शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

आर्थिक संकटाने संयम सुटला अन् आत्महत्येसाठी मायलेकी रेल्वेरुळावर बसल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 15:18 IST

संग्रामनगर रेल्वे रुळावरील घटना 

ठळक मुद्देआर्थिक अडचणीमुळे घेतला होता आत्महत्येचा निर्णय दीड तासात दोन वेळा महिला रुळावर गेली

औरंगाबाद : पतीच्या निधनामुळे कुटुंबाचा भार अंगावर पडला. चार दिवसांपूर्वीच एका मुलीचे लग्न लावून दिले. त्यासाठी जवळ होती नव्हती तेवढी जमापुंजी खर्च झाली. दैनंदिन खर्च, घरभाडे देण्यासाठी शिल्लक काहीच नाही. त्यामुळे हतबल झालेली महिला व तिच्या मुलीने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. मायलेकी रेल्वे रुळावर जाऊनही बसल्या. मात्र, नशीब बलवत्तर म्हणून त्यांचा जीव वाचविण्यासाठी सतर्क नागरिकांना यश आले. विशेष म्हणजे दीड तासात दोन वेळा महिला रुळावर गेली आणि नागरिकांनी तिला वाचविले. यानंतर महिलेचे समुपदेशन करून जवाहरनगर पोलिसांनी मायलेकीला त्यांच्या  घरी नेऊन सोडले. ही घटना बुधवारी सायंकाळी ५.१४ ते ६.२५ दरम्यान घडली. फराह सय्यद सलीम (रा. भारतनगर), असे महिलेचे नाव आहे. 

या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, भारतनगर येथील रहिवासी महिलेच्या पतीचे ७ ते ८ महिन्यांपूर्वी निधन झाले. दोन मुलींसह ती किरायाच्या घरात राहते.  तिने चार दिवसांपूर्वीच तिच्या मोठ्या मुलीचे लग्न लावून दिले. मुलीच्या लग्नामुळे तिच्याजवळची सर्व पुंजी संपली. दैनंदिन घर खर्चासाठी त्यांच्याजवळ पैसे नव्हते. किती दिवस उधारीवर जगायचे, हा विचार करून आपल्या ८ वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन फराह सय्यद या संग्रामनगर रेल्वे रुळावर येऊन बसल्या. परिसरातील सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत गोर्डे पाटील आणि अन्य नागरिकांची त्यांच्यावर नजर पडली. यावेळी रेल्वे इंजिन येत असल्याचा आवाज आल्याने नागरिकांनी पळत जाऊन त्यांना रुळावरून उठवले आणि बाजूला केले.

यानंतर माय-लेकीस जवळच्या अपार्टमेंटखाली नेऊन बसविले आणि महिलांना बोलावून  त्यांना बोलते केले. यावेळी रडत माय-लेकीने त्यांच्यावर आर्थिक संकट आल्यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगितले. यावेळी त्यांना कामधंदा उपलब्ध करून देण्याची तयारी गोर्डे पाटील यांनी दर्शविली. यानंतर तेथील नागरिक त्यांच्या कामात व्यस्त झाल्याचे पाहून सायंकाळी ६.२५ वाजेच्या सुमारास पुन्हा या माय-लेकी रुळावर जाऊन बसल्या. त्याचवेळी रेल्वेगाडी येऊ लागली. गाडीच्या भोंग्याच्या आवाजाने पुन्हा नागरिक रुळाकडे जाताच त्यांना पुन्हा माय-लेकी दिसल्या. त्यांना पुन्हा रुळावरून उठवून बाजूला नेले. या महिलेविषयी जवाहरनगर आणि पुंडलिकनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. 

पाच मिनिटांत पोलीस घटनास्थळीजवाहरनगरचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी  घटनेचे गांभीर्य ओळखून उपनिरीक्षक गायके आणि महिला पोलीस कर्मचारी सरला हिवाळे आणि अन्य पोलिसांना घटनास्थळी पाठविले. पोलिसांनी मायलेकीची समजूत काढून त्यांना भारतनगर येथील घरी नेऊन सोडले.