शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गावर 'फास्ट' टॅगद्वारे 'फास्ट' लूट; प्रवासानंतर होतेय चौपट रक्कम कपात

By विकास राऊत | Updated: July 10, 2023 12:03 IST

दररोज ६० ते ७० वाहनधारकांची दुप्पट ते चौपट रक्कम ऑनलाइन कपात होत आहे.

छत्रपती संभाजीनगर :समृद्धी महामार्ग ११ डिसेंबर २०२२ पासून वाहतुकीला खुला झाला असून तो मार्ग अपघातांच्या सत्रामुळे चर्चेत असतानाच आता टोलनाक्यांवरून होणाऱ्या लुटीचा सामना वाहनधारकांना करावा लागत आहे. फास्ट टॅग ही सुविधा टोलनाक्यावर वाहनांच्या रांगांपासून मुक्ती देण्यासाठी आणली, मात्र ही सुविधा डोकेदुखी ठरत असून वाहनधारकांची फास्ट लूट होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

दररोज ६० ते ७० वाहनधारकांची दुप्पट ते चौपट रक्कम ऑनलाइन कपात होत आहे. तर काही वाहनधारकांनी प्रवास केल्यानंतर दोन ते चार दिवसांनी रक्कम कपात होण्याचे प्रकार घडत आहेत. फास्ट टॅग व्यवस्थापनाकडे तक्रारी करूनही ऑनलाइन कपात झालेली रक्कम वाहनधारकांना परत मिळत नाही. रोज वाहनधारकांकडून लूट होत असेल तर ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही सुविधा सर्व महामार्गावर मिळाव्यात, जेणेकरून वाहनधारकांची लूट होणार नाही, अशी मागणी होत आहे.

किती वाहने धावतात दररोज?समृद्धी महामार्गावरून सर्व प्रकारची १२ हजार वाहने दररोज धावत आहेत. समृद्धी, सोलापूर-धुळे हायवेसह एनएचएआयच्या सर्व महामार्गावर फास्ट टॅगविना वाहनधारकांना प्रवास करता येत नाही.

असा आहे टोलचा दर...समृद्धी महामार्गावर महामार्गावर लहान वाहनांना एक रुपये ६५ पैसे प्रत्येक किलोमीटरला टोल आकारला जातो. जड वाहनांना हलक्या वाहनांपेक्षा तीनपट अधिक टोल भरावा लागताे. हलक्या व्यावसायिक वाहनांसाठी (मिनी बस) दोन रुपये ७९ पैसे, बस- ट्रकसाठी पाच रुपये ८५ पैसे, अवजड यंत्रसामग्रीसाठी नऊ रुपये १८ पैसे, अतिअवजड वाहनासाठी ११ रुपये १७ पैसे प्रत्येक किलोमीटरला टोलदर आहे.

एमएसआरडीसी काय म्हणते?टोलचा सर्व प्रकार हा फायनान्शियल मुद्दा आहे. मुंबईतून यावर नियंत्रण आहे. जास्तीचा टोल कापला गेल्याच्या तक्रारी येत आहेत. परंतु बँक खात्याशी निगडीत ही बाब आहे. नाक्यावर वाहन येताच जेव्हा स्वाईप केले जाते, तेव्हा फास्ट टॅग खात्यात रक्कम नसेल आणि पुन्हा रक्कम टाकल्यानंतर पूर्ण टोलची रक्कम कपात होते, असे एमएसआरडीसीला टोल व्यवस्थापनाकडून सांगण्यात येत आहे.

तक्रारकर्ते काय म्हणतात?शहरातील डॉ. सतीश वैष्णव यांनी काही दिवसांपूर्वी समृद्धीवरून प्रवास केला. शिर्डी, माळीवाडा या ठिकाणांच्या इंटरजेंचवरून उतरताना त्यांच्या खात्यातून रक्कम कपात झाल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा ७३० रुपये कपात झाल्याचा एसएमएस आला. त्यांनी टोलनाक्यावरून जाऊन विचारणा केली. त्यांना ऑनलाइन तक्रारीचा सल्ला देण्यात आला. स्थानिक फास्ट टॅग विक्रेत्याकडे ते गेले, त्याने तर रोज ६० ते ७० वाहनांबाबत असाच प्रकार होत असल्याचे सांगितले. डॉ. वैष्णव यांनी ऑनलाइन तक्रार केल्यावर त्यांना पुराव्याअभावी रक्कम परत मिळणार नाही, असे कळविण्यात आले. रोज ६० ते ७० वाहनांबाबत असा प्रकार होत असेल तर ही लूटच असल्याचा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAurangabadऔरंगाबादtollplazaटोलनाका