शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

..तर शेतकरी सरकारला वाऱ्यावर सोडतील

By admin | Updated: June 18, 2017 00:42 IST

बीड :वापसा उडून गेला तर सरकारचे काही खरे नाही, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कायकर्ता मेळाव्यात दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सरसकट कर्जमाफीबद्दल भाजप- शिवसेनेने टाळाटाळ केली, शेतकरी वाऱ्यावर सोडला तर शेतकरी सरकारला वाऱ्यावर सोडतील, वापसा उडून गेला तर सरकारचे काही खरे नाही, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कायकर्ता मेळाव्यात दिला. अजित पवार म्हणाले, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी ही भूमिका राष्ट्रवादीने घेतली. शेतकरी विरोधी भूमिका सरकारने घेतली. परंतु, शेतकऱ्यांनी संप पुकारल्यानंतर सरकारला जाग आली. कर्जमाफीबद्दल वेगवेगळे निकष लावून शब्दच्छल केला तर राष्ट्रवादी कॉँग्रेस पुन्हा सरकारच्या विरोधात आवाज उठविण्याचे काम करील, असा इशारा पवार यांनी दिला. खरिपाचा हंगाम सुरु झाला आहे. शेतकऱ्यांना बियाणे- खते खरेदी करायची आहे. परंतु, कर्जमाफीची दहा हजारांची मदत देताना निकष का लावले जात आहेत, असा सवाल पवार यांनी केला.शेतकऱ्याच्या मुलाने उदरनिर्वाहासाठी लहान व्यवसाय सुरु केला असेल किंवा शेतीकामासाठी चारचाकी वाहन घेतले असेल तर त्याची चूक काय? सातवा वेतन आयोग देताना आमचा विरोध नाही परंतु, कर्जमाफीत शेतकऱ्यांसाठी जाचक अटी का असा सवाल करुन मोठे शेतकरी बाजूला ठेवा, लहान वाहने वापरणारा, लहान व्यवसाय करणारा, ज्याला मदतीची गरज आहे त्याला अडवू नका. वेळेवर दहा हजारांची मदत करा, असे पवार या वेळी म्हणाले. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, राष्ट्रवादीने १८ वर्ष पूर्ण केली, १९ व्या वर्षात वाटचाल करताना हे वर्ष बळीराजाला समर्पित केले, राज्य सरकारने कर्जमाफी सुखासुखी दिली नाही. सरकारने कर्जमाफीबाबत राष्ट्रवादी कॉँग्रेसने आग्रही भूमिका घेतली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत तर आमदारांनी विधानसभेत केली. वेळ पडल्यास हाती रुमणं घेण्याची भूमिका राष्ट्रवादीने मांडली असे तटकरे म्हणाले. संयोजक संदीप क्षीरसागर यांनी प्रास्ताविक भाषण केले.