शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने ‘मी पुन्हा येईन’ म्हटले की, भीती वाटते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 14:03 IST

उद्धव ठाकरेंचा ‘मी पुन्हा येईन’ च्या आडून मुख्यमंत्र्यांना टोला

ठळक मुद्दे२५ हजार रुपये हेक्टरी मदत केंद्राने त्वरित द्यावीसरकार स्थापनेच्या प्रश्नांना दिली बगल

औरंगाबाद : परतीचा पाऊस ‘मी पुन्हा येईन’ असे म्हटले की, भीती वाटते, असा अप्रत्यक्ष टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. विधानसभा रणधुमाळीत मुख्यमंत्र्यांनी ‘मी पुन्हा येईन’चा नारा प्रचारसभांतून देत जनतेकडे मतांचा जोगवा मागतिला होता. ठाकरे यांनी परतीचा पाऊस आणि फडणवीस यांच्या त्या शब्दांचा रविवारी राजकीय संगम जुळवीत टोलेबाजी केली.राज्यात सरकार भाजपच्या मदतीने बनविणार की, इतर पक्षांची मदत घेणार, यासारख्या सर्व राजकीय पक्षांना त्यांनी बगल देत फक्त शेतकरी आणि ओला दुष्काळ यावरच बोलणार असल्याचे सुभेदारी विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह मराठवाड्यातील काही आमदारांची यावेळी उपस्थिती होती. 

जिल्ह्यासह मराठवाड्यातील ओल्या दुष्काळाचा ठाकरे यांनी रविवारी आढावा घेतला. तत्पूर्वी, त्यांनी कन्नड तालुक्यातील कानडगाव आणि वैजापूर तालुक्यांतील गारज याठिकाणी बांधावर जाऊन अवकाळी पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करीत शेतकऱ्यांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेत ठाकरे म्हणाले की, पाहणी दौरा हेलिकॉप्टरमधून करण्यासारखा नाही. शेतकऱ्यांचा खरीप हंगामातील हाता-तोंडाशी आलेला घास गेला. शेतांमध्ये चिखल झालेला आहे. १८ आॅक्टोबरनंतर पावसाचा जोर वाढला आहे. राज्य शासनाने जाहीर केलेली १० हजार कोटींची मदत तुटपुंजी आहे. पीक विम्याचे काम करणाऱ्या कंपन्यांना बोलणार, तसेच बँकांनादेखील आमच्या भाषेत समजावून सांगणार आहे. शासकीय निकष जसे असतील तसे लावा; परंतु तातडीने प्रत्येक शेतकऱ्याला २५ हजार रुपये हेक्टरी मदत दिली पाहिजे. पीक विम्याच्या कंपन्यांनी कागदी घोडे नाचवू नयेत. विभागीय प्रशासनाने याबाबत उपाययोजना सुरू केल्या आहेत. शेतकऱ्यांना बँका ओल्या दुष्काळात नोटिसा बजावत आहे. हा प्रकार जखमेवर मीठ चोळण्यासारखा आहे. बँका जर माणुसकीने वागल्या नाहीत, तर शिवसेना त्यांना सरळ केल्याविना राहणार नाही, असा दम ठाकरे यांनी बँकांना भरला. दरम्यान, सुभेदारी विश्रामगृहाच्या आवारात बँकांनी शेतकऱ्यांना बजावलेल्या नोटिसा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जाळून निषेध केला.

केंद्राने आता भरभरून द्यावेराज्य सरकार सोबत आहेच; परंतु लोकसभा निवडणुकांत महाराष्ट्राने केंद्राला भरभरून आशीर्वाद दिला. त्यावेळी कोरडा दुष्काळ होता. त्यावेळी केंद्राकडून राज्याच्या शेतकऱ्यांना साथ मिळावी, अशी मागणी केली होती. आता ओल्या दुष्काळाचे भयंकर संकट आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना २५ हजार रुपयांची प्रतिहेक्टरी मदत कर्तव्य म्हणून द्यावी. ओल्या दुष्काळामुळे शेतात पूर्ण चिखल झालेला आहे. दरम्यान, केंद्र शासन आरईसीपीबाबत एक करार करण्याच्या तयारीत आहे. त्या करारामुळे दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीवर कर नसणार आहे, तसेच लघुउद्योजक अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्या कराराबाबत नंतर बोलेल, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.