शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
3
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
4
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
5
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
6
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
7
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
8
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
9
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
10
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
11
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
12
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
13
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
14
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
15
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
16
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
17
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
18
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
19
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
20
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा

फटाका आग प्रकरणाचा अहवाल मंत्रालयात; पंचनामे ११ कोटींचे झाले मात्र नुकसानभरपाई कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 17:37 IST

जिल्हा परिषद मैदानावरील फटाका मार्केटला आॅक्टोबर २०१६ मध्ये आग लागल्यामुळे ११ कोटींच्या आसपास नुकसान झाल्याचा पंचनामा अहवाल महसूल प्रशासनाने शासनाकडे पाठविला; परंतु त्यामध्ये अद्याप एक रुपयाची नुकसानभरपाईदेखील संबंधितांना मिळाली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

ठळक मुद्दे आॅक्टोबर २०१६ मध्ये जिल्हा परिषद मैदानावर लागलेल्या भयावह आगीत १४० फटाक्यांची दुकाने जळून राख झाली होती. यात एकूण १० कोटी ५८ लाख ३७ हजार ६७० रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार केला.

औरंगाबाद : जिल्हा परिषद मैदानावरील फटाका मार्केटला आॅक्टोबर २०१६ मध्ये आग लागल्यामुळे ११ कोटींच्या आसपास नुकसान झाल्याचा पंचनामा अहवाल महसूल प्रशासनाने शासनाकडे पाठविला; परंतु त्यामध्ये अद्याप एक रुपयाची नुकसानभरपाईदेखील संबंधितांना मिळाली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी तहसीलदार सतीश सोनी यांना याप्रकरणी पत्रकारांसमक्ष विचारले असता सोनी म्हणाले, ११ कोटींचे नुकसान झाल्याचे पंचनामे सादर केले आहेत. दरम्यान, त्या पंचनाम्यांना दोन वर्षे होत आली आहेत, अजून नुकसान झालेल्या संबंधितांना मदत मिळालेली नाही. आॅक्टोबर २०१६ मध्ये जिल्हा परिषद मैदानावर लागलेल्या भयावह आगीत १४० फटाक्यांची दुकाने जळून राख झाली होती. शेकडो वाहनेदेखील त्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. त्याचे पंचनामे महसूल प्रशासनाने केले होते. जिल्हा परिषद मैदानावरील फटाका बाजारात २९ आॅक्टोबर २०१६ रोजी झालेल्या अग्नितांडवात फटाक्यांच्या १४० दुकानांसह ११२ वाहनेही जळाली. या वाहनांत चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा समावेश होता. यात एकूण १० कोटी ५८ लाख ३७ हजार ६७० रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार केला. मंडप व वाहने मिळून ११ कोटींपर्यंतचे नुकसान झाल्याचे पंचनामे करण्यात आले. ही मदत आजवर मिळालेली नाही.

या पंचनाम्यांचे असे होऊ नये आॅक्टोबर २०१६ मध्ये केलेले पंचनामे अजून शासनदरबारी धूळ खात पडले असतील तर, १२ मे २०१८ रोजी शहरातील राजाबाजार, नवाबपुरा, शहागंज, मोतीकारंजा, गुलमंडी, गांधीनगर या भागांत झालेल्या दंगलीत जे नुकसान झाले त्याच्या भरपाईच्या पंचनाम्यांचे काय होणार व संबंधितांना मदत केव्हा मिळणार, असा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचा दावा केला आहे. 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद