शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर, वैजापुरातील गावांत पुराचे पाणी; शेकडो एकर शेती पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 19:31 IST

एनडीआरएफच्या जवानांनी नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले 

ठळक मुद्देपिकांचे अतोनात नुकसानघरांतील साहित्य गेले वाहून 

औरंगाबाद : वैजापूर तालुक्यात गोदावरी नदीत सोमवारी पहाटे ५ वाजता २ लाख ७६ हजार क्युसेकने विसर्ग सुरू होता. त्यामुळे गोदावरी नदीने पात्र सोडत गोदाकाठी असलेल्या बाबतारा, भालगाव, डोंणगाव अणि लाखगंगा येथील अनेक घरांत पाणी शिरले. यामुळे काही घरांतील साहित्य वाहून गेले. एनडीआरएफच्या जवानांनी ठिकठिकाणी सकाळपासून बचावकार्य करीत नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले. 

रविवारी रात्री सलग तिसऱ्या दिवशी गोदावरी नदीला आलेल्या महापुराने दाणादाण उडवून दिली. बहुतांश गावांतील जनजीवन विस्कळीत झाले. नदीतून होणारा तुफानी विसर्ग जवळपास नदीकाठावरील सर्वच गावे अणि वाड्या-वस्त्यांना विळखा घातला. त्यामुळे सोमवारी महापुराचा इशारा देण्यात आल्याने या परिसरातील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली होती. गोदाकाठावरील काही वस्त्यांमधील लोक पुरात अडकले होते. त्यापैकी १२ जणांना सोमवारी सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. वैजापूर, वीरगाव पोलिसांसह एनडीआरएफच्या जवानांची तुकडी ठिकठिकाणी सकाळपासून बचावकार्य करीत आहे. सोमवारी पहाटे पाण्याचा विसर्ग एवढा वेगात होता की, नदीकाठावरील अनेक घरांपुढील साहित्य, पत्रे, पाण्याच्या टाक्या, झाडे, विद्युत पोलदेखील  गोदावरीच्या पात्राने कवेत घेतले होते. हे साहित्य वाहत जाऊन पुढे ठिकठिकाणी नदीकाठच्या कठड्यांना अडकल्याने लाटांचा तडाखा आणि धडकी भरवणारा आवाज येत होता. 

गंगापूर तालुक्यात शेकडो एकर शेती पाण्यातगंगापूर तालुक्यातील गोदावरी नदीला आलेल्या पुरात नदीकाठावरील शेकडो एकर शेतीमधील पिके पाण्याखाली गेली असून, रस्त्यावर पाणी आल्याने ममदापूरचा नेवरगावपासून संपर्क तुटला आहे.  पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत.नाशिक जिल्ह्यात सर्वच धरणांतील पाण्याचा विसर्ग जायकवाडी प्रकल्पात सोडण्यात येत आहे. या पाण्याच्या रेट्याने गोदावरी नदी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे सोमवारी नेवरगाव येथील संकटेश्वर मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. आगरकानडगाव, नेवरगाव, जामगाव, हैबतपूर, कायगाव, अंमळनेर, लखमापूर, आगरवाडगाव, भिवधानोरा, गळनिंब शिवारातील जायकवाडी संपादित क्षेत्रात पाणी शिरले आहे. या पाण्यामुळे येथील कापूस, मका, ऊस, मूग, सोयाबीन आदी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जुने नेवरगाव ते ममदापूर रस्ता बंद झाल्याने म्हसोबावाडी येथील नागरिकांचा संपर्क तुटला आहे. मात्र, त्यांना रस्त्याऐवजी कानडगावकडे जाण्यासाठी कच्च्या रस्त्याचा वापर करावा लागणार आहे. पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तहसीलदार अरुण जºहाड यांनी ७ पथके तयार के ली असून, त्यात नायब तहसीलदार नामदेव देशटवाड, अभय बेलसरे, बी. डी. तेजीनकर, सदाशिव पंदुरे यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

टॅग्स :floodपूरAurangabadऔरंगाबादgodavariगोदावरी