शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

रात्री १२ वाजेनंतरही अग्निशमन विभाग अलर्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:02 IST

रिॲलिटी चेक- अग्निशमन विभाग कार्यालय रात्री १.०० मुजीब देवणीकर औरंगाबाद : महापालिकेचा कारभार औरंगाबादकरांना सर्वश्रुत आहेच. मात्र, अग्निशमन विभाग ...

रिॲलिटी चेक-

अग्निशमन विभाग कार्यालय रात्री १.००

मुजीब देवणीकर

औरंगाबाद : महापालिकेचा कारभार औरंगाबादकरांना सर्वश्रुत आहेच. मात्र, अग्निशमन विभाग नेहमी अलर्ट असल्याची प्रचीती अनेकदा सर्वांनाच आलेली आहे. ‘लोकमत’ने शनिवारी रात्री पदमपुरा अग्निशमन कार्यालयात रिॲलिटी चेक केली असता कर्मचारी जागे होते. कॉल येताच अवघ्या दोनच मिनिटांमध्ये कर्मचारी घटनास्थळी जातील, यादृष्टीने दोन पाण्याचे बंबही तयार होते. मंगळवारी ७ सप्टेंबर रोजी शहरात पावसाने दाणादाण उडविली असता अग्निशमन विभागाचे कर्मचारी सर्व ठिकाणी मदतीला धावून गेले होते.

मराठवाड्याच्या डिझास्टर मॅनेजमेंटची जबाबदारी राज्य शासनाने महापालिकेच्या अग्निशमन विभागावर सोपविली आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत अग्निशमन विभागाला इतर जिल्ह्यांमध्येही जाऊन काम करावे लागते. सध्या पावसाळा असल्याने पुरात वाहून गेल्याचे कॉल सर्वाधिक येत असतात. बाहेरगावी एक वाहन पाठवावे लागते. वाहनासोबत कुशल कर्मचारी पाठवावे लागतात. शहरात कोणत्याही क्षणी काॅल आला, तर अग्निशमन विभागाला अलर्ट राहावेच लागते. शनिवारी रात्री ‘लोकमत’ने पडताळणी केली असता सर्व कर्मचारी प्रामाणिकपणे अलर्ट मोडवर असल्याचे दिसून आले.

तयार स्थितीत दोन बंब

रात्री १२ वाजेनंतर शहरात आणि इतर जिल्ह्यांमध्ये छोटी-मोठी घटना घडली, तर सर्वांत अगोदर अग्निशमन विभागालाच धाव घ्यावी लागते. पावसाळ्यात आग लागल्याच्या घटना क्वचितच घडतात. पाऊस झाल्यानंतर अनेक सखल भागांतील वसाहतींमध्ये पाणी शिरण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे दोन पाण्याचे बंब, पाण्याच्या उपसा करणाऱ्या मोटारी, मोठी शिडी आदी सर्व साहित्यांसह वाहन उभे होते. सिडको येथील कार्यालयातही अशाच पद्धतीने वाहने अलर्ट मोडवर असतात, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

पीबीएक्सवर येतो पहिला कॉल

अग्निशमन विभागाचे दूरध्वनी क्रमांक नागरिकांना देण्यात आले आहेत. काही घटना घडल्यास नागरिक पीबीएक्सवर फोन करतात. २४ तास येथे कायमस्वरूपी, कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली असते. कॉल उचलला नाही, असे कधीच होत नाही. रात्रीही डोळ्यात तेल घालून कर्मचारी जागे असतात. येथे झोपण्याची अजिबात सोय नाही. शेजारी कोरोना सेंटर असल्याने रात्रीही वर्दळ कायम असते.

नियम काय सांगतो

अग्निशमन विभागाला एखाद्या घटनेची माहिती नागरिकांनी दिल्यानंतर त्वरित वाहन पाठविणे हा नियम आहे. एखाद्या ठिकाणी वाहन गेलेले असेल तर ते वाहन परत आल्याशिवाय दुसरीकडे वाहन पाठविता येत नाही. पदमपुरा येथे ३, चिकलठाणा येथे १, तर सिडकोत एक वाहन २४ तास अलर्ट असते. मोठी घटना असल्यास दोन्ही केंद्रांवरील वाहनेही त्या ठिकाणी बोलावून घेण्यात येतात.

२४ तास कर्मचारी सतर्क

अग्निशमन विभागात रात्री कर्मचाऱ्यांना झोपता येत नाही. कर्मचारी बसून असतात, पण कधीच झोपत नाहीत. रात्री १२ वाजेनंतर अनेकदा अधिक कॉल असतात. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी २४ तास सतर्कच असतात.

आर. के. सुरे, अग्निमशन अधिकारी, मनपा