शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पंचायत विकास निर्देशांक स्पर्धेत उतरणार पाच ग्रामपंचायती

By विकास राऊत | Updated: January 6, 2024 13:20 IST

८७० पैकी ४४ ग्रामपंचायतींनी वाढविला उत्तम निर्देशांक

छत्रपती संभाजीनगर : गावांच्या शाश्वत विकासासाठी विविध कल्याणकारी योजना हाती घेण्यात आल्या असून, केवळ योजनाच नाही, तर ग्रामपंचायतस्तरावर आरोग्य, सार्वजनिक सुविधा, महिलांची प्रगती, शिक्षण तसेच कचरा आणि सांडपाण्याचे उत्तम नियोजन यावर मागील काही महिन्यांपासून सर्वच काम केले जात आहे. आता याच कामांवर पंचायत विकास निर्देशांक ठरणार असून, एप्रिलमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत ४४ पैकी जिल्ह्यातील उत्कृष्ट निर्देशांक असलेल्या ५ ग्रामपंचायती सहभागी करण्याचा जिल्हा परिषदेचा प्रयत्न आहे.

केंद्र शासनाने गावांची समृद्धी वाढविण्यासाठी तिथे शाश्वत विकासाच्या कामांवर भर देण्याचे निर्देश दिले आहेत. या माध्यमातून नऊसुत्री कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये गरिबीमुक्त गाव, आरोग्यदायी गाव, बाल-स्नेही गाव, जलसमृद्ध गाव, स्वच्छ हरित गाव, पायाभूत सुविधांनी युक्त गाव, सामाजिक न्याय व सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव, सुशासनयुक्त गाव, महिलास्नेही गाव आदींचा समावेश असणार आहे. यावरच ग्रामपंचायतींचा ‘पंचायत विकास निर्देशांक’ (पीडीआय) ठरणार आहे.

सन २०२२ - २३ मधील माहितीच्या आधारावर हा निर्देशांक तयार करण्यात येणार आहे. या निर्देशांकामध्ये ग्रामपंचायत विकासाच्या कमकुवत बाबी व बलस्थाने निश्चित होणार आहेत. या माध्यमातून निर्माण होणारा माहिती संग्रह जिल्हा, राज्य व केंद्र पातळीवर विकास नियोजन प्रक्रियेसाठी वापरण्यात येणार आहे. या निर्देशांकाचा उपयोग ग्रामपंचायतींना कोणती कामे तसेच कोणते उपक्रम राबवायचे आहेत, यासाठी दिशादर्शक म्हणून उपयोगात येणार असून, सन २०२३- २४ मध्ये तयार होणारा हा निर्देशांक बेसलाइन इन्फॉर्मेशन म्हणून वापरला जाणार आहे.

विकासाची स्पर्धा असावीजिल्ह्यात विकासकामे राबविली जात आहेतच. पण, गावागावात विकासाची स्पर्धा झाली पाहिजे. म्हणूनच केंद्र शासनाने ‘पंचायत विकास निर्देशांक’ (पीडीआय) निश्चित करून राज्य व राष्ट्रीय स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या जिल्ह्यातील ४४ ग्रामपंचायतींचा विकास निर्देशांक चांगला आहे. तरीही अत्युत्तम निर्देशांक असणाऱ्या ५ ग्रामपंचायती राज्य स्पर्धेत सहभागी करण्याचा आपला विचार आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgram panchayatग्राम पंचायत