शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

विमानांच्या मार्गात पक्ष्यांची भरारी

By admin | Updated: January 4, 2016 00:23 IST

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानांचे टेकआॅफ आणि लॅडिंग होते, त्या धावपट्टीवरूनच पक्ष्यांची भरारी सुरू आहे.

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानांचे टेकआॅफ आणि लॅडिंग होते, त्या धावपट्टीवरूनच पक्ष्यांची भरारी सुरू आहे. परिसरातील आकाशात पक्ष्यांचा मुक्त संचार सुरू आहे आणि त्याला कारणीभूत ठरत आहेत विमानतळाजवळील तीन नाले. विमानांच्या उड्डाणात अडथळा निर्माण करणाऱ्या नाल्यांचा योग्य बंदोबस्त करण्याची गरज आहे. परंतु महापालिका त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने विमानतळ प्राधिकरणाची डोकेदुखी वाढत आहे.चिकलठाणा विमानतळाच्या परिसरातील जयभवानीनगर, म्हाडा कॉलनी आदी भागांतून वाहणारे नाले विमानतळाच्या धावपट्टीजवळून आणि काही ठिकाणी थेट विमानतळाच्या परिसरातून जातात. बाराही महिने वाहणाऱ्या नाल्यांमुळे परिसरात पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नाल्यातील कचऱ्यावर हे पक्षी वाढत असल्याचे दिसून येते. विमानतळाच्या परिसरातील विविध भागांमधील नाले भूमिगत करण्यात आले. परंतु विमानतळाच्या भिंतीलगत असलेले नाले अद्यापही उघडेच आहेत. त्यामुळे पक्ष्यांंची संख्या वाढण्यास हातभार लागत आहे. हे पक्षी ऐन धावपट्टीवर संचार करतात. त्यामुळे विमानांच्या उड्डाणात अडथळा निर्माण होत आहे. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नाले भूमिगत करण्याची मागणी विमानतळ प्राधिकरणाकडून महापालिकेकडे केली आहे. परंतु मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. या कामासाठी आठ ते दहा कोटी रुपये खर्च लागण्याचा अंदाज आहे. हा खर्च मनपा करणार की विमानतळ हा कळीचा मुद्दा आहे.