शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

आर्थिक संकटाने संयम सुटला अन् आत्महत्येसाठी मायलेकी रेल्वेरुळावर बसल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 15:18 IST

संग्रामनगर रेल्वे रुळावरील घटना 

ठळक मुद्देआर्थिक अडचणीमुळे घेतला होता आत्महत्येचा निर्णय दीड तासात दोन वेळा महिला रुळावर गेली

औरंगाबाद : पतीच्या निधनामुळे कुटुंबाचा भार अंगावर पडला. चार दिवसांपूर्वीच एका मुलीचे लग्न लावून दिले. त्यासाठी जवळ होती नव्हती तेवढी जमापुंजी खर्च झाली. दैनंदिन खर्च, घरभाडे देण्यासाठी शिल्लक काहीच नाही. त्यामुळे हतबल झालेली महिला व तिच्या मुलीने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. मायलेकी रेल्वे रुळावर जाऊनही बसल्या. मात्र, नशीब बलवत्तर म्हणून त्यांचा जीव वाचविण्यासाठी सतर्क नागरिकांना यश आले. विशेष म्हणजे दीड तासात दोन वेळा महिला रुळावर गेली आणि नागरिकांनी तिला वाचविले. यानंतर महिलेचे समुपदेशन करून जवाहरनगर पोलिसांनी मायलेकीला त्यांच्या  घरी नेऊन सोडले. ही घटना बुधवारी सायंकाळी ५.१४ ते ६.२५ दरम्यान घडली. फराह सय्यद सलीम (रा. भारतनगर), असे महिलेचे नाव आहे. 

या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, भारतनगर येथील रहिवासी महिलेच्या पतीचे ७ ते ८ महिन्यांपूर्वी निधन झाले. दोन मुलींसह ती किरायाच्या घरात राहते.  तिने चार दिवसांपूर्वीच तिच्या मोठ्या मुलीचे लग्न लावून दिले. मुलीच्या लग्नामुळे तिच्याजवळची सर्व पुंजी संपली. दैनंदिन घर खर्चासाठी त्यांच्याजवळ पैसे नव्हते. किती दिवस उधारीवर जगायचे, हा विचार करून आपल्या ८ वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन फराह सय्यद या संग्रामनगर रेल्वे रुळावर येऊन बसल्या. परिसरातील सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत गोर्डे पाटील आणि अन्य नागरिकांची त्यांच्यावर नजर पडली. यावेळी रेल्वे इंजिन येत असल्याचा आवाज आल्याने नागरिकांनी पळत जाऊन त्यांना रुळावरून उठवले आणि बाजूला केले.

यानंतर माय-लेकीस जवळच्या अपार्टमेंटखाली नेऊन बसविले आणि महिलांना बोलावून  त्यांना बोलते केले. यावेळी रडत माय-लेकीने त्यांच्यावर आर्थिक संकट आल्यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगितले. यावेळी त्यांना कामधंदा उपलब्ध करून देण्याची तयारी गोर्डे पाटील यांनी दर्शविली. यानंतर तेथील नागरिक त्यांच्या कामात व्यस्त झाल्याचे पाहून सायंकाळी ६.२५ वाजेच्या सुमारास पुन्हा या माय-लेकी रुळावर जाऊन बसल्या. त्याचवेळी रेल्वेगाडी येऊ लागली. गाडीच्या भोंग्याच्या आवाजाने पुन्हा नागरिक रुळाकडे जाताच त्यांना पुन्हा माय-लेकी दिसल्या. त्यांना पुन्हा रुळावरून उठवून बाजूला नेले. या महिलेविषयी जवाहरनगर आणि पुंडलिकनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. 

पाच मिनिटांत पोलीस घटनास्थळीजवाहरनगरचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी  घटनेचे गांभीर्य ओळखून उपनिरीक्षक गायके आणि महिला पोलीस कर्मचारी सरला हिवाळे आणि अन्य पोलिसांना घटनास्थळी पाठविले. पोलिसांनी मायलेकीची समजूत काढून त्यांना भारतनगर येथील घरी नेऊन सोडले.