शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

शेतकऱ्यांना कर्जपुरवठ्यासाठी आता कृषी विभाग घेणार हमी!

By admin | Updated: December 20, 2015 23:47 IST

जालना : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता यावा म्हणून केंद्र तसेच राज्य सरकारकडून सुक्ष्म सिंचन योजना,

जालना : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता यावा म्हणून केंद्र तसेच राज्य सरकारकडून सुक्ष्म सिंचन योजना, शेडनेट योजना, शेततळे आदी योजनांसाठी लागणाऱ्या कर्जासाठी कृषी विभाग शेतकऱ्यांची हमी घेणार आहे. सुक्ष्म सिंचन, शेततळे आदी योजनांसाठी शेतकऱ्यांना क्षेत्रनिहाय तीन ते पाच लाख रूपये खर्च येतो. शासनाकडूनही अनुदान मिळते. मात्र अनुदान मिळेपर्यंत शेतकऱ्यांना प्रकल्प राबवावा लागतो. यासाठी आता जिल्हा कृषी अधीक्षकांनी पुढाकार घेत शेतकऱ्यांना कृषी विभाग हमीपत्राच्या माध्यमातून कंटेंट आॅफ लेटर देणार आहे. या माध्यमातून ठिबकसह अन्य योजनांसाठी लागणारे कर्ज बँका शेतकऱ्यांना देऊ शकतील. योजनेचे अनुदान प्राप्त होताच ते शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात वळते करण्यात येणार आहे. यात शेतकरी, कृषी विभाग व बँकांचेही काम सुलभ होणार आहे. याविषयी अधिक माहिती देताना कृषी अधीक्षक दशरथ तांभाळे म्हणाले की, या हमीपत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा कर्जाचा प्रश्न तात्काळ निकाली निघणार आहेत. कृषी योजनांचा शेतकऱ्यांना फायदा मिळावा तसेच पैशांअभावी शेतकऱ्यांची अडचण येऊ नये म्हणून ही अभिनव योजना स्थानिक पातळीवर सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत ५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना हमीपत्र देण्यात आले आहे. विशेषत: ठिबक तसेच शेततळ्यांसाठी हे हमीपत्र महत्वाची भूमिका बजावणार आहे. कृषी अधीक्षक कार्यालयातून परिपूर्ण मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे तांभाळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.दुष्काळामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यांत जेमतेम पाणीसाठा आहे. उपलब्ध पाणी पिकांना योग्य प्रमाणात देता यावे म्हणून केंद्र शासनाची सुक्ष्म सिंचन योजना राबविण्यात येत आहे. अंबड- १३२१, बदनापूर- ८८७, भोकरदन- २५११, घनसावंगी १२६४, जाफराबाद २५८८, जालना १४८५, मंठा ६६० तर परतूर-६३० मिळून ११ हजार ३३६ प्रस्ताव प्राप्त झाल्याचे कृषी अधीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले. ४पीक निहाय व मीटर निहाय ठिबक सिंचनासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहे. साधारणपणे पाच हजार लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळण्याचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.