शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

अखेरच्या अर्जांवर यथावकाश निर्णय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:47 IST

पीकविमा भरण्यासाठी शासनाने दोन वेळेस मुदतवाढ दिली. मात्र, ५ आॅगस्टला केवळ सीएससी अर्थात कॉमन सर्व्हिस सेंटरवर आॅफलाइन पद्धतीने पीकविमा अर्ज स्वीकारून शेतकºयांना पोचपावती देण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पीकविमा भरण्यासाठी शासनाने दोन वेळेस मुदतवाढ दिली. मात्र, ५ आॅगस्टला केवळ सीएससी अर्थात कॉमन सर्व्हिस सेंटरवर आॅफलाइन पद्धतीने पीकविमा अर्ज स्वीकारून शेतकºयांना पोचपावती देण्यात आली. सदर अर्ज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात येणार असून शेवटच्या दिवशी प्राप्त पीकविमा अर्जांची पडताळणी केल्यानंतर ते स्वीकारायचे की, नाही याबाबत यथावकाश निर्णय घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.जिल्ह्यात यावर्षी पावसाने सुरुवातीपासून ओढ दिल्याने खरीप पिकांची स्थिती नाजूक बनली आहे. बहुतांश भागातील पिके वाया गेली आहेत. त्यामुळे कधी नव्हे ते या वर्षी पीकविमा भरण्यास शेतकºयांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. कॉमन सर्व्हिस सेंटरवर आॅनलाइन विमा स्वीकारण्याच्या निर्णयाचा पूर्णपणे फज्जा उडाल्यानंतर शासनाने राष्ट्रीयीकृत व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून आॅफलाइन पद्धतीने पीकविमा अर्ज घेण्यास सुरुवात केली. मात्र, शेतकºयांची संख्या पाहता संपूर्ण यंत्रणाच कोलमडल्याचे चित्र जिल्ह्यात पाहावयास मिळाले. ३१ जुलैनंतर शासनाने पीकविमा भरण्यास ४ आॅगस्टपर्यंत वाढ दिली. मुदतवाढीत केवळ सीएससी सेंटरवरच विमा स्वीकारला गेला. परंतु सुरुवातीपासून बेभरवशाच्या ठरलेल्या ‘क्रॉप इंश्युरन्स’ वेबसाईटने शेवटच्या दिवशीही दगा दिला. परिणामी मुदतवाढ देऊनही खूप कमी शेतकºयांना विमा अर्ज भरता आले. शेवटची संधी म्हणून शासनाने सीएससी सेंटरवर पीकविमा भरण्याची मुदत ५ आॅगस्टपर्यंत वाढवली. कृषी विभागाच्या अधिकाºयांनी वैयक्तिक संपर्कासह व्हॉटसअ‍ॅप गु्रपच्या मदतीने मुदतवाढीची माहिती शेतकºयांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सीएससी सेंटरवर शनिवारी केवळ आॅफलाइन पद्धतीने विमा अर्ज स्वीकारून शेतकºयांना पोचपावती देण्यात आली. ५ आॅगस्टला जिल्हाभरातील सेंटरवर प्राप्त अर्ज एकत्रित करून ७ आॅगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात येणार आहेत. अर्जासोबत शेतकºयांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडली आहेत का, पेरणीचा तारीख कोणती आहे, याची पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर अखेरच्या दिवशी प्राप्त पीकविमा अर्ज स्वीकारायचे की नाही याबाबत शासनाकडून प्राप्त सूचनांनुसार निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी दशरथ तांभाळे यांनी सांगितले.