शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
6
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
7
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
8
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
9
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
10
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
11
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
12
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
13
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
14
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
15
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
16
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
17
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
18
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
19
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
20
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?

सलामपुरेनगरात समस्येचा महापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 23:44 IST

वडगाव कोल्हाटी येथील सलामपुरे नगरात समस्येचा महापूर आहे. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडून पाणी, रस्ते, ड्रेनेज, लाईट आदी नागरी सुविधा पुरविल्या जात नाहीत.

वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी येथील सलामपुरे नगरात समस्येचा महापूर आहे. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडून पाणी, रस्ते, ड्रेनेज, लाईट आदी नागरी सुविधा पुरविल्या जात नाहीत. पायाभूत सुविधा मिळत नसल्याने रहिवाशांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

स्थानिक ग्रामपंचायतीच्या उदासीन धोरणामुळे अनेक वर्षांपासून येथील पाणीप्रश्न सुटू शकलेला नाही. त्यामुळे दरवर्षी नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या भागाला १० ते १२ दिवसांनंतर एकदा तेही कमी दाबाने पाणी मिळते. अनेकांच्या नळाला तर पाणीच येत नाही. मागील वर्षी ग्रामपंचायतीकडून टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. पण आता टँकरही येत नाही. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत. पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याने नागरिकांना परिसरात भटकंती करुन विहिरी व बोअरवेलमधून पाणी आणावे लागत आहे. विशेष म्हणजे जलवाहिनी अनेक ठिकाणी फुटल्याने व जीर्ण झाल्याने नळाला येणारे पाणीही गढूळ व दूषित येत आहे. विकतचे पाणी परवडत नसल्याने नागरिकांना नाईलाजास्तव हेच पाणी प्यावे लागत आहे. स्वच्छ अभियानांतर्गत जवळपास सर्वांनीच शौचालय बांधले आहेत. पण या भागात ड्रेनेजलाईनची सोय नसल्याने ड्रेनेज व सांडपाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे ड्रेनेजचे चेंबर चोकअप होऊन ड्रेनेज व सांडपाणी नागरिकांच्या घरालगत साचत आहे. सांडपाण्याच्या गटारीही उघड्यावरुन वाहतात. त्यामुळे दुर्गंधी व डासाचा फैलाव वाढला आहे. दूषित पाणी व घाणीमुळे साथीच्या आजाराची लागण होत असून लहान मुले सारखी आजारी पडत आहेत. त्यामुळे नागरिकांना आरोग्य विषयक समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

अंतर्गत रस्त्याची दुरावस्था झाली असून, पथदिव्याचीही सोय नाही. चौकात बसविलेले पथदिवेही कायम बंद राहात असल्याने रस्त्यावर कायम अंधार असतो. अंधारामुळे नागरिकांना ये-जा करताना गैरसायीचा सामना करावा लागत असून, महिला व लहान मुलांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. एकूणच या भागात समस्येचा महापूर असल्याने रहिवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याविषयी अनेकवेळा सांगूनही ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देत नाही, असा आरोप येथील मंदाबाई हिवाळे, मंगल सोनवणे, बाळू कापसे, सागर शेजवळ, दीपक आमले, संतोष जाधव, अहिल्याबाई खरात, शशिकांत अडसूळ, जगन्नाथ गायकवाड, मीनाबाई घुले, आशाबाई कांबळे, संदीप घुले आदीं रहिवाशांनी केला आहे.

टॅग्स :Walujवाळूज