शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
2
चीनच्या शेजारी देशाने प्रचंड सोने घेतले; एवढे महाग असले तरी..., जगातील सर्वात मोठा खरेदीदार ठरला
3
हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
4
भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढली, दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
5
“प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन तपोवनातील वृक्ष तोडण्याचे कारण काय?”: उद्धव ठाकरे
6
विकला जाणार रतन टाटांचा व्हिला, खरेदीसाठी जुन्या मित्रानेच 'इंटरेस्ट' दाखवला; किती कोटी मोजणार?
7
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
8
सोलापूर बसस्थानावरील अस्वच्छतेबाबत आगार व्यवस्थापक निलंबित; प्रताप सरनाईकांचे आदेश
9
उफराटा...! ट्रम्प अमेरिकेत आयकर रद्द करणार, टेरिफ मधून आलेल्या पैशांवर भागवणार; घोडं काय, भाडं काय...
10
China Japan Tensions: जपान आणि चीनमध्ये तणाव वाढला, पंतप्रधानांचं विधान का ठरलं वादाचं कारण?
11
भूकंपासह अनेक मोठी संकट येणार, ज्वालामुखीचा उद्रेक, तीव्र हवामान बदल; बाबा वेंगाची २०२६ साठी भविष्यवाणी
12
बाजारात नफावसुलीचा जोर! एअरटेल-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये जोरदार घसरण; सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
13
बाल्कनीतून डोकावताना तोल गेला, तीन वर्षांचा चिमुकला खाली पडला...; नाशिकमधील घटना
14
भारताने रचण्यास सुरुवात केली 'इंद्रजाल'; पाकिस्तानने मग तुर्कीचा ड्रोन पाठवूदे नाहीतर चीनचा...
15
Sri Lanka Flood : पावसाचं थैमान! श्रीलंकेत भीषण पूर, ५६ जणांचा मृत्यू; ६० जण बेपत्ता, ६०० घरांचं मोठं नुकसान
16
"पैसा सर्वकाही नाही, मन मोठं हवं!"; कंपनीची १,००० कर्मचाऱ्यांसाठी फ्रीमध्ये थेट 'लंडन ट्रिप'
17
"ज्याच्यासाठी आमचं घर फुटलं, तोच माणूस माझ्याशी बेईमान झाला", धनंजय मुंडेंचा चढला पारा, प्रचारसभेत कोणावर 'वार'?
18
“शिवसेना–भाजप ही विचारधारेची युती, अशी युती..."; रवींद्र चव्हाणांना एकनाथ शिंदेंचे उत्तर
19
“३० वर्षांनी ‘मुंबई’चे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये”; राम नाईक यांनी विरोधकांना सुनावले
20
Virat Kohli: कोहली विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर; शतक ठोकताच बनेल क्रिकेटचा हुकमी 'ऐक्का'!
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये दिवसाआड शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: July 3, 2017 00:57 IST

बीड : जिल्ह्यात नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळलेल्या शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळलेल्या शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच आहे. दिवसेंदिवस हा आकडा फुगत आहे. २०१७ या वर्षात आतापर्यंत ८६ शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ करीत जीवनयात्रा संपविली आहे. विशेष म्हणजे सरासरी काढली तर बीड जिल्ह्यात एका दिवसाआड शेतकरी जीवन संपवित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.बीड जिल्ह्याची ओळख तशी दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून आहे. मागील पाच वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळ पडत आहे. गतवर्षी बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यामुळे शेतकरी सुखावला होता. यातच गारपीट झाल्याने होत्याचे नव्हते झाले. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली पिके जमीनदोस्त झाली. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पिके हातून गेल्याने बँकेचे, सावकारांचे कर्ज कसे फेडायचे, याची चिंता शेतकऱ्यांना लागली होती. शासनाकडून पंचनामे करण्यात आले. मात्र, शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळाली नाही. तसेच जादा नुकसान होऊनही तुटपुंजी मदत देऊन शासन बोळवण करीत असल्याने शेतकरी पुरता वैतागला होता. यातच मुलांचे लग्न उसनवारी, कर्ज काढून केले. घेतलेले पैसे कसे परत करायचे? याची चिंता शेतकऱ्यांना होती.शासनाकडूनही मदतीचे अपेक्षा धूसर झाल्याने शेतकऱ्यासमोरील पळवाटा काढण्याचे सर्व दरवाजे बंद झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ करीत जीवन संपविल्याचे समोर आले आहे. बीड तालुक्यात सर्वाधिक आत्महत्या आहेत. प्रशासनाचे मिशन दिलासा काय करील याकडे लक्ष आहे.