शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
5
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
6
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकड्यांचा फज्जा
7
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
8
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
9
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
10
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
11
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
12
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
13
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
14
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
15
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
16
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
17
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
18
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
19
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
20
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट

शेतकऱ्यांनी पाडला कांद्याचा लिलाव बंद

By admin | Updated: July 15, 2016 01:08 IST

वैजापूर : कांद्याचा घसरलेला भाव व सहा टक्के अडतीमुळे गुरुवारी वैजापूर येथील कांदा मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला.

वैजापूर : कांद्याचा घसरलेला भाव व सहा टक्के अडतीमुळे गुरुवारी वैजापूर येथील कांदा मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला. तसेच खरीददारांकडून सहा टक्के अडत घेण्यात येत असल्याने हा कांदा कोणीच घेतला नाही. परिणामी, कांदा मार्केटमध्ये जवळपास एक हजार गोणी कांदा तसाच पडून राहिला.वैजापूर शहरालगतच्या घायगावनजीक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये जाहीर लिलाव पद्धतीने कांदा खरेदी केली जाते. गुरुवारी मार्केटमध्ये एक हजार कांदा गोणीची आवक होती. यापूर्वी कांदा विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांकडून सहा टक्के अडत वसूल केली जात असे; परंतु शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांऐवजी कांदा खरेदी करणाऱ्यांकडून सहा टक्के अडत वसूल करावी, असे धोरण जाहीर केले. मार्केटमध्ये लिलाव पद्धतीने जे अडत व्यापारी कांदा खरेदी करतात त्यांनी ही सहा टक्के अडत देण्यास नकार दिला. याशिवाय कांद्यासाठी कमी असलेला दर पाहून शेतकऱ्यांनीही कांदा देण्यास नकार देऊन लिलाव होऊ दिला नाही. सध्या कांद्याला सरासरी प्रति क्विंटल ९०० रुपये भाव आहे. खरीददार अडत देण्यास तयार नसल्याने अडत व्यापारीही कांद्याचा लिलाव करण्यास धजावले नाहीत. पर्यायाने गुरुवारी कांदा मार्केटमध्ये जवळपास एक हजार गोणी कांदा पडून होता.अगोदरच कांद्याला कमी असलेला भाव व त्यात कांदा खरीददारांकडून सहा टक्के अडत वसूल करण्याचे धोरण त्यामुळे खरीददार अडत द्यायला तयार नाहीत. त्यामुळे अडत व्यापाऱ्यांचे सॅण्डविच झाल्याचे अडत व्यापारी पवन ठोंबरे व विशाल गायकवाड यांनी सांगितले. अडतीच्या विषयावर मार्ग निघेपर्यंत मार्केटमध्ये कांदा खरेदी होते की नाही, याबाबत सध्यातरी साशंकता आहे.