शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

पंचायत विकास निर्देशांक स्पर्धेत उतरणार पाच ग्रामपंचायती

By विकास राऊत | Updated: January 6, 2024 13:20 IST

८७० पैकी ४४ ग्रामपंचायतींनी वाढविला उत्तम निर्देशांक

छत्रपती संभाजीनगर : गावांच्या शाश्वत विकासासाठी विविध कल्याणकारी योजना हाती घेण्यात आल्या असून, केवळ योजनाच नाही, तर ग्रामपंचायतस्तरावर आरोग्य, सार्वजनिक सुविधा, महिलांची प्रगती, शिक्षण तसेच कचरा आणि सांडपाण्याचे उत्तम नियोजन यावर मागील काही महिन्यांपासून सर्वच काम केले जात आहे. आता याच कामांवर पंचायत विकास निर्देशांक ठरणार असून, एप्रिलमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत ४४ पैकी जिल्ह्यातील उत्कृष्ट निर्देशांक असलेल्या ५ ग्रामपंचायती सहभागी करण्याचा जिल्हा परिषदेचा प्रयत्न आहे.

केंद्र शासनाने गावांची समृद्धी वाढविण्यासाठी तिथे शाश्वत विकासाच्या कामांवर भर देण्याचे निर्देश दिले आहेत. या माध्यमातून नऊसुत्री कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये गरिबीमुक्त गाव, आरोग्यदायी गाव, बाल-स्नेही गाव, जलसमृद्ध गाव, स्वच्छ हरित गाव, पायाभूत सुविधांनी युक्त गाव, सामाजिक न्याय व सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव, सुशासनयुक्त गाव, महिलास्नेही गाव आदींचा समावेश असणार आहे. यावरच ग्रामपंचायतींचा ‘पंचायत विकास निर्देशांक’ (पीडीआय) ठरणार आहे.

सन २०२२ - २३ मधील माहितीच्या आधारावर हा निर्देशांक तयार करण्यात येणार आहे. या निर्देशांकामध्ये ग्रामपंचायत विकासाच्या कमकुवत बाबी व बलस्थाने निश्चित होणार आहेत. या माध्यमातून निर्माण होणारा माहिती संग्रह जिल्हा, राज्य व केंद्र पातळीवर विकास नियोजन प्रक्रियेसाठी वापरण्यात येणार आहे. या निर्देशांकाचा उपयोग ग्रामपंचायतींना कोणती कामे तसेच कोणते उपक्रम राबवायचे आहेत, यासाठी दिशादर्शक म्हणून उपयोगात येणार असून, सन २०२३- २४ मध्ये तयार होणारा हा निर्देशांक बेसलाइन इन्फॉर्मेशन म्हणून वापरला जाणार आहे.

विकासाची स्पर्धा असावीजिल्ह्यात विकासकामे राबविली जात आहेतच. पण, गावागावात विकासाची स्पर्धा झाली पाहिजे. म्हणूनच केंद्र शासनाने ‘पंचायत विकास निर्देशांक’ (पीडीआय) निश्चित करून राज्य व राष्ट्रीय स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या जिल्ह्यातील ४४ ग्रामपंचायतींचा विकास निर्देशांक चांगला आहे. तरीही अत्युत्तम निर्देशांक असणाऱ्या ५ ग्रामपंचायती राज्य स्पर्धेत सहभागी करण्याचा आपला विचार आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgram panchayatग्राम पंचायत