शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

..तर शेतकरी सरकारला वाऱ्यावर सोडतील

By admin | Updated: June 18, 2017 00:42 IST

बीड :वापसा उडून गेला तर सरकारचे काही खरे नाही, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कायकर्ता मेळाव्यात दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सरसकट कर्जमाफीबद्दल भाजप- शिवसेनेने टाळाटाळ केली, शेतकरी वाऱ्यावर सोडला तर शेतकरी सरकारला वाऱ्यावर सोडतील, वापसा उडून गेला तर सरकारचे काही खरे नाही, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कायकर्ता मेळाव्यात दिला. अजित पवार म्हणाले, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी ही भूमिका राष्ट्रवादीने घेतली. शेतकरी विरोधी भूमिका सरकारने घेतली. परंतु, शेतकऱ्यांनी संप पुकारल्यानंतर सरकारला जाग आली. कर्जमाफीबद्दल वेगवेगळे निकष लावून शब्दच्छल केला तर राष्ट्रवादी कॉँग्रेस पुन्हा सरकारच्या विरोधात आवाज उठविण्याचे काम करील, असा इशारा पवार यांनी दिला. खरिपाचा हंगाम सुरु झाला आहे. शेतकऱ्यांना बियाणे- खते खरेदी करायची आहे. परंतु, कर्जमाफीची दहा हजारांची मदत देताना निकष का लावले जात आहेत, असा सवाल पवार यांनी केला.शेतकऱ्याच्या मुलाने उदरनिर्वाहासाठी लहान व्यवसाय सुरु केला असेल किंवा शेतीकामासाठी चारचाकी वाहन घेतले असेल तर त्याची चूक काय? सातवा वेतन आयोग देताना आमचा विरोध नाही परंतु, कर्जमाफीत शेतकऱ्यांसाठी जाचक अटी का असा सवाल करुन मोठे शेतकरी बाजूला ठेवा, लहान वाहने वापरणारा, लहान व्यवसाय करणारा, ज्याला मदतीची गरज आहे त्याला अडवू नका. वेळेवर दहा हजारांची मदत करा, असे पवार या वेळी म्हणाले. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, राष्ट्रवादीने १८ वर्ष पूर्ण केली, १९ व्या वर्षात वाटचाल करताना हे वर्ष बळीराजाला समर्पित केले, राज्य सरकारने कर्जमाफी सुखासुखी दिली नाही. सरकारने कर्जमाफीबाबत राष्ट्रवादी कॉँग्रेसने आग्रही भूमिका घेतली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत तर आमदारांनी विधानसभेत केली. वेळ पडल्यास हाती रुमणं घेण्याची भूमिका राष्ट्रवादीने मांडली असे तटकरे म्हणाले. संयोजक संदीप क्षीरसागर यांनी प्रास्ताविक भाषण केले.