शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

मराठा आरक्षणासाठी  मराठवाड्यातील सात जिल्ह्यातून निवेदनांचा ‘महापूर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 17:12 IST

औरंगाबाद वगळता उर्वरित सात जिल्ह्यांमध्ये तब्बल २ लाख ३६ हजार ४७९ निवेदने प्राप्त झाल्याची माहिती आयोगाचे सदस्य डॉ. राजेश करपे यांनी दिली.

ठळक मुद्देराज्य मागासवर्ग आयोगातर्फे मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यातील प्रत्येक तालुक्यातील दोन गावांमध्ये सर्वेक्षण केल्यानंतर जिल्हावार जनसुनावणी घेतली.यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात संस्था, संघटना, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी निवेदनांचा पाऊस पाडला आहे.

- राम शिनगारे 

औरंगाबाद : राज्य मागासवर्ग आयोगातर्फे मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यातील प्रत्येक तालुक्यातील दोन गावांमध्ये सर्वेक्षण केल्यानंतर जिल्हावार जनसुनावणी घेतली. यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात संस्था, संघटना, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी निवेदनांचा पाऊस पाडला आहे. औरंगाबाद वगळता उर्वरित सात जिल्ह्यांमध्ये तब्बल २ लाख ३६ हजार ४७९ निवेदने प्राप्त झाल्याची माहिती आयोगाचे सदस्य डॉ. राजेश करपे यांनी दिली.

राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात योग्य शिफारशी करण्याची विनंती राज्य मागासवर्ग आयोगाला केली आहे. यासाठी राज्य सरकारने आयोगाकडे उच्च न्यायालयात दाखल केलेले शपथपत्रासह सर्व अहवाल अभ्यासासाठी दिले. मात्र, आयोगाने मराठा समाजाचे मागासलेपण ठरविण्यासाठी सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. यानुसार आयोगाचे सदस्य डॉ. राजेश करपे आणि रोहिदास जाधव यांच्या नेतृत्वात मराठवाड्यात सर्वेक्षण करण्यात आले. 

या सर्वेक्षणानंतर आयोगातर्फे जिल्हास्तरावर खुली जनसुनावणी घेण्यात आली. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येच अध्यक्ष न्यायमूर्ती एम.जी. गायकवाड उपस्थित होते, तर उर्वरित ठिकाणी डॉ. सर्जेराव निमसे, डॉ. राजेश करपे आणि रोहिदास जाधव यांनीच संस्था, संघटना, पक्ष, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून निवेदने स्वीकारली. यात पहिल्या टप्प्यात लातूर व उस्मानाबाद येथे जनसुनावणी घेण्यात आली. पहिल्या टप्प्यात अनेक लोकांपर्यंत माहिती पोहोचली नसल्यामुळे आयोगाने दुसºया टप्प्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, बीड आणि जालना येथे योग्य ती काळजी घेत जनसुनावणीची माहिती जनतेपर्यंत पोहोचविली. यामुळे नागरिकांनी पुराव्यांसह आयोगाकडे लाखावर निवेदने दिली. या निवेदनांचे आयोग वर्गीकरण करणार आहे. या वर्गीकरणानंतर याविषयीचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येईल, असे डॉ. करपे यांनी सांगितले.

१६ मार्चला औरंगाबादेत जनसुनावणीमराठवाड्यातील सात जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरावरील जनसुनावणी घेतल्यानंतर विभागस्तरावरील जनसुनावणी शुक्रवारी (दि.१६) सुभेदारी विश्रामगृह येथे सकाळी ११ ते ४ या वेळेत आयोजित केली आहे. या जनसुनावणीला अध्यक्ष न्यायमूर्ती गायकवाड, तज्ज्ञ सदस्य डॉ. सर्जेराव निमसे यांच्यासह आयोगाचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत. औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी, संस्था, संघटना आणि नागरिकांना लेखी निवेदने सादर करीत यात सहभागी होण्याचे आवाहन डॉ. राजेश करपे यांनी केले.

जिल्हा              निवेदनेलातूर               ४९०उस्मानाबाद     ९८९नांदेड               ९०,०००हिंगोली            ३९,०००परभणी            ४७,०००बीड                  ३१,०००जालना             २८,०००एकूण               २,३६,४७९

टॅग्स :reservationआरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाState Governmentराज्य सरकार