शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

बीडमध्ये दिवसाआड शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: July 3, 2017 00:57 IST

बीड : जिल्ह्यात नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळलेल्या शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळलेल्या शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच आहे. दिवसेंदिवस हा आकडा फुगत आहे. २०१७ या वर्षात आतापर्यंत ८६ शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ करीत जीवनयात्रा संपविली आहे. विशेष म्हणजे सरासरी काढली तर बीड जिल्ह्यात एका दिवसाआड शेतकरी जीवन संपवित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.बीड जिल्ह्याची ओळख तशी दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून आहे. मागील पाच वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळ पडत आहे. गतवर्षी बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यामुळे शेतकरी सुखावला होता. यातच गारपीट झाल्याने होत्याचे नव्हते झाले. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली पिके जमीनदोस्त झाली. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पिके हातून गेल्याने बँकेचे, सावकारांचे कर्ज कसे फेडायचे, याची चिंता शेतकऱ्यांना लागली होती. शासनाकडून पंचनामे करण्यात आले. मात्र, शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळाली नाही. तसेच जादा नुकसान होऊनही तुटपुंजी मदत देऊन शासन बोळवण करीत असल्याने शेतकरी पुरता वैतागला होता. यातच मुलांचे लग्न उसनवारी, कर्ज काढून केले. घेतलेले पैसे कसे परत करायचे? याची चिंता शेतकऱ्यांना होती.शासनाकडूनही मदतीचे अपेक्षा धूसर झाल्याने शेतकऱ्यासमोरील पळवाटा काढण्याचे सर्व दरवाजे बंद झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ करीत जीवन संपविल्याचे समोर आले आहे. बीड तालुक्यात सर्वाधिक आत्महत्या आहेत. प्रशासनाचे मिशन दिलासा काय करील याकडे लक्ष आहे.