शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

चार हजार गावांसाठी पाच हजार कोटींचा प्रकल्प

By admin | Updated: September 18, 2016 01:57 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील ४ हजार गावांच्या विकासाचा पाच हजार कोटींचा प्रकल्प राबविण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात केली.

औरंगाबाद : जागतिक बँकेच्या साह्याने मराठवाड्यातील ४ हजार गावांच्या विकासाचा पाच हजार कोटींचा प्रकल्प राबविण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात केली. दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या ‘वॉटर ग्रीड’साठी लवकरच मंत्रिमंडळाची मान्यता घेण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले. मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने सिद्धार्थ उद्यानातील मुक्तिसंग्राम स्तंभाला पुष्पचक्र अर्पण, हुताम्यांना श्रद्धांजली आणि ध्वजारोहणाचा कार्यक्रम फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री रामदास कदम, जिल्ह्यातील आमदार, खासदार, अधिकारी आणि स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.....................मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन हा मराठवाड्याच्या विकासाचा संकल्प करण्याचा दिवस असल्याचे सांगून फडणवीस म्हणाले की, जागतिक बँकेच्या साह्याने चार हजार गावांमध्ये शेती, पाणी, कृषी उत्पादन आणि विपणन यावर आधारित प्रकल्प राबविण्यात येणार आहे. हा देशाच्या इतिहासातील पहिलाच प्रयोग असणार आहे. यातून मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळेल. मागील वर्षी भीषण दुष्काळातही जलयुक्त शिवाराची कामे चांगल्या पद्धतीने झाल्याने अकराशे गावे दुष्काळमुक्त झाली आहेत. यंदाही पाचशे गावे दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प आहे, असे ते म्हणाले. मराठवाड्यासाठी वॉटर ग्रीड तयार करण्याचे काम सुरू आहे. त्याचा आराखडा तयार होत आहे. या प्रकल्पाला लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात येईल. मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळण्याची कृती सुरू झाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. मुक्तिसंग्राम हुतात्मा स्तंभाला मुख्यमंत्री, हरिभाऊ बागडे, रामदास कदम, महापौर त्र्यंबक तुपे, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन आदींनी पुष्पचक्र वाहिले. यावेळी पोलिसांकडून बंदुकांच्या फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यसैनिकांची आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना मुक्तिसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला खा.चंद्रकांत खैरे, खा. रावसाहेब दानवे, आ. अब्दुल सत्तार, आ. संजय शिरसाट, आ. प्रशांत बंब, आ. नारायण कुचे, आ. अतुल सावे, वक्फ बोर्डाचे चेअरमन एम. एम. शेख, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, विशेष पोलीस महानिरीक्षक अजित पाटील, पोलीस आयुक्त अमितेशकुमार, जिल्हाधिकारी निधी पांडे, महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड, पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी आदींसह शहरातील विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. समृद्धी कॉरिडॉरमधून विकासआगामी काळात मराठवाड्यातील सर्व जिल्हे सहा तासांच्या अंतराने मुंबईशी जोडणारा समृद्धी कॉरिडॉर प्रकल्प राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचा माल जेएनपीटी बंदरात सहा तासांच्या आत पोहोचला पाहिजे, असा शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणणारा हा मार्ग असणार आहे. कृषी क्षेत्रासाठी शीतगृहांची साखळी तयार करण्याचे कामही करण्यात येणार आहे, असे फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.