शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

मुलींच्या लग्नासाठी ठेवलेल्या ठेवी मिळेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2015 00:37 IST

उस्मानाबाद : मागील तीन-चार वर्षांपासून चलन तुटवड्याचा सामना करणाऱ्या जिल्हा बँक निवडणुकीच्या आखाड्यात सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी उडी घेतली आहे.

उस्मानाबाद : मागील तीन-चार वर्षांपासून चलन तुटवड्याचा सामना करणाऱ्या जिल्हा बँक निवडणुकीच्या आखाड्यात सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी उडी घेतली आहे. या पक्षांकडून बँक अविरोध काढण्याची भाषा केली जात असली तरी अद्याप कुठलाही तोडगा निघालेला नाही. असे असतानाच दुसरीकडे मात्र, सर्वसामान्यांना त्यांच्या हक्काच्या ठेवी मिळत नाहीत. मुलीच्या ठेवलेल्या ठेवीही मिळत नसल्याने गुरूवारी काही जणांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी धाव घेतली.तुळजापूर तालुक्यातील किलज येथील मधुकर गुरसिद्ध कांबळे यांनी सलगरा (दी) येथील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेत स्वत:च्या नावे सहा हजार रूपये. तसेच पत्नी गोपाबाई मधुकर कांबळे यांच्या नावे ८२ हजार रूपयांच्या ठेवी ठेवल्या होत्या. ही रक्कम मुलींच्या लग्नकार्यासाठी कामी येईल, या उद्देशाने ठेवली होती. तीन पैकी चांदणी मधुकर कांबळे हिचे लग्न ठरले आहे. त्यामुळे बँकेतील पैसे मिळावेत, यासाठी कांबळे हे मागील तीन ते चार महिन्यांपासून बँकेमध्ये चकरा मारीत आहेत. परंतु, बँकेकडून ठेवीतील छदामही मिळालेला नाही. तसेच उत्पन्नाचेही दुसरे कुठलेही साधन नाही. त्यामुळे हा विवाहसोहळा कसा पार पाडायचा? असा प्रश्न या कुटुंबासमोर उभा राहिला आहे. वारंवार खेटे मारूनही काहीच उपयोग होत नसल्याने अखेर मधुकर कांबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून डॉ. प्रशांत नारनवरे यांच्याकडे तक्रार करून ठेवी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.बडे मासे मोकाटच !सर्वसामान्य कुटुंबांनी पै-पै जमा करून बँकेत ठेवले. परंतु, हे पैसे आज त्यांना गरज असतानाही मिळत नाहीत. असे असतानाच दुसरीकडे राजकारणाशी संबंधित असलेल्या अनेकांकडे कोट्यवधीची थकबाकी आहे. अशा धकबाकीदारांविरूद्ध कारवाई करण्यास ना सत्ताधारी ना अधिकारी इच्छुक आहेत. (प्रतिनिधी)