शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

Flashback : औरंगाबादकरांनी रोखली देशभरात उठलेली कॉंग्रेसची सहानुभूतीची लाट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 16:41 IST

आठवी लोकसभा : इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून साहेबराव डोणगावकर यांनी खेचली विजयश्री

- शांतीलाल गायकवाड

औरंगाबाद : पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात काँग्रेसच्या सहानुभूतीची मोठी लाट आली. या लाटेने काँग्रेसला लोकसभेच्या आठव्या निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाले; परंतु आतापर्यंत काँग्रेसची पाठराखण करणाऱ्या औरंगाबादकरांनी सहानुभूतीची ही लाट रोखून समाजवादी काँग्रेसचे उमेदवार साहेबराव पाटील डोणगावकर यांना विजयी केले. 

दहशतवाद्यांना हुसकाविण्यासाठी सुवर्ण मंदिरात लष्कर घुसविल्याच्या रागातून शीख अंगरक्षकांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची ३० आॅक्टोबर १९८४ मध्ये हत्या केली. राजीव गांधी यांना हंगामी पंतप्रधान म्हणून निवडण्यात आले. त्यानंतर दोन महिन्यांत झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत देशभरात काँग्रेस सहानुभूतीची लाट आली. करिश्माई नेतृत्व असलेले पंडित जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधी यांनाही शक्य झाले नाही, एवढ्या ४०४ जागा राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला मिळाल्या. तरीही पंजाब व आसाममध्ये अशांतता असल्याने निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या. या दोन राज्यांत निवडणुका झाल्यानंतर काँग्रेसचे संख्या बळ ४१४ वर पोहोचले होते. 

अशा या वातावरणात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादकरांनी काँग्रेसचा उधळलेला वारू रोखून धरला. काँग्रेस (एस)चे उमेदवार साहेबराव पाटील डोणगावकर यांनी काँग्रेस (आय)चे उमेदवार अब्दुल अजीम अब्दुल हमीद यांचा ९२ हजार ४१९ मतांनी दणदणीत पराभव केला. या निवडणुकीत १३ उमेदवार उभे होते. त्यातील ११ उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या होत्या. यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये डोणगावकर यांचा काँग्रेस उमेदवार काझी सलीम यांनी पराभव केला होता. 

सरपंच ते खासदार...साहेबराव कचरू पाटील हे डोणगावचे (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) रहिवासी. त्यांचा जन्म ६ जून १९४८ रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण अहमदनगरच्या सोसायटी शाळेत झाले. अंडर मॅट्रिक असलेले डोणगावकर हे कृषिवत्सल राजकारणी होते. काँग्रेसमधून बाहेर पडून ते शरद पवार यांच्यासह काँग्रेस (एस) मध्ये गेले. काँग्रेस एसचे पाच वर्षे जिल्हाध्यक्ष होते. डोणगावचे १३ वर्षे सरपंचपदी राहिलेले डोणगावकर आठव्या लोकसभेचे सदस्य झाले. गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमनपद त्यांनी भूषविले. गंगापूर तालुका शिक्षण संस्थेचे ते १० वर्षे सरचिटणीस होते. ९ एप्रिल २०११ रोजी त्यांचे निधन झाले. 

आठव्या लोकसभेत पहिल्या महिला उमेदवारऔरंगाबाद मतदारसंघात लढविल्या गेलेल्या लोकसभेच्या यापूर्वीच्या सात निवडणुकीपर्यंत एकही महिला उमेदवार नव्हती. आठव्या लोकसभेत शकुंतला रेणुकादास नाईक  यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली; परंतु त्यांना केवळ  ६९६ (टक्के ०.१४) मते मिळाली. १३ उमेदवारांच्या यादीत ही मते सर्वात कमी होती. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019