शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

परतीच्या पावसाने ‘मी पुन्हा येईन’ म्हटले की, भीती वाटते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 14:03 IST

उद्धव ठाकरेंचा ‘मी पुन्हा येईन’ च्या आडून मुख्यमंत्र्यांना टोला

ठळक मुद्दे२५ हजार रुपये हेक्टरी मदत केंद्राने त्वरित द्यावीसरकार स्थापनेच्या प्रश्नांना दिली बगल

औरंगाबाद : परतीचा पाऊस ‘मी पुन्हा येईन’ असे म्हटले की, भीती वाटते, असा अप्रत्यक्ष टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. विधानसभा रणधुमाळीत मुख्यमंत्र्यांनी ‘मी पुन्हा येईन’चा नारा प्रचारसभांतून देत जनतेकडे मतांचा जोगवा मागतिला होता. ठाकरे यांनी परतीचा पाऊस आणि फडणवीस यांच्या त्या शब्दांचा रविवारी राजकीय संगम जुळवीत टोलेबाजी केली.राज्यात सरकार भाजपच्या मदतीने बनविणार की, इतर पक्षांची मदत घेणार, यासारख्या सर्व राजकीय पक्षांना त्यांनी बगल देत फक्त शेतकरी आणि ओला दुष्काळ यावरच बोलणार असल्याचे सुभेदारी विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह मराठवाड्यातील काही आमदारांची यावेळी उपस्थिती होती. 

जिल्ह्यासह मराठवाड्यातील ओल्या दुष्काळाचा ठाकरे यांनी रविवारी आढावा घेतला. तत्पूर्वी, त्यांनी कन्नड तालुक्यातील कानडगाव आणि वैजापूर तालुक्यांतील गारज याठिकाणी बांधावर जाऊन अवकाळी पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करीत शेतकऱ्यांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेत ठाकरे म्हणाले की, पाहणी दौरा हेलिकॉप्टरमधून करण्यासारखा नाही. शेतकऱ्यांचा खरीप हंगामातील हाता-तोंडाशी आलेला घास गेला. शेतांमध्ये चिखल झालेला आहे. १८ आॅक्टोबरनंतर पावसाचा जोर वाढला आहे. राज्य शासनाने जाहीर केलेली १० हजार कोटींची मदत तुटपुंजी आहे. पीक विम्याचे काम करणाऱ्या कंपन्यांना बोलणार, तसेच बँकांनादेखील आमच्या भाषेत समजावून सांगणार आहे. शासकीय निकष जसे असतील तसे लावा; परंतु तातडीने प्रत्येक शेतकऱ्याला २५ हजार रुपये हेक्टरी मदत दिली पाहिजे. पीक विम्याच्या कंपन्यांनी कागदी घोडे नाचवू नयेत. विभागीय प्रशासनाने याबाबत उपाययोजना सुरू केल्या आहेत. शेतकऱ्यांना बँका ओल्या दुष्काळात नोटिसा बजावत आहे. हा प्रकार जखमेवर मीठ चोळण्यासारखा आहे. बँका जर माणुसकीने वागल्या नाहीत, तर शिवसेना त्यांना सरळ केल्याविना राहणार नाही, असा दम ठाकरे यांनी बँकांना भरला. दरम्यान, सुभेदारी विश्रामगृहाच्या आवारात बँकांनी शेतकऱ्यांना बजावलेल्या नोटिसा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जाळून निषेध केला.

केंद्राने आता भरभरून द्यावेराज्य सरकार सोबत आहेच; परंतु लोकसभा निवडणुकांत महाराष्ट्राने केंद्राला भरभरून आशीर्वाद दिला. त्यावेळी कोरडा दुष्काळ होता. त्यावेळी केंद्राकडून राज्याच्या शेतकऱ्यांना साथ मिळावी, अशी मागणी केली होती. आता ओल्या दुष्काळाचे भयंकर संकट आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना २५ हजार रुपयांची प्रतिहेक्टरी मदत कर्तव्य म्हणून द्यावी. ओल्या दुष्काळामुळे शेतात पूर्ण चिखल झालेला आहे. दरम्यान, केंद्र शासन आरईसीपीबाबत एक करार करण्याच्या तयारीत आहे. त्या करारामुळे दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीवर कर नसणार आहे, तसेच लघुउद्योजक अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्या कराराबाबत नंतर बोलेल, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.