शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
2
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
3
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
4
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
5
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
6
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
7
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
8
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
9
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
10
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
11
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
12
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
13
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
14
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
15
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
16
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
17
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
18
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
19
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
20
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...

पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी हवालदिल

By admin | Updated: July 9, 2017 00:30 IST

नांदेड : पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून काही तालुक्यात दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे़ जिल्ह्यात १ जून ते ७ जुलैदरम्यान १७३़ ३५ मि़ मी़ पाऊस झाला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून काही तालुक्यात दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे़ जिल्ह्यात १ जून ते ७ जुलैदरम्यान १७३़ ३५ मि़ मी़ पाऊस झाला आहे़ मृृगाच्या पहिल्या दोन, तीन पावसाने खरीप हंगामाच्या पेरणीला वेग आला होता़ परंतु आर्द्रात बरसरणारा पाऊस जमिनीत मुरलाच नाही़ जिल्हाभरात ३० जूनपर्यंत २ लाख ७८ हजार २०० हेक्टरवर पेरणी करण्यात आली ़ यावर्षीच्या खरीप हंगामासाठी एकूण ८ लाख २४ हजार ८०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. गतवर्षी समाधानकारक पेरणीयोग्य पाऊस झाल्याने खरीप हंगामात ३० जूनपर्यंत ४ लाख ४७ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. यावर्षी वेळेवर आगमन झालेल्या मान्सूनने सुरूवातीला सर्वांनाच आनंदी केले़ मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली़ अधूनमधून तो काही भागात बरसत असला तरी पर्जन्यमानात वाढ झाली नाही़ एमजीएमच्या खगोल व अंतराळ विभागाचे संचालक श्रीनिवास औंधकर म्हणाले, येत्या चार-पाच दिवसांची पावसाची शक्यता आहे़ मध्य भारतात वाऱ्याची व ढगांची गती मंदावल्यामुळे मध्य महाराष्ट्रात मोठ्या पावसाने दीड मारली आहे़ येत्या चार, पाच दिवसांत मध्य भारतामध्ये पश्चिमी विक्षोपीय वाऱ्यांची स्थितीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे़ त्यानंतर मध्य महाराष्ट्रात दमदार पाऊस होईल, अशी शक्यताही औंधकर यांनी व्यक्त केली़ १ जून ते ७ जुलैपर्यंत एकूण पाऊस मि़ मी़ मध्ये पुढीलप्रमाणे, नांदेड -२५८़५३, मुदखेड - २२६़ ६६, अर्धापूर -१६९़३३, भोकर -१८९़५०, उमरी -१३४़६६, कंधार -१८०, लोहा-१६२़३३, किनवट-२२६़ ८६, माहूर -१७७़३८, हदगाव -१९८़१८, देगलूर-११६़९९, बिलोली-१६१़६०, धर्माबाद -१६५़३४, नायगाव -१३७़६६, मुखेड-१५३़७२़