शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

दुष्काळाच्या भीतीने शेतकऱ्यांना चिंता

By admin | Updated: August 5, 2015 00:35 IST

दिंद्रूड : पावसाने गुंगारा दिल्याने आतापर्यंत कशीबशी तग धरुन ठेवलेल्या पिकांनीही धीर सोडला आहे. शिवारातील कापूस, सोयाबीन, बाजरी, तूर आदी पिके करपून गेली आहेत

दिंद्रूड : पावसाने गुंगारा दिल्याने आतापर्यंत कशीबशी तग धरुन ठेवलेल्या पिकांनीही धीर सोडला आहे. शिवारातील कापूस, सोयाबीन, बाजरी, तूर आदी पिके करपून गेली आहेत. पाऊसच नाही पडला तर या अनामिक भितीने शेतकऱ्यांचा थरकाप उडाला आहे.यावर्षी मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पाऊस पडण्याने शेतकऱ्यांनी आनंदात पेरणी उरकून घेतली. त्यानंतर थोड्याफार आलेल्या रिमझिम पावसाने बिजे अंकुरली. मात्र आज उद्या येईल, या आशेवर शेतकरी असतानाच पावसाने दांडी मारल्याने उगवलेली पिके करपून गेली आहेत. काही शेतकऱ्यांनी तर पिकांची आशा सोडून पिकांवर नांगर फिरवला आहे.दिंद्रूडसह पंचक्रोशीतील चाटगाव, संगम, देवदहिफळ, जवळा, नाकलगाव, पिंपळगाव, आलापूर, बेलुरा, शिंदेवाडी, चोपनवाडी, खाडेवाडी आदी गावातील कापूस, तूर, तीळ, सोयाबीन, उडीद, मूग आदी पिके जळून जात आहेत. खरीप तर १०० टक्के हातचे गेले आहे. मात्र पाऊस नाही पडला तर रबीचे काय होईल? अशी अनामिक भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.शेतकऱ्यांनी जीवापाड जपलेल्या पशुधनासाठी लागणारी वैरण संपत आली आहे तर काही शेतकऱ्यांना काय खायला घालावे ही पंचाईत पडली आहे. मात्र गोवंश हत्याबंदी कायदा करणारे सत्ताधारी जनावरांच्या चारा, पाण्यासाठी काहीही उपाययोजना करताना दिसत नाहीत. अशीच परिस्थिती राहिली तर काय करावे? या भीतीपोटी शेतकरी चिंताक्रांत झाले आहेत. तसेच विहिरी कोरड्या पडल्या असून, बोअरबंद पडले आहेत. तलाव तर उन्हाळ्यातच कोरडेठाक झालेले आहेत. पिण्याचे पाणी पडले आहेत. तलाव तर उन्हाळ्यातच कोरडेठाक झालेले आहेत. पिण्याचे पाणी आणायचे कोठून? या विवंचनेत असलेले शेतकरी वरुणराजाची कृपा कधी होतेय, या आशेवर जगत आहे. (वार्ताहर)