शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

मराठा आरक्षणासाठी  मराठवाड्यातील सात जिल्ह्यातून निवेदनांचा ‘महापूर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 17:12 IST

औरंगाबाद वगळता उर्वरित सात जिल्ह्यांमध्ये तब्बल २ लाख ३६ हजार ४७९ निवेदने प्राप्त झाल्याची माहिती आयोगाचे सदस्य डॉ. राजेश करपे यांनी दिली.

ठळक मुद्देराज्य मागासवर्ग आयोगातर्फे मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यातील प्रत्येक तालुक्यातील दोन गावांमध्ये सर्वेक्षण केल्यानंतर जिल्हावार जनसुनावणी घेतली.यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात संस्था, संघटना, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी निवेदनांचा पाऊस पाडला आहे.

- राम शिनगारे 

औरंगाबाद : राज्य मागासवर्ग आयोगातर्फे मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यातील प्रत्येक तालुक्यातील दोन गावांमध्ये सर्वेक्षण केल्यानंतर जिल्हावार जनसुनावणी घेतली. यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात संस्था, संघटना, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी निवेदनांचा पाऊस पाडला आहे. औरंगाबाद वगळता उर्वरित सात जिल्ह्यांमध्ये तब्बल २ लाख ३६ हजार ४७९ निवेदने प्राप्त झाल्याची माहिती आयोगाचे सदस्य डॉ. राजेश करपे यांनी दिली.

राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात योग्य शिफारशी करण्याची विनंती राज्य मागासवर्ग आयोगाला केली आहे. यासाठी राज्य सरकारने आयोगाकडे उच्च न्यायालयात दाखल केलेले शपथपत्रासह सर्व अहवाल अभ्यासासाठी दिले. मात्र, आयोगाने मराठा समाजाचे मागासलेपण ठरविण्यासाठी सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. यानुसार आयोगाचे सदस्य डॉ. राजेश करपे आणि रोहिदास जाधव यांच्या नेतृत्वात मराठवाड्यात सर्वेक्षण करण्यात आले. 

या सर्वेक्षणानंतर आयोगातर्फे जिल्हास्तरावर खुली जनसुनावणी घेण्यात आली. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येच अध्यक्ष न्यायमूर्ती एम.जी. गायकवाड उपस्थित होते, तर उर्वरित ठिकाणी डॉ. सर्जेराव निमसे, डॉ. राजेश करपे आणि रोहिदास जाधव यांनीच संस्था, संघटना, पक्ष, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून निवेदने स्वीकारली. यात पहिल्या टप्प्यात लातूर व उस्मानाबाद येथे जनसुनावणी घेण्यात आली. पहिल्या टप्प्यात अनेक लोकांपर्यंत माहिती पोहोचली नसल्यामुळे आयोगाने दुसºया टप्प्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, बीड आणि जालना येथे योग्य ती काळजी घेत जनसुनावणीची माहिती जनतेपर्यंत पोहोचविली. यामुळे नागरिकांनी पुराव्यांसह आयोगाकडे लाखावर निवेदने दिली. या निवेदनांचे आयोग वर्गीकरण करणार आहे. या वर्गीकरणानंतर याविषयीचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येईल, असे डॉ. करपे यांनी सांगितले.

१६ मार्चला औरंगाबादेत जनसुनावणीमराठवाड्यातील सात जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरावरील जनसुनावणी घेतल्यानंतर विभागस्तरावरील जनसुनावणी शुक्रवारी (दि.१६) सुभेदारी विश्रामगृह येथे सकाळी ११ ते ४ या वेळेत आयोजित केली आहे. या जनसुनावणीला अध्यक्ष न्यायमूर्ती गायकवाड, तज्ज्ञ सदस्य डॉ. सर्जेराव निमसे यांच्यासह आयोगाचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत. औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी, संस्था, संघटना आणि नागरिकांना लेखी निवेदने सादर करीत यात सहभागी होण्याचे आवाहन डॉ. राजेश करपे यांनी केले.

जिल्हा              निवेदनेलातूर               ४९०उस्मानाबाद     ९८९नांदेड               ९०,०००हिंगोली            ३९,०००परभणी            ४७,०००बीड                  ३१,०००जालना             २८,०००एकूण               २,३६,४७९

टॅग्स :reservationआरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाState Governmentराज्य सरकार