शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

दुष्काळाच्या भीतीने शेतकऱ्यांना चिंता

By admin | Updated: August 5, 2015 00:35 IST

दिंद्रूड : पावसाने गुंगारा दिल्याने आतापर्यंत कशीबशी तग धरुन ठेवलेल्या पिकांनीही धीर सोडला आहे. शिवारातील कापूस, सोयाबीन, बाजरी, तूर आदी पिके करपून गेली आहेत

दिंद्रूड : पावसाने गुंगारा दिल्याने आतापर्यंत कशीबशी तग धरुन ठेवलेल्या पिकांनीही धीर सोडला आहे. शिवारातील कापूस, सोयाबीन, बाजरी, तूर आदी पिके करपून गेली आहेत. पाऊसच नाही पडला तर या अनामिक भितीने शेतकऱ्यांचा थरकाप उडाला आहे.यावर्षी मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पाऊस पडण्याने शेतकऱ्यांनी आनंदात पेरणी उरकून घेतली. त्यानंतर थोड्याफार आलेल्या रिमझिम पावसाने बिजे अंकुरली. मात्र आज उद्या येईल, या आशेवर शेतकरी असतानाच पावसाने दांडी मारल्याने उगवलेली पिके करपून गेली आहेत. काही शेतकऱ्यांनी तर पिकांची आशा सोडून पिकांवर नांगर फिरवला आहे.दिंद्रूडसह पंचक्रोशीतील चाटगाव, संगम, देवदहिफळ, जवळा, नाकलगाव, पिंपळगाव, आलापूर, बेलुरा, शिंदेवाडी, चोपनवाडी, खाडेवाडी आदी गावातील कापूस, तूर, तीळ, सोयाबीन, उडीद, मूग आदी पिके जळून जात आहेत. खरीप तर १०० टक्के हातचे गेले आहे. मात्र पाऊस नाही पडला तर रबीचे काय होईल? अशी अनामिक भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.शेतकऱ्यांनी जीवापाड जपलेल्या पशुधनासाठी लागणारी वैरण संपत आली आहे तर काही शेतकऱ्यांना काय खायला घालावे ही पंचाईत पडली आहे. मात्र गोवंश हत्याबंदी कायदा करणारे सत्ताधारी जनावरांच्या चारा, पाण्यासाठी काहीही उपाययोजना करताना दिसत नाहीत. अशीच परिस्थिती राहिली तर काय करावे? या भीतीपोटी शेतकरी चिंताक्रांत झाले आहेत. तसेच विहिरी कोरड्या पडल्या असून, बोअरबंद पडले आहेत. तलाव तर उन्हाळ्यातच कोरडेठाक झालेले आहेत. पिण्याचे पाणी पडले आहेत. तलाव तर उन्हाळ्यातच कोरडेठाक झालेले आहेत. पिण्याचे पाणी आणायचे कोठून? या विवंचनेत असलेले शेतकरी वरुणराजाची कृपा कधी होतेय, या आशेवर जगत आहे. (वार्ताहर)