शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

१५ हजार शेतकºयांसाठी सव्वा पाच कोटींचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 00:09 IST

जिल्ह्यातील ११ कृषी उत्पन्न बाजार समितींमध्ये सोयाबीन विक्री केलेल्या १५ हजार ५६८ शेतकºयांनी शासनाच्या अनुदानासाठी अर्ज केले होते. या शेतकºयांना २०० रु. प्रति क्विंटल या प्रमाणे ५ कोटी २६ लाख ७५ हजार १०२ रुपयांचे अनुदान शासनाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे वर्ग केले आहे.

मारोती जुंबडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील ११ कृषी उत्पन्न बाजार समितींमध्ये सोयाबीन विक्री केलेल्या १५ हजार ५६८ शेतकºयांनी शासनाच्या अनुदानासाठी अर्ज केले होते. या शेतकºयांना २०० रु. प्रति क्विंटल या प्रमाणे ५ कोटी २६ लाख ७५ हजार १०२ रुपयांचे अनुदान शासनाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे वर्ग केले आहे.राज्यात तीन वर्षे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी जिल्ह्यात कृषी उत्पादनात मोठी घट झाली. उत्पादन कमी झाल्याने डाळींसह तेलबियांचे भाव गगनाला भिडले होते. त्यामुळे खरीप हंगाम २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकºयांना तेलबिया व डाळींचे जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील शेतकºयांनी सोयाबीन व तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले. परंतु, जिल्ह्यातील ११ कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाºया व्यापाºयांनी कवडीमोल भावाने सोयाबीन खरेदी केले. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांमध्ये शासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत होती.या पार्श्वभूमीवर सोयाबीन उत्पादकांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला. १ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन विक्री केलेल्या शेतकºयांना प्रति क्विंटल २०० रुपये व जास्तीत जास्त २५ क्विंटलपर्यंत म्हणजेच ५ हजार रुपयांपर्यंत अनुदान मंजूर केले. सोयाबीन उत्पादकांनी ३१ जानेवारी २०१७ पूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे आपले अर्ज सादर केले. त्यानुसार परभणी, ताडकळस, पूर्णा, जिंतूर, बोरी, सेलू, पाथरी, मानवत, गंगाखेड, पालम, सोनपेठ या ११ बाजार समित्यांमधून १५ हजार ५६८ सोयाबीन उत्पादक शेतकºयांनी आपले अर्ज अनुदानासाठी दाखल केले होते. हे अर्ज बाजार समितीने जिल्हा उपनिबंधकांकडे दाखल केले. त्यानंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने बाजार समित्यांकडून प्राप्त अर्ज पणन संचालनालयाकडे पाठविले होते. गत एक वर्षापासून शासनाकडे जिल्ह्यातील १५ हजार ५६८ सोयाबीन उत्पादक शेतकºयांचे ५ कोटी २६ लाख ७५ हजार १०२ रुपयांचे अनुदान बाकी होते. हे अनुदान मिळविण्यासाठी लाभार्थ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे फेºया सुरु केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर तब्बल १ वर्षानंतर शासनाने जिल्ह्यातील शेतकºयांना सव्वा पाच कोटी रुपयांचे अनुदान वर्ग केले आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.