शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
4
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
5
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
6
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
7
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
8
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
9
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
10
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
11
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
12
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
13
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
14
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
15
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
16
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
17
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
18
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
19
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
20
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात

बीडमध्ये दिवसाआड शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: July 3, 2017 00:57 IST

बीड : जिल्ह्यात नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळलेल्या शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळलेल्या शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच आहे. दिवसेंदिवस हा आकडा फुगत आहे. २०१७ या वर्षात आतापर्यंत ८६ शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ करीत जीवनयात्रा संपविली आहे. विशेष म्हणजे सरासरी काढली तर बीड जिल्ह्यात एका दिवसाआड शेतकरी जीवन संपवित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.बीड जिल्ह्याची ओळख तशी दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून आहे. मागील पाच वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळ पडत आहे. गतवर्षी बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यामुळे शेतकरी सुखावला होता. यातच गारपीट झाल्याने होत्याचे नव्हते झाले. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली पिके जमीनदोस्त झाली. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पिके हातून गेल्याने बँकेचे, सावकारांचे कर्ज कसे फेडायचे, याची चिंता शेतकऱ्यांना लागली होती. शासनाकडून पंचनामे करण्यात आले. मात्र, शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळाली नाही. तसेच जादा नुकसान होऊनही तुटपुंजी मदत देऊन शासन बोळवण करीत असल्याने शेतकरी पुरता वैतागला होता. यातच मुलांचे लग्न उसनवारी, कर्ज काढून केले. घेतलेले पैसे कसे परत करायचे? याची चिंता शेतकऱ्यांना होती.शासनाकडूनही मदतीचे अपेक्षा धूसर झाल्याने शेतकऱ्यासमोरील पळवाटा काढण्याचे सर्व दरवाजे बंद झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ करीत जीवन संपविल्याचे समोर आले आहे. बीड तालुक्यात सर्वाधिक आत्महत्या आहेत. प्रशासनाचे मिशन दिलासा काय करील याकडे लक्ष आहे.