शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
2
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
3
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
4
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
5
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
6
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
7
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
8
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
9
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
10
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
11
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
12
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
13
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात
14
३० फेब्रुवारीला काढलं बिल, सिमेंटच्या दुकानातून कॉस्मेटिक्सची खरेदी, सरकारी भ्रष्टाचाराची हद्द  
15
३० टक्क्यांनी घसरलाय हा मल्टीबॅगर स्टॉक, अजून घसरण होणार का? काय म्हणताहेत एक्सपर्ट
16
Himanshi Tokas : लय भारी! हिमांशी टोकस ठरली जगातील नंबर १ ज्युडो खेळाडू; आजीच्या झाडूने बनवलं चॅम्पियन
17
बरेली हिंसाचार प्रकरण; मौलाना तौकीर रजाला अटक, 14 दिवसांची पोलीस कोठडी, 10 FIR दाखल
18
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
19
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
20
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल

चार हजार गावांसाठी पाच हजार कोटींचा प्रकल्प

By admin | Updated: September 18, 2016 01:57 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील ४ हजार गावांच्या विकासाचा पाच हजार कोटींचा प्रकल्प राबविण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात केली.

औरंगाबाद : जागतिक बँकेच्या साह्याने मराठवाड्यातील ४ हजार गावांच्या विकासाचा पाच हजार कोटींचा प्रकल्प राबविण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात केली. दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या ‘वॉटर ग्रीड’साठी लवकरच मंत्रिमंडळाची मान्यता घेण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले. मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने सिद्धार्थ उद्यानातील मुक्तिसंग्राम स्तंभाला पुष्पचक्र अर्पण, हुताम्यांना श्रद्धांजली आणि ध्वजारोहणाचा कार्यक्रम फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री रामदास कदम, जिल्ह्यातील आमदार, खासदार, अधिकारी आणि स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.....................मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन हा मराठवाड्याच्या विकासाचा संकल्प करण्याचा दिवस असल्याचे सांगून फडणवीस म्हणाले की, जागतिक बँकेच्या साह्याने चार हजार गावांमध्ये शेती, पाणी, कृषी उत्पादन आणि विपणन यावर आधारित प्रकल्प राबविण्यात येणार आहे. हा देशाच्या इतिहासातील पहिलाच प्रयोग असणार आहे. यातून मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळेल. मागील वर्षी भीषण दुष्काळातही जलयुक्त शिवाराची कामे चांगल्या पद्धतीने झाल्याने अकराशे गावे दुष्काळमुक्त झाली आहेत. यंदाही पाचशे गावे दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प आहे, असे ते म्हणाले. मराठवाड्यासाठी वॉटर ग्रीड तयार करण्याचे काम सुरू आहे. त्याचा आराखडा तयार होत आहे. या प्रकल्पाला लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात येईल. मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळण्याची कृती सुरू झाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. मुक्तिसंग्राम हुतात्मा स्तंभाला मुख्यमंत्री, हरिभाऊ बागडे, रामदास कदम, महापौर त्र्यंबक तुपे, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन आदींनी पुष्पचक्र वाहिले. यावेळी पोलिसांकडून बंदुकांच्या फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यसैनिकांची आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना मुक्तिसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला खा.चंद्रकांत खैरे, खा. रावसाहेब दानवे, आ. अब्दुल सत्तार, आ. संजय शिरसाट, आ. प्रशांत बंब, आ. नारायण कुचे, आ. अतुल सावे, वक्फ बोर्डाचे चेअरमन एम. एम. शेख, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, विशेष पोलीस महानिरीक्षक अजित पाटील, पोलीस आयुक्त अमितेशकुमार, जिल्हाधिकारी निधी पांडे, महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड, पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी आदींसह शहरातील विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. समृद्धी कॉरिडॉरमधून विकासआगामी काळात मराठवाड्यातील सर्व जिल्हे सहा तासांच्या अंतराने मुंबईशी जोडणारा समृद्धी कॉरिडॉर प्रकल्प राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचा माल जेएनपीटी बंदरात सहा तासांच्या आत पोहोचला पाहिजे, असा शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणणारा हा मार्ग असणार आहे. कृषी क्षेत्रासाठी शीतगृहांची साखळी तयार करण्याचे कामही करण्यात येणार आहे, असे फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.