शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

खताची साठेबाजी करणाऱ्या दुकानदाराचा परवाना निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 19:41 IST

कृषिमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार गुणनियंत्रकाला सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय सचिव स्तरावरून घेण्यात येणार आहे.

औरंगाबाद : युरिया खताचा मोठ्या प्रमाणात साठा असतानाही शेतकऱ्यांना देण्यास नकार देणाऱ्या जाधववाडीतील नवभारत फर्टिलायझर्स दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी आनंद गंजेवार यांनी दिली. 

राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी रविवारी जाधववाडी येथील नवभारत फर्टिलायझर्स या खत विक्रेत्याकडे जादा दराने खत विक्री होत असल्याचा तसेच स्टॉक असतानाही  शेतकऱ्यांना  खत दिले जात नसल्याचा प्रकार स्टिंग आॅपरेशन करून उघडकीस आणला होता. त्यासाठी ते शेतकऱ्याचा  वेश धारण करून गेले होते. यावेळी कृषिमंत्र्यांनी थेट कृषी  सचिवांना फोन लावत कारवाईचे आदेश दिले. यानंतर जिल्हा कृषी अधिकारी सीताराम मोटे, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी आनंद गंजेवार यांना बोलावून घेत पंचनामा करण्याचे आदेश दिले आणि गुणनियंत्रकाला सक्तीच्या रजेवार पाठविण्याचे आदेश विभागाच्या सचिवांना दिले.

यानुसार जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाने रविवारी रात्री उशिरा नवभारत फर्टिलायझर्स दुकानाचा परवाना निलंबित करण्याची कारवाई केली असल्याची माहिती गंजेवार यांनी दिली. तसेच निलंबनाच्या कारवाईनंतर परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी सुनावणीनंतर निर्णय घेण्यात येईल. तसेच दुकानदाराकडे असलेला स्टॉक कमी करण्याविषयी लवकरच निर्णय होणार असल्याचेही गंजेवार यांनी स्पष्ट केले. तसेच कृषिमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार गुणनियंत्रकाला सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय सचिव स्तरावरून घेण्यात येणार आहे. याविषयीचा अहवाल लवकरच राज्य शासनाकडे पाठविला जाईल, असेही गंजेवार यांनी स्पष्ट केले. 

शहरातील साठेबाजांची साखळी तोडाजिल्ह्यातील तालुका, ग्रामीण भागातील दुकानदारांपर्यंत शहरातील तीन-चार मोठे दुकानदार रासायनिक खते पोहोचू देत नाहीत. खरीप हंगामाला सुुरुवात झाल्यापासून सतत याविषयी आवाज उठवीत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या खरीप पिकांच्या आढावा बैठकीतही शहरातील खताच्या साठेबाजीवर नियंत्रण मिळविण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र, कृषी विभागातील अधिकारी आणि साठेबाजांची मिलीभगत असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले जाते. ही शहरातील साठेबहाद्दरांची साखळी तोडणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषी सभापती एल. जी. गायकवाड यांनी दिली. 

टॅग्स :agricultureशेतीAurangabadऔरंगाबाद