शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

पाचशे गावांना चारशे टँकरने पाणी

By admin | Updated: June 2, 2014 01:35 IST

औरंगाबाद : मेअखेरीस मराठवाड्यातील पाणीटंचाईने आणखीनच भीषण स्वरूप धारण केले आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत विभागातील टँकरची संख्या १४४ ने वाढली आहे.

औरंगाबाद : मेअखेरीस मराठवाड्यातील पाणीटंचाईने आणखीनच भीषण स्वरूप धारण केले आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत विभागातील टँकरची संख्या १४४ ने वाढली आहे. सध्या विभागात एकूण ३९५ टँकरच्या माध्यमातून पाचशे गावांना पाण्याचा पुरवठा केला जात आहे. मराठवाड्यात यंदाही जानेवारी महिन्यापासूनच पाणीटंचाई जाणवत आहे. मात्र, सुरुवातीला टंचाईची तीव्रता काही गावांपुरतीच मर्यादित होती. एप्रिल महिन्यापासून ही तीव्रता वाढली असून, दिवसेंदिवस नवनवीन गावे पाणीटंचाईच्या फेर्‍यात येत आहेत. मागील आठवड्यात मराठवाड्यात २५१ टँकर सुरू होते. चालू आठवड्यात ही संख्या ३९५ झाली आहे. परभणी आणि हिंगोली हे दोन जिल्हे वगळता इतर सहा जिल्ह्यांमध्ये सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक १३५ गावांना १७७ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तर सर्वात कमी ५ टँकर लातूर जिल्ह्यात सुरू आहेत. टँकरशिवाय अनेक गावांत त्याच ठिकाणी विहिरी अधिग्रहित करूनही पाणीपुरवठा केला जात आहे. विभागात एकूण ६९९ खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात २३९, जालना जिल्ह्यात १६, नांदेड जिल्ह्यात १४, बीड जिल्ह्यात २६६, लातूर जिल्ह्यात ४५ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ११९ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. मागील आठवड्यात अधिग्रहित विहिरींची संख्या ३७२ होती. चालू आठवड्यात त्यात आणखी ३२७ ची भर पडली आहे. सध्या अधिग्रहित करण्यात आलेल्या ६९९ विहिरींपैकी २०० विहिरी या टँकर भरण्यासाठी अधिग्रहित केल्या गेल्या आहेत. जिल्हाटँकर औरंगाबाद१७७ जालना०७ नांदेड१७ बीड१२९ लातूर०५ उस्मानाबाद६० एकूण३९५