शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

शेतकऱ्यांनी पाडला कांद्याचा लिलाव बंद

By admin | Updated: July 15, 2016 01:08 IST

वैजापूर : कांद्याचा घसरलेला भाव व सहा टक्के अडतीमुळे गुरुवारी वैजापूर येथील कांदा मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला.

वैजापूर : कांद्याचा घसरलेला भाव व सहा टक्के अडतीमुळे गुरुवारी वैजापूर येथील कांदा मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला. तसेच खरीददारांकडून सहा टक्के अडत घेण्यात येत असल्याने हा कांदा कोणीच घेतला नाही. परिणामी, कांदा मार्केटमध्ये जवळपास एक हजार गोणी कांदा तसाच पडून राहिला.वैजापूर शहरालगतच्या घायगावनजीक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये जाहीर लिलाव पद्धतीने कांदा खरेदी केली जाते. गुरुवारी मार्केटमध्ये एक हजार कांदा गोणीची आवक होती. यापूर्वी कांदा विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांकडून सहा टक्के अडत वसूल केली जात असे; परंतु शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांऐवजी कांदा खरेदी करणाऱ्यांकडून सहा टक्के अडत वसूल करावी, असे धोरण जाहीर केले. मार्केटमध्ये लिलाव पद्धतीने जे अडत व्यापारी कांदा खरेदी करतात त्यांनी ही सहा टक्के अडत देण्यास नकार दिला. याशिवाय कांद्यासाठी कमी असलेला दर पाहून शेतकऱ्यांनीही कांदा देण्यास नकार देऊन लिलाव होऊ दिला नाही. सध्या कांद्याला सरासरी प्रति क्विंटल ९०० रुपये भाव आहे. खरीददार अडत देण्यास तयार नसल्याने अडत व्यापारीही कांद्याचा लिलाव करण्यास धजावले नाहीत. पर्यायाने गुरुवारी कांदा मार्केटमध्ये जवळपास एक हजार गोणी कांदा पडून होता.अगोदरच कांद्याला कमी असलेला भाव व त्यात कांदा खरीददारांकडून सहा टक्के अडत वसूल करण्याचे धोरण त्यामुळे खरीददार अडत द्यायला तयार नाहीत. त्यामुळे अडत व्यापाऱ्यांचे सॅण्डविच झाल्याचे अडत व्यापारी पवन ठोंबरे व विशाल गायकवाड यांनी सांगितले. अडतीच्या विषयावर मार्ग निघेपर्यंत मार्केटमध्ये कांदा खरेदी होते की नाही, याबाबत सध्यातरी साशंकता आहे.