शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
3
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
4
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
5
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
6
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
7
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
8
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
9
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
10
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
11
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
12
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
13
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
14
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
15
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
16
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
17
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
18
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
19
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
20
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे

औरंगाबाद विमानतळाच्या खासगीकरणाचे ‘उड्डाण’; जमिनीच्या मोजमापानंतर नकाशा तयार होताच निघणार निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2022 12:15 PM

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने सप्टेंबर २०२१मध्ये देशातील १३ विमानतळांच्या खासगीकरणाचा निर्णय घेतला.

औरंगाबाद : औरंगाबादमधील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या खासगीकरण प्रक्रियेला वेग दिला जात आहे. निविदा प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या विमानतळाच्या जमिनीचे मोजमाप करण्याची प्रक्रिया सुरु आहे. विमानतळाचा नकाशा तयार होताच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यात रायपूरसोबत औरंगाबाद अशा एकत्रितपणे विमानतळाचे खासगीकरण करण्यात येणार असल्याचे समजते.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने सप्टेंबर २०२१मध्ये देशातील १३ विमानतळांच्या खासगीकरणाचा निर्णय घेतला. या १३ विमानतळांमध्ये औरंगाबादचा समावेश आहे. देशातील अमृतसर, भुवनेश्वर, इंदूर, रायपूर, त्रिची आणि वाराणसी या ६ मोठ्या विमानतळांचे आणि हुबळी, तिरुपती, औरंगाबाद, जबलपूर, कांगरा, कुशीनगर, गया या ७ छोट्या विमानतळांचे खासगीकरण करण्याचे ठरले. चिकलठाणा विमानतळावरील सोयी-सुविधा आता चांगल्या आहेत. खासगीकरणामुळे त्यात पुढे आणखी वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे म्हणाले, विमानतळाचे खासगीकरण होणार आहे. सध्या विमानतळ जमिनीच्या मोजणीची प्रक्रिया सुरु आहे.

विमानतळाचा का वाढला तोटा ?शिर्डी, नांदेड विमानतळावरून विमानसेवा सुरू झाली. शिर्डीसह मराठवाड्यातून दिल्ली, मुंबईला जाण्यासाठी विमान प्रवासी औरंगाबादला येत असत. परंतु, शिर्डी विमानतळ औरंगाबादलाही मागे टाकू पाहत आहे. त्यात कोरोनाचाही मोठा फटका बसला. औरंगाबादहून नव्या विमानसेवा, देशभरातील विविध शहरांना हवाई कनेक्टिव्हिटीची प्रतीक्षा करावी लागत आहे. परिणामी, प्रवासी संख्या, विमाने वाढत नसल्याचा फटका चिकलठाणा विमानतळाला बसत असून, सलग ३ वर्षांपासून नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. यात २०२०-२१ या वर्षामध्ये ४०.५५ कोटींचा तोटा झाला.

३ वर्षांतील स्थितीचिकलठाणा विमानतळाला वर्ष २०१८-१९मध्ये ५८.७१ कोटी, वर्ष २०१९-२०मध्ये ५८.०८ कोटी आणि २०२०-२१मध्ये ४०.५५ कोटी रुपयांचा तोटा झाल्याची माहिती नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या एका पत्राद्वारे काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. हा तोटा कमी करण्याच्या दृष्टीनेच खासगीकरणाचा निर्णय घेतल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळCentral Governmentकेंद्र सरकार