शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

Flashback : औरंगाबादकरांनी रोखली देशभरात उठलेली कॉंग्रेसची सहानुभूतीची लाट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 16:41 IST

आठवी लोकसभा : इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून साहेबराव डोणगावकर यांनी खेचली विजयश्री

- शांतीलाल गायकवाड

औरंगाबाद : पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात काँग्रेसच्या सहानुभूतीची मोठी लाट आली. या लाटेने काँग्रेसला लोकसभेच्या आठव्या निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाले; परंतु आतापर्यंत काँग्रेसची पाठराखण करणाऱ्या औरंगाबादकरांनी सहानुभूतीची ही लाट रोखून समाजवादी काँग्रेसचे उमेदवार साहेबराव पाटील डोणगावकर यांना विजयी केले. 

दहशतवाद्यांना हुसकाविण्यासाठी सुवर्ण मंदिरात लष्कर घुसविल्याच्या रागातून शीख अंगरक्षकांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची ३० आॅक्टोबर १९८४ मध्ये हत्या केली. राजीव गांधी यांना हंगामी पंतप्रधान म्हणून निवडण्यात आले. त्यानंतर दोन महिन्यांत झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत देशभरात काँग्रेस सहानुभूतीची लाट आली. करिश्माई नेतृत्व असलेले पंडित जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधी यांनाही शक्य झाले नाही, एवढ्या ४०४ जागा राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला मिळाल्या. तरीही पंजाब व आसाममध्ये अशांतता असल्याने निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या. या दोन राज्यांत निवडणुका झाल्यानंतर काँग्रेसचे संख्या बळ ४१४ वर पोहोचले होते. 

अशा या वातावरणात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादकरांनी काँग्रेसचा उधळलेला वारू रोखून धरला. काँग्रेस (एस)चे उमेदवार साहेबराव पाटील डोणगावकर यांनी काँग्रेस (आय)चे उमेदवार अब्दुल अजीम अब्दुल हमीद यांचा ९२ हजार ४१९ मतांनी दणदणीत पराभव केला. या निवडणुकीत १३ उमेदवार उभे होते. त्यातील ११ उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या होत्या. यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये डोणगावकर यांचा काँग्रेस उमेदवार काझी सलीम यांनी पराभव केला होता. 

सरपंच ते खासदार...साहेबराव कचरू पाटील हे डोणगावचे (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) रहिवासी. त्यांचा जन्म ६ जून १९४८ रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण अहमदनगरच्या सोसायटी शाळेत झाले. अंडर मॅट्रिक असलेले डोणगावकर हे कृषिवत्सल राजकारणी होते. काँग्रेसमधून बाहेर पडून ते शरद पवार यांच्यासह काँग्रेस (एस) मध्ये गेले. काँग्रेस एसचे पाच वर्षे जिल्हाध्यक्ष होते. डोणगावचे १३ वर्षे सरपंचपदी राहिलेले डोणगावकर आठव्या लोकसभेचे सदस्य झाले. गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमनपद त्यांनी भूषविले. गंगापूर तालुका शिक्षण संस्थेचे ते १० वर्षे सरचिटणीस होते. ९ एप्रिल २०११ रोजी त्यांचे निधन झाले. 

आठव्या लोकसभेत पहिल्या महिला उमेदवारऔरंगाबाद मतदारसंघात लढविल्या गेलेल्या लोकसभेच्या यापूर्वीच्या सात निवडणुकीपर्यंत एकही महिला उमेदवार नव्हती. आठव्या लोकसभेत शकुंतला रेणुकादास नाईक  यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली; परंतु त्यांना केवळ  ६९६ (टक्के ०.१४) मते मिळाली. १३ उमेदवारांच्या यादीत ही मते सर्वात कमी होती. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019