शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
3
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
4
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
5
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
6
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
7
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
8
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
9
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
10
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
12
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
13
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
14
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
15
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
16
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
17
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
18
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
19
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
20
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार

उड्डाण पुलावरील दिवे शॉर्ट

By admin | Updated: May 7, 2014 00:22 IST

औरंगाबाद : महापालिकेने औरंगाबादकरांच्या जिवाला धोका निर्माण करणारे पथदिवे सेव्हन हिल उड्डाण पुलावर बसविले असून ५० टक्के दिवे शॉर्ट झाले आहेत.

औरंगाबाद : महापालिकेने औरंगाबादकरांच्या जिवाला धोका निर्माण करणारे पथदिवे सेव्हन हिल उड्डाण पुलावर बसविले असून ५० टक्के दिवे शॉर्ट झाले आहेत. पावसामुळे एलईडी बल्ब शॉर्ट झाल्याचा दावा विद्युत विभाग करीत आहे. पुलावरील सर्व बल्बचा प्रकाश कमी झाला आहे. बँ्रडेड कंपनीच्या बल्बऐवजी निकृष्ट दर्जाचे बल्ब बसविण्यात आल्याचे उघड झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पालिकेच्या वादात दीड वर्ष पूल अंधारात राहिल्याने पुलावर लहान-मोठे अपघात झाले. अखेर मनपाने पुलावर पथदिवे बसविण्याची जबाबदारी जानेवारी २०१२ मध्ये घेतली. बांधकाम विभागाने बसविलेले ८० पथदिवे पालिकेने काढून टाकले; मात्र नवीन पथदिवे बसविण्यासाठी सव्वा वर्ष लावले. ५० लाख रुपयांच्या खर्चातून पथदिवे बसविण्यास मुहूर्त लागला. जानेवारी २०१३ मध्ये खांब बसविण्याचे काम सुरू झाले. मजबूत असा आधार न देता ते खांब बसविण्यात आले आहेत. तांत्रिक त्रुटी ६० पथदिवे उड्डाण पुलावर बसविले आहेत. प्रत्येक खांबाचे वजन ५० किलो इतके आहे. तीन क्लॅम, चार इंची आकाराचे सहा नट व अर्धा इंची जाडीच्या लोखंडी बॉक्स पॅलेटमध्ये तो खांब बसवून त्यावर दिवा लावण्यात आला आहे. खांबांची अलाईनमेंट केलेली नाही. ते खांब फायबर रिपोर्सपासून बनविले आहेत. बल्ब-खांबांना दोन वर्षे काहीही होणार नाही, असा दावा मनपाचे कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांनी केला होता. कामावर ५० लाखांचा खर्च झाला आहे. बजाज या मूळ कंत्राटदाराने लोकल कंत्राटदाराकडून काम करून घेतले आहे. खांब एअरपॅक असून, त्यामध्ये पाणी जाण्यास वाव नाही. त्यामुळे ते गंजून पडण्याची सुतराम शक्यता नाही, असाही दावा त्यांनी केला होता.