शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

समृद्धी महामार्गावर 'फास्ट' टॅगद्वारे 'फास्ट' लूट; प्रवासानंतर होतेय चौपट रक्कम कपात

By विकास राऊत | Updated: July 10, 2023 12:03 IST

दररोज ६० ते ७० वाहनधारकांची दुप्पट ते चौपट रक्कम ऑनलाइन कपात होत आहे.

छत्रपती संभाजीनगर :समृद्धी महामार्ग ११ डिसेंबर २०२२ पासून वाहतुकीला खुला झाला असून तो मार्ग अपघातांच्या सत्रामुळे चर्चेत असतानाच आता टोलनाक्यांवरून होणाऱ्या लुटीचा सामना वाहनधारकांना करावा लागत आहे. फास्ट टॅग ही सुविधा टोलनाक्यावर वाहनांच्या रांगांपासून मुक्ती देण्यासाठी आणली, मात्र ही सुविधा डोकेदुखी ठरत असून वाहनधारकांची फास्ट लूट होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

दररोज ६० ते ७० वाहनधारकांची दुप्पट ते चौपट रक्कम ऑनलाइन कपात होत आहे. तर काही वाहनधारकांनी प्रवास केल्यानंतर दोन ते चार दिवसांनी रक्कम कपात होण्याचे प्रकार घडत आहेत. फास्ट टॅग व्यवस्थापनाकडे तक्रारी करूनही ऑनलाइन कपात झालेली रक्कम वाहनधारकांना परत मिळत नाही. रोज वाहनधारकांकडून लूट होत असेल तर ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही सुविधा सर्व महामार्गावर मिळाव्यात, जेणेकरून वाहनधारकांची लूट होणार नाही, अशी मागणी होत आहे.

किती वाहने धावतात दररोज?समृद्धी महामार्गावरून सर्व प्रकारची १२ हजार वाहने दररोज धावत आहेत. समृद्धी, सोलापूर-धुळे हायवेसह एनएचएआयच्या सर्व महामार्गावर फास्ट टॅगविना वाहनधारकांना प्रवास करता येत नाही.

असा आहे टोलचा दर...समृद्धी महामार्गावर महामार्गावर लहान वाहनांना एक रुपये ६५ पैसे प्रत्येक किलोमीटरला टोल आकारला जातो. जड वाहनांना हलक्या वाहनांपेक्षा तीनपट अधिक टोल भरावा लागताे. हलक्या व्यावसायिक वाहनांसाठी (मिनी बस) दोन रुपये ७९ पैसे, बस- ट्रकसाठी पाच रुपये ८५ पैसे, अवजड यंत्रसामग्रीसाठी नऊ रुपये १८ पैसे, अतिअवजड वाहनासाठी ११ रुपये १७ पैसे प्रत्येक किलोमीटरला टोलदर आहे.

एमएसआरडीसी काय म्हणते?टोलचा सर्व प्रकार हा फायनान्शियल मुद्दा आहे. मुंबईतून यावर नियंत्रण आहे. जास्तीचा टोल कापला गेल्याच्या तक्रारी येत आहेत. परंतु बँक खात्याशी निगडीत ही बाब आहे. नाक्यावर वाहन येताच जेव्हा स्वाईप केले जाते, तेव्हा फास्ट टॅग खात्यात रक्कम नसेल आणि पुन्हा रक्कम टाकल्यानंतर पूर्ण टोलची रक्कम कपात होते, असे एमएसआरडीसीला टोल व्यवस्थापनाकडून सांगण्यात येत आहे.

तक्रारकर्ते काय म्हणतात?शहरातील डॉ. सतीश वैष्णव यांनी काही दिवसांपूर्वी समृद्धीवरून प्रवास केला. शिर्डी, माळीवाडा या ठिकाणांच्या इंटरजेंचवरून उतरताना त्यांच्या खात्यातून रक्कम कपात झाल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा ७३० रुपये कपात झाल्याचा एसएमएस आला. त्यांनी टोलनाक्यावरून जाऊन विचारणा केली. त्यांना ऑनलाइन तक्रारीचा सल्ला देण्यात आला. स्थानिक फास्ट टॅग विक्रेत्याकडे ते गेले, त्याने तर रोज ६० ते ७० वाहनांबाबत असाच प्रकार होत असल्याचे सांगितले. डॉ. वैष्णव यांनी ऑनलाइन तक्रार केल्यावर त्यांना पुराव्याअभावी रक्कम परत मिळणार नाही, असे कळविण्यात आले. रोज ६० ते ७० वाहनांबाबत असा प्रकार होत असेल तर ही लूटच असल्याचा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAurangabadऔरंगाबादtollplazaटोलनाका