शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सलामपुरेनगरात समस्येचा महापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 23:44 IST

वडगाव कोल्हाटी येथील सलामपुरे नगरात समस्येचा महापूर आहे. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडून पाणी, रस्ते, ड्रेनेज, लाईट आदी नागरी सुविधा पुरविल्या जात नाहीत.

वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी येथील सलामपुरे नगरात समस्येचा महापूर आहे. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडून पाणी, रस्ते, ड्रेनेज, लाईट आदी नागरी सुविधा पुरविल्या जात नाहीत. पायाभूत सुविधा मिळत नसल्याने रहिवाशांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

स्थानिक ग्रामपंचायतीच्या उदासीन धोरणामुळे अनेक वर्षांपासून येथील पाणीप्रश्न सुटू शकलेला नाही. त्यामुळे दरवर्षी नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या भागाला १० ते १२ दिवसांनंतर एकदा तेही कमी दाबाने पाणी मिळते. अनेकांच्या नळाला तर पाणीच येत नाही. मागील वर्षी ग्रामपंचायतीकडून टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. पण आता टँकरही येत नाही. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत. पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याने नागरिकांना परिसरात भटकंती करुन विहिरी व बोअरवेलमधून पाणी आणावे लागत आहे. विशेष म्हणजे जलवाहिनी अनेक ठिकाणी फुटल्याने व जीर्ण झाल्याने नळाला येणारे पाणीही गढूळ व दूषित येत आहे. विकतचे पाणी परवडत नसल्याने नागरिकांना नाईलाजास्तव हेच पाणी प्यावे लागत आहे. स्वच्छ अभियानांतर्गत जवळपास सर्वांनीच शौचालय बांधले आहेत. पण या भागात ड्रेनेजलाईनची सोय नसल्याने ड्रेनेज व सांडपाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे ड्रेनेजचे चेंबर चोकअप होऊन ड्रेनेज व सांडपाणी नागरिकांच्या घरालगत साचत आहे. सांडपाण्याच्या गटारीही उघड्यावरुन वाहतात. त्यामुळे दुर्गंधी व डासाचा फैलाव वाढला आहे. दूषित पाणी व घाणीमुळे साथीच्या आजाराची लागण होत असून लहान मुले सारखी आजारी पडत आहेत. त्यामुळे नागरिकांना आरोग्य विषयक समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

अंतर्गत रस्त्याची दुरावस्था झाली असून, पथदिव्याचीही सोय नाही. चौकात बसविलेले पथदिवेही कायम बंद राहात असल्याने रस्त्यावर कायम अंधार असतो. अंधारामुळे नागरिकांना ये-जा करताना गैरसायीचा सामना करावा लागत असून, महिला व लहान मुलांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. एकूणच या भागात समस्येचा महापूर असल्याने रहिवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याविषयी अनेकवेळा सांगूनही ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देत नाही, असा आरोप येथील मंदाबाई हिवाळे, मंगल सोनवणे, बाळू कापसे, सागर शेजवळ, दीपक आमले, संतोष जाधव, अहिल्याबाई खरात, शशिकांत अडसूळ, जगन्नाथ गायकवाड, मीनाबाई घुले, आशाबाई कांबळे, संदीप घुले आदीं रहिवाशांनी केला आहे.

टॅग्स :Walujवाळूज