शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

समृद्धी महामार्गावर 'फास्ट' टॅगद्वारे 'फास्ट' लूट; प्रवासानंतर होतेय चौपट रक्कम कपात

By विकास राऊत | Updated: July 10, 2023 12:03 IST

दररोज ६० ते ७० वाहनधारकांची दुप्पट ते चौपट रक्कम ऑनलाइन कपात होत आहे.

छत्रपती संभाजीनगर :समृद्धी महामार्ग ११ डिसेंबर २०२२ पासून वाहतुकीला खुला झाला असून तो मार्ग अपघातांच्या सत्रामुळे चर्चेत असतानाच आता टोलनाक्यांवरून होणाऱ्या लुटीचा सामना वाहनधारकांना करावा लागत आहे. फास्ट टॅग ही सुविधा टोलनाक्यावर वाहनांच्या रांगांपासून मुक्ती देण्यासाठी आणली, मात्र ही सुविधा डोकेदुखी ठरत असून वाहनधारकांची फास्ट लूट होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

दररोज ६० ते ७० वाहनधारकांची दुप्पट ते चौपट रक्कम ऑनलाइन कपात होत आहे. तर काही वाहनधारकांनी प्रवास केल्यानंतर दोन ते चार दिवसांनी रक्कम कपात होण्याचे प्रकार घडत आहेत. फास्ट टॅग व्यवस्थापनाकडे तक्रारी करूनही ऑनलाइन कपात झालेली रक्कम वाहनधारकांना परत मिळत नाही. रोज वाहनधारकांकडून लूट होत असेल तर ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही सुविधा सर्व महामार्गावर मिळाव्यात, जेणेकरून वाहनधारकांची लूट होणार नाही, अशी मागणी होत आहे.

किती वाहने धावतात दररोज?समृद्धी महामार्गावरून सर्व प्रकारची १२ हजार वाहने दररोज धावत आहेत. समृद्धी, सोलापूर-धुळे हायवेसह एनएचएआयच्या सर्व महामार्गावर फास्ट टॅगविना वाहनधारकांना प्रवास करता येत नाही.

असा आहे टोलचा दर...समृद्धी महामार्गावर महामार्गावर लहान वाहनांना एक रुपये ६५ पैसे प्रत्येक किलोमीटरला टोल आकारला जातो. जड वाहनांना हलक्या वाहनांपेक्षा तीनपट अधिक टोल भरावा लागताे. हलक्या व्यावसायिक वाहनांसाठी (मिनी बस) दोन रुपये ७९ पैसे, बस- ट्रकसाठी पाच रुपये ८५ पैसे, अवजड यंत्रसामग्रीसाठी नऊ रुपये १८ पैसे, अतिअवजड वाहनासाठी ११ रुपये १७ पैसे प्रत्येक किलोमीटरला टोलदर आहे.

एमएसआरडीसी काय म्हणते?टोलचा सर्व प्रकार हा फायनान्शियल मुद्दा आहे. मुंबईतून यावर नियंत्रण आहे. जास्तीचा टोल कापला गेल्याच्या तक्रारी येत आहेत. परंतु बँक खात्याशी निगडीत ही बाब आहे. नाक्यावर वाहन येताच जेव्हा स्वाईप केले जाते, तेव्हा फास्ट टॅग खात्यात रक्कम नसेल आणि पुन्हा रक्कम टाकल्यानंतर पूर्ण टोलची रक्कम कपात होते, असे एमएसआरडीसीला टोल व्यवस्थापनाकडून सांगण्यात येत आहे.

तक्रारकर्ते काय म्हणतात?शहरातील डॉ. सतीश वैष्णव यांनी काही दिवसांपूर्वी समृद्धीवरून प्रवास केला. शिर्डी, माळीवाडा या ठिकाणांच्या इंटरजेंचवरून उतरताना त्यांच्या खात्यातून रक्कम कपात झाल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा ७३० रुपये कपात झाल्याचा एसएमएस आला. त्यांनी टोलनाक्यावरून जाऊन विचारणा केली. त्यांना ऑनलाइन तक्रारीचा सल्ला देण्यात आला. स्थानिक फास्ट टॅग विक्रेत्याकडे ते गेले, त्याने तर रोज ६० ते ७० वाहनांबाबत असाच प्रकार होत असल्याचे सांगितले. डॉ. वैष्णव यांनी ऑनलाइन तक्रार केल्यावर त्यांना पुराव्याअभावी रक्कम परत मिळणार नाही, असे कळविण्यात आले. रोज ६० ते ७० वाहनांबाबत असा प्रकार होत असेल तर ही लूटच असल्याचा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAurangabadऔरंगाबादtollplazaटोलनाका