शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

गंगापूर, वैजापुरातील गावांत पुराचे पाणी; शेकडो एकर शेती पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 19:31 IST

एनडीआरएफच्या जवानांनी नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले 

ठळक मुद्देपिकांचे अतोनात नुकसानघरांतील साहित्य गेले वाहून 

औरंगाबाद : वैजापूर तालुक्यात गोदावरी नदीत सोमवारी पहाटे ५ वाजता २ लाख ७६ हजार क्युसेकने विसर्ग सुरू होता. त्यामुळे गोदावरी नदीने पात्र सोडत गोदाकाठी असलेल्या बाबतारा, भालगाव, डोंणगाव अणि लाखगंगा येथील अनेक घरांत पाणी शिरले. यामुळे काही घरांतील साहित्य वाहून गेले. एनडीआरएफच्या जवानांनी ठिकठिकाणी सकाळपासून बचावकार्य करीत नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले. 

रविवारी रात्री सलग तिसऱ्या दिवशी गोदावरी नदीला आलेल्या महापुराने दाणादाण उडवून दिली. बहुतांश गावांतील जनजीवन विस्कळीत झाले. नदीतून होणारा तुफानी विसर्ग जवळपास नदीकाठावरील सर्वच गावे अणि वाड्या-वस्त्यांना विळखा घातला. त्यामुळे सोमवारी महापुराचा इशारा देण्यात आल्याने या परिसरातील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली होती. गोदाकाठावरील काही वस्त्यांमधील लोक पुरात अडकले होते. त्यापैकी १२ जणांना सोमवारी सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. वैजापूर, वीरगाव पोलिसांसह एनडीआरएफच्या जवानांची तुकडी ठिकठिकाणी सकाळपासून बचावकार्य करीत आहे. सोमवारी पहाटे पाण्याचा विसर्ग एवढा वेगात होता की, नदीकाठावरील अनेक घरांपुढील साहित्य, पत्रे, पाण्याच्या टाक्या, झाडे, विद्युत पोलदेखील  गोदावरीच्या पात्राने कवेत घेतले होते. हे साहित्य वाहत जाऊन पुढे ठिकठिकाणी नदीकाठच्या कठड्यांना अडकल्याने लाटांचा तडाखा आणि धडकी भरवणारा आवाज येत होता. 

गंगापूर तालुक्यात शेकडो एकर शेती पाण्यातगंगापूर तालुक्यातील गोदावरी नदीला आलेल्या पुरात नदीकाठावरील शेकडो एकर शेतीमधील पिके पाण्याखाली गेली असून, रस्त्यावर पाणी आल्याने ममदापूरचा नेवरगावपासून संपर्क तुटला आहे.  पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत.नाशिक जिल्ह्यात सर्वच धरणांतील पाण्याचा विसर्ग जायकवाडी प्रकल्पात सोडण्यात येत आहे. या पाण्याच्या रेट्याने गोदावरी नदी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे सोमवारी नेवरगाव येथील संकटेश्वर मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. आगरकानडगाव, नेवरगाव, जामगाव, हैबतपूर, कायगाव, अंमळनेर, लखमापूर, आगरवाडगाव, भिवधानोरा, गळनिंब शिवारातील जायकवाडी संपादित क्षेत्रात पाणी शिरले आहे. या पाण्यामुळे येथील कापूस, मका, ऊस, मूग, सोयाबीन आदी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जुने नेवरगाव ते ममदापूर रस्ता बंद झाल्याने म्हसोबावाडी येथील नागरिकांचा संपर्क तुटला आहे. मात्र, त्यांना रस्त्याऐवजी कानडगावकडे जाण्यासाठी कच्च्या रस्त्याचा वापर करावा लागणार आहे. पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तहसीलदार अरुण जºहाड यांनी ७ पथके तयार के ली असून, त्यात नायब तहसीलदार नामदेव देशटवाड, अभय बेलसरे, बी. डी. तेजीनकर, सदाशिव पंदुरे यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

टॅग्स :floodपूरAurangabadऔरंगाबादgodavariगोदावरी