शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

सलामपुरेनगरात समस्येचा महापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 23:44 IST

वडगाव कोल्हाटी येथील सलामपुरे नगरात समस्येचा महापूर आहे. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडून पाणी, रस्ते, ड्रेनेज, लाईट आदी नागरी सुविधा पुरविल्या जात नाहीत.

वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी येथील सलामपुरे नगरात समस्येचा महापूर आहे. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडून पाणी, रस्ते, ड्रेनेज, लाईट आदी नागरी सुविधा पुरविल्या जात नाहीत. पायाभूत सुविधा मिळत नसल्याने रहिवाशांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

स्थानिक ग्रामपंचायतीच्या उदासीन धोरणामुळे अनेक वर्षांपासून येथील पाणीप्रश्न सुटू शकलेला नाही. त्यामुळे दरवर्षी नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या भागाला १० ते १२ दिवसांनंतर एकदा तेही कमी दाबाने पाणी मिळते. अनेकांच्या नळाला तर पाणीच येत नाही. मागील वर्षी ग्रामपंचायतीकडून टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. पण आता टँकरही येत नाही. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत. पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याने नागरिकांना परिसरात भटकंती करुन विहिरी व बोअरवेलमधून पाणी आणावे लागत आहे. विशेष म्हणजे जलवाहिनी अनेक ठिकाणी फुटल्याने व जीर्ण झाल्याने नळाला येणारे पाणीही गढूळ व दूषित येत आहे. विकतचे पाणी परवडत नसल्याने नागरिकांना नाईलाजास्तव हेच पाणी प्यावे लागत आहे. स्वच्छ अभियानांतर्गत जवळपास सर्वांनीच शौचालय बांधले आहेत. पण या भागात ड्रेनेजलाईनची सोय नसल्याने ड्रेनेज व सांडपाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे ड्रेनेजचे चेंबर चोकअप होऊन ड्रेनेज व सांडपाणी नागरिकांच्या घरालगत साचत आहे. सांडपाण्याच्या गटारीही उघड्यावरुन वाहतात. त्यामुळे दुर्गंधी व डासाचा फैलाव वाढला आहे. दूषित पाणी व घाणीमुळे साथीच्या आजाराची लागण होत असून लहान मुले सारखी आजारी पडत आहेत. त्यामुळे नागरिकांना आरोग्य विषयक समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

अंतर्गत रस्त्याची दुरावस्था झाली असून, पथदिव्याचीही सोय नाही. चौकात बसविलेले पथदिवेही कायम बंद राहात असल्याने रस्त्यावर कायम अंधार असतो. अंधारामुळे नागरिकांना ये-जा करताना गैरसायीचा सामना करावा लागत असून, महिला व लहान मुलांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. एकूणच या भागात समस्येचा महापूर असल्याने रहिवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याविषयी अनेकवेळा सांगूनही ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देत नाही, असा आरोप येथील मंदाबाई हिवाळे, मंगल सोनवणे, बाळू कापसे, सागर शेजवळ, दीपक आमले, संतोष जाधव, अहिल्याबाई खरात, शशिकांत अडसूळ, जगन्नाथ गायकवाड, मीनाबाई घुले, आशाबाई कांबळे, संदीप घुले आदीं रहिवाशांनी केला आहे.

टॅग्स :Walujवाळूज