शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत एमआयएमचे पाच नगरसेवक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : महापौरांवर खुर्ची भिरकावल्याच्या प्रकरणात एमआयएमच्या दोन नगरसेवकांची शुक्रवारी थेट हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आलेली ...

ठळक मुद्देअतिक्रमण हटाव कारवाई अंगलट : विरोधी पक्षनेता, गटनेत्यासह तीन जणांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापौरांवर खुर्ची भिरकावल्याच्या प्रकरणात एमआयएमच्या दोन नगरसेवकांची शुक्रवारी थेट हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आलेली असताना शनिवारी महापालिकेच्या सर्वोच्च सभागृहात पाच नगरसेवकांनी अतिक्रमण हटावच्या कारवाईत हस्तक्षेप केल्याच्या आरोपावरून त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. हा ठराव शासनाकडे त्वरित पाठवून देण्याचे आदेशही महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले. शासनानेही उद्या नगरसेवक पद रद्द करण्यास हिरवा कंदिल दाखविला तर एमआयएम पक्ष संकटात सापडणार आहे.या पाच जणांचे पद जणारच्विरोधी पक्षनेता फेरोज खान, गटनेता नासेर सिद्दीकी, नगरसेवक जमीर कादरी, नगरसेविका सरवत बेगम आरेफ हुसैनी, साजेदा सईद फारुकी यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा ठराव घेण्यात आला. कारवाईत नगरसेविका सरवत बेगम यांचे पती आरेफ हुसैनी, साजेदा बेगम यांचे पती सईद फारुकी हस्तक्षेप करीत असल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे.नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव मंजूरच्तब्बल पाच तास चाललेल्या मॅरेथॉन चर्चेनंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी सायंकाळी जाहीर केले की, दमडी महल प्रकरणात एमआयएमच्या नगरसेवकांनी, त्यांच्या नातेवाईकांनी कारवाईत हस्तक्षेप केल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. यापूर्वीही मनपा अधिकाºयांना धमकावणे, अनधिकृत बांधकामांमध्ये हस्तक्षेप करणे, आदी असभ्य वर्तणूक नगरसेवकांनी केलेली आहे. महाराष्टÑ महापालिका अधिनियम १०-१-ड नुसार दोषी नगरसेवकांवर कारवाई करावी. कलम १०-१-१-अ अनुसार शासनाकडे त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यासाठी पाठविण्यात यावे, असा ठराव मंजूर केला. हा ठराव त्वरित शासनाकडे पाठविण्याची व्यवस्था आयुक्तांनी कारवाई असेही त्यांनी नमूद केले.जागा शासनाची अन्...रस्ता रुंदीकरणात श्रीराम पवार यांचे घर मनपाकडून पाडण्यात आले. नेमकी ही जागा कोणाच्या मालकीची होती, असा प्रश्न नगरसेवक जंजाळ यांनी उपस्थित केला. नगररचना विभागाचे सहायक नगररचनाकार जयंत खरवडकर उत्तर देण्यासाठी उभे राहताच नगरसेवक राजगौरव वानखेडे यांनी त्यांना कडाडून विरोध केला. त्यांची नियुक्तीच नगररचनामध्ये नसताना ते उत्तर कसे देणार? यावर उपअभियंता ए.बी. देशमुख यांनी उत्तर दिले. मूळ जागा महसूल विभागाची होती, असे त्यांनी सभागृहात सांगितले. महापालिकेने परस्पर जागा कशी ताब्यात घेतली. महसूल विभागाने महापालिकेला आमच्या जागेवरील अतिक्रमण काढा, असे पत्र दिले होते का? मनपा परस्पर जाऊन जागा कशी काढू शकते. यावर प्रशासन निरुत्तर झाले.