शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

प्रगतीच्या वाटा शोधा

By admin | Updated: December 20, 2015 23:56 IST

औरंगाबाद : काळ बदलला आहे. प्रगतीची वेगवेगळी दालने खुली झालेली आहेत. प्रगतीच्या वाटा शोधा आणि जीवनात क्रांती घडवून आणा, यातून समाजऋण फेडता येईल.

औरंगाबाद : काळ बदलला आहे. प्रगतीची वेगवेगळी दालने खुली झालेली आहेत. प्रगतीच्या वाटा शोधा आणि जीवनात क्रांती घडवून आणा, यातून समाजऋण फेडता येईल. समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन निवृत्त पोलीस उपअधीक्षक विश्वासराव देशमुख यांनी व्यक्त केले. तुळजाई मराठा देशमुख प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित स्रेहमिलन सोहळ्यात देशमुख यांना ‘समाजभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. संत तुकाराम नाट्यगृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड. वीरेंद्र देशमुख होते. भोकरदनचे नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे माजी इतिहास विभागप्रमुख गुलाबराव देशमुख, दिलीपराव देशमुख, अशोकराव गरूड, देवगिरी नागरी सहकारी बँकेचे संचालक किशोर शितोडे, शिवाजी दांडगे, नरसिंगराव चव्हाण, देशमुख प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, प्रकाशराव पतंगे, चंद्रशेखर देशमुख आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी डॉ. शारदा देशमुख, किशोर शितोडे, गुलाबराव देशमुख यांचीही भाषणे झाली. संचालन प्रतिष्ठानचे संचालक राम निंबाळकर यांनी केले. मान्यवरांचा गौरव यावेळी मराठा देशमुख समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यात गणेश साळुंके, किशोर शितोडे, राजेश्वरराव कल्याणकर, फकीरा देशमुख, हरिदास निकम, अभिजित देशमुख,माधवराव देशमुख, अमोल देशमुख, प्रकाशराव देशमुख, श्याम पाटील, गौरव पतंगे, प्रल्हाद शिंदे, दिनेश देशमुख, योजना देशमुख, बापूसाहेब देशमुख, संजय गरूड, मीनाक्षी देशमुख, रणजित देशमुख, प्रकाश देवकर, शीतल देशमुख, अरूण शिंदे, पद्मजा देशमुख, अमरजित देशमुख, चंद्रकांत देशमुख, देवीदास देशमुख, अनिता देशमुख, राजेंद्र देशमुख, सुभाषराव देशमुख, सोनाली गाढे यांचा समावेश होता.