर-ठहर गई रंगे लिबास देखकर किसको पता चला मगर अपने ही खून में तर थे हम’’ 

खरंच आहे ना आपण स्वत:मध्ये इतके गर्क असतो, गुंतलेलो असतो की, आपल्याला इतर कोणाची काही चिंता, काळजी नसते; पण हे मांडता येणे हीच खुबी होती बाबांच्या शब्दांची. वास्तवाची जाणीव, वास्तवाचं भान आणि सगळ्या परिस्थितींवर असलेलं त्यांचं सडेतोड जबाब म्हणजेच बाबा गजल वाचून समजायला लागली आणि बाबा आपल्यातून ते त्यांच्या दुनियेत गेले आणि आपल्या सर्वांना सोडून गेले. त्यांच्या आठवणी आपल्यापाशी सोडून गेले. त्यांच्या गजल नजम शेर रूपात त्यांच्या शब्दांमधून ते-‘‘वो रुत बीती बात गयीसपनों जैसी रात गयी,अश्कों का तो कुछ न गयाआबरू-ए-जज्बात गयी,अब के भी हम मिल न सकेअब के भी बरसात गयी,फूल तो अब भी खिलते हैंखुशबू तेरे साथ गयी’’ 

बशर नवाज साहेब यांच्याकडं अधून-मधून जाणं व्हायचं. पहिल्यांदा त्यांच्यावरच्या डॉक्युमेंटरीच्या निमित्ताने त्यांची भेट झाली. उर्दू शेर गजल यापासून कोसोदूर असलेल्या मी पण त्या रात्री बशर साहेबांनी त्यांच्या तोंडून  आवडीचा शेर काढला आणि तो असा...‘‘नींद रुठे हुए लोगों को मनाना ही है,आंख खोलूंगा तो वो फिर से बिछड जायेंगे’’हा शेर मनाला भिडला आणि उर्दू गजल शेरच्या प्रेमात पडलो. बाबांची शेर गजल आणि नजर या वास्तव आयुष्य, प्रेम वास्तव आणि स्वप्न यावर आधारित आहेत. त्यांची इंग्रजी, मराठी, हिंदी, उर्दू ,अरबी या भाषांवर  कमांड होती.

- डॉ. संदीप शिसोदे

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcinemaसिनेमाliteratureसाहित्य