शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

पाच वर्षांत वाढला दुपटीने निकाल !

By admin | Updated: June 3, 2014 00:45 IST

भालचंद्र येडवे , लातूर विभागीय मंडळाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांमुळे गत पाच वर्षात या विभागाचा निकाल दुपटीने वाढल्याचे चित्र निकालाअंती स्पष्ट झाले़

 भालचंद्र येडवे , लातूर एकेकाळी या ना त्या कारणाने संपूर्ण राज्यभर गाजत असलेल्या लातूर विभागीय मंडळाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांमुळे शिवाय विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी घेतलेल्या परीक्षेच्या गांभीर्यामुळेच गत पाच वर्षात या विभागाचा निकाल दुपटीने वाढल्याचे चित्र सोमवारी निकालाअंती स्पष्ट झाले़ लातूर विभागीय मंडळांतर्गत असलेल्या नांदेड, लातूर व उस्मानाबाद या तीन जिल्ह्याच्या गत पाच वर्षाच्या निकालावर नजर मारली असता मार्च २०१० मध्ये ४७़५९ टक्क्यांवरून मार्च २०१४ मध्ये ९०़६० वर हा निकाल जाऊन पोहोचला आहे़ दरवर्षी लातूर विभागाच्या निकालाचा आलेख वाढतच आहे़ २०१० मध्ये ४७़५९, २०११ - ५६़५७, २०१२ - ७५़४६, २०१३ - ८३़५४ तर २०१४ मध्ये ९०़६० टक्यांवर जावून पोहोचला आहे़ चार ते पाच वर्षांपूर्वी मास कॉपी व शेकडोंवर गैरप्रकार होत असलेल्या या विभागात आता गैरप्रकाराची आकडेवारीही नगण्य होत चालली आहे़ यंदा मार्च २०१४ मध्ये केवळ २२ विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळून आले़ त्यात लातूर ८, नांदेड ४ तर उस्मानाबाद १० अशी संख्या आहे़ याची टक्केवारी पाहिली असता ०़०३ अशी आहे़ या निकालाचे विशेष वैशिष्ट्ये म्हणजे विभागात एकही शाळा शून्य टक्के निकाल असलेली उपलब्ध नाही, असा दावाही मंडळाने केला. (कौतुक गुणवंतांचे हॅलो ३ वर) सकारात्मक बदल... परीक्षेतील प्रतिबंधक उपाययोजना म्हणून मंडळाने यंदा राज्यात पहिल्यांदाच एक उपक्रम हाती घेतला आहे़ लातूर विभागीय मंडळातील अधिकारी- कर्मचार्‍यांची विशेष पथके नेमून प्रत्येक केंद्रावर या पथकांना परीक्षा संपेपर्यंत थांबण्याबाबत सूचना दिल्या होत्या़ शिवाय, अचानकपणे परीक्षा संपल्याबरोबर कोणत्याही एका केंद्रावरील संपूर्ण उत्तर पत्रिका आपल्या ताब्यात घेत हे पथक थेट मंडळ गाठले़ मंडळ अचानकपणे राबवित असलेल्या या उपक्रमामुळे परीक्षेशी संबंधित घटकांच्या विशिष्ट वैचारिक मनोवृत्तीमध्ये सकारात्मक बदल व गैरप्रकार कमी होण्यास मदत झाल्याचा दावाही मंडळ करीत आहे़ वाणिज्य शाखेचा सर्वाधिक निकाल लागला असून, ९२़९० टक्के या शाखेची टक्केवारी आहे़ त्यापाठोपाठ विज्ञान शाखेचा क्रमांक लागतो़ लातूर विभागात विज्ञान शाखेचा ९२़३७, कला ८८़५७, वाणिज्य ८२़९०, एचएससी व्होकेशनल ८८़३९ असा निकाल लागला आहे़ चित्रिकरण केलेल्या परीक्षा केंद्रांची चौकशी बारावी परीक्षेदरम्यान, संपूर्ण राज्यभरात ३१७ परीक्षा केंद्रांचे चित्रिकरण करण्यात आले होते. पैकी लातूर विभागातील १८९ केंद्रांपैकी काही उपद्रवी केंद्रांसह एकूण ५१ केंद्रांचे चित्रिकरण करण्यात आले आहे. कोणत्याही क्षणी या केंद्रांची चौकशी होईल, असे मंडळाच्या सूत्रांकडून समजते. लातूर जिल्ह्यात २४३ कनिष्ठ महाविद्यालयांसाठी ७६ केंद्रांवर परीक्षा झाली. २८ हजार ९२६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी २८ हजार ८५५ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. त्यातील २६ हजार ४३९ विद्यार्थी यशस्वी झाले असून, लातूर जिल्ह्याचा ९१.६३ टक्के निकाल लागला आहे. मुलींचा टक्का वाढताच ! बारावीच्या परीक्षेत विभागामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही निकालात मुलींचा टक्का वाढता आहे. विभागात परीक्षेस बसलेल्या मुलां-मुलींपैकी मुलांची टक्केवारी ८८.४५ तर मुलींची ९३.७९ टक्के आहे. याही परीक्षेत ६ टक्क्यांनी मुली पुढे आहेत.