शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

खताची साठेबाजी करणाऱ्या दुकानदाराचा परवाना निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 19:41 IST

कृषिमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार गुणनियंत्रकाला सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय सचिव स्तरावरून घेण्यात येणार आहे.

औरंगाबाद : युरिया खताचा मोठ्या प्रमाणात साठा असतानाही शेतकऱ्यांना देण्यास नकार देणाऱ्या जाधववाडीतील नवभारत फर्टिलायझर्स दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी आनंद गंजेवार यांनी दिली. 

राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी रविवारी जाधववाडी येथील नवभारत फर्टिलायझर्स या खत विक्रेत्याकडे जादा दराने खत विक्री होत असल्याचा तसेच स्टॉक असतानाही  शेतकऱ्यांना  खत दिले जात नसल्याचा प्रकार स्टिंग आॅपरेशन करून उघडकीस आणला होता. त्यासाठी ते शेतकऱ्याचा  वेश धारण करून गेले होते. यावेळी कृषिमंत्र्यांनी थेट कृषी  सचिवांना फोन लावत कारवाईचे आदेश दिले. यानंतर जिल्हा कृषी अधिकारी सीताराम मोटे, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी आनंद गंजेवार यांना बोलावून घेत पंचनामा करण्याचे आदेश दिले आणि गुणनियंत्रकाला सक्तीच्या रजेवार पाठविण्याचे आदेश विभागाच्या सचिवांना दिले.

यानुसार जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाने रविवारी रात्री उशिरा नवभारत फर्टिलायझर्स दुकानाचा परवाना निलंबित करण्याची कारवाई केली असल्याची माहिती गंजेवार यांनी दिली. तसेच निलंबनाच्या कारवाईनंतर परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी सुनावणीनंतर निर्णय घेण्यात येईल. तसेच दुकानदाराकडे असलेला स्टॉक कमी करण्याविषयी लवकरच निर्णय होणार असल्याचेही गंजेवार यांनी स्पष्ट केले. तसेच कृषिमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार गुणनियंत्रकाला सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय सचिव स्तरावरून घेण्यात येणार आहे. याविषयीचा अहवाल लवकरच राज्य शासनाकडे पाठविला जाईल, असेही गंजेवार यांनी स्पष्ट केले. 

शहरातील साठेबाजांची साखळी तोडाजिल्ह्यातील तालुका, ग्रामीण भागातील दुकानदारांपर्यंत शहरातील तीन-चार मोठे दुकानदार रासायनिक खते पोहोचू देत नाहीत. खरीप हंगामाला सुुरुवात झाल्यापासून सतत याविषयी आवाज उठवीत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या खरीप पिकांच्या आढावा बैठकीतही शहरातील खताच्या साठेबाजीवर नियंत्रण मिळविण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र, कृषी विभागातील अधिकारी आणि साठेबाजांची मिलीभगत असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले जाते. ही शहरातील साठेबहाद्दरांची साखळी तोडणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषी सभापती एल. जी. गायकवाड यांनी दिली. 

टॅग्स :agricultureशेतीAurangabadऔरंगाबाद