शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

शेतकऱ्यांना रक्कम अदा होईल- टोपे

By admin | Updated: May 18, 2015 00:17 IST

जालना : जिल्हा मध्यवर्ती बँकेला दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी १३८ कोटी रुपये प्राप्त झाले होते. पैकी १२७ कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहेत

जालना : जिल्हा मध्यवर्ती बँकेला दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी १३८ कोटी रुपये प्राप्त झाले होते. पैकी १२७ कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहेत. उर्वरित ७ कोटी जमा करताना तांत्रिक अडचणी येत आहेत. असे असले तरी ही रक्कम शेतकऱ्यांना अदा केली जाईल, अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अंकुशराव टोपे यांनी दिली.जिल्ह्याला राज्य सरकारकडून दुष्काळी अनुदानाचे २२३ कोटी रुपये प्राप्त झाले असून, त्यातील १३८ कोटी जिल्हा प्रशासनाने मध्यवर्ती बँकेकडे टप्प्याटप्प्याने वर्ग केले होते. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी राजकीय हेतुने जे आरोप केले त्यात तथ्य नसल्याचेही टोपे यांनी सांगितले आहे. जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेने नेहमीच शेतकऱ्यांचे हित जपण्याला प्राधान्य दिले असून, आपल्या संचालक मंडळाच्या कार्यकाळात बँकेने नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेचे नेटवर्थ (नक्तमुल्य) २७ कोटी २७ लाख असून, सीआरएआर (भांडवली प्राप्ती मर्यादा) ९.६७ टक्के एवढा आहे. बँकेचा निव्वळ एनपीए शून्य टक्के असून, आर्थिकदृष्ट्या बँकींग क्षेत्रात याला मोठे महत्त्व आहे.जालना जिल्ह्यात सन २०११-१२ मध्ये पीकविम्याच्या हप्त्यापोटी ३ कोटी २३ लाख रुपयांचा विमा हप्ता कृषी इंश्युरंन्स कंपनीकडे भरला होता. या हप्त्यापोटी ७२ कोटी ७९ लाख रुपये शेतकऱ्यांना मिळाले होते. गेल्या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १४ कोटी ६५ लाख (खरीप हंगाम विमा हप्ता) रुपये भरला असून, त्यातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५३० कोटी ६४ लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळायला हवे होते. मात्र, प्रत्यक्षा १९० कोटी एवढी कमी रक्कम मिळणार असल्याचे संकेत आहेत. राज्य सरकार शेतकऱ्यांचे हित जोपासण्याची जी खोटी ग्वाही देत आहे, त्यात तथ्य नसून, कृषी विमा कंपनीकडे राज्य सरकारने ७०० कोटी भरले असते तर १९० कोटी रुपयांपेक्षा जास्तीचे विमा संरक्षण मिळाले असते, असेही टोपे यांनी सांगितले. लोणीकर यांनी बँकेच्या अनुदान वाटपातून, व्याज कपात केल्याचा आरोप केला आहे. त्यातही तथ्य नसून तो केवळ राजकीय स्वार्थ असल्याचे नमूद करण्यात आले. बँकेला जिल्हा प्रशासनाची कुठलीही नोटीस अथवा कार्यवाहीचा इशारा देण्यात आला नसून, पालकमंत्री लोणीकर यांनी तथ्य तपाासूनच आरोप करावेत, असेही टोपे यांनी स्पष्ट केले आहे.माजी मंत्री आ. राजेश टोपे हे या बँकेच्या दैनंदिन व्यवहारात कधीच ढवळाढवळ करत नाहीत. मात्र, ज्या ज्या वेळी मध्यवर्ती बँकेला सरकार दरबारी बाजू मांडायची असल्यास त्यांचे नेहमीच सहकार्य मिळते, असेही ते म्हणाले.