शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

शेतकरी आत्महत्येचा तपास आता पोलीस उपनिरीक्षकांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:57 IST

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला तात्काळ शासकीय मदत मिळावी यासाठी शेतकरी आत्महत्येच्या कारणांचा तपास आठवड्यात पूर्ण करण्याच्या सूचना शासनाने पोलीस प्रशासनास दिल्या आहेत

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला तात्काळ शासकीय मदत मिळावी यासाठी शेतकरी आत्महत्येच्या कारणांचा तपास आठवड्यात पूर्ण करण्याच्या सूचना शासनाने पोलीस प्रशासनास दिल्या आहेत. त्यामुळे यापुढे शेतकरी आत्महत्येचा तपास पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाºयांकडे असणार आहे.मागील काही वर्षांमध्ये नापिकी व कर्जबाजारीपणामुळे राज्यात शेतकरी आत्महत्येच्या घटना वाढल्या आहेत. कायम दुष्काळी भाग असलेल्या मराठवाड्यात हे प्रमाण सर्वाधिक आहे. जालना जिल्ह्यात २०१६ मध्ये ७६ तर २०१७ मध्ये आॅगस्टअखेर ४४ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील अनेक शेतकरी आत्महत्येचा तपास न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल न मिळणे व अन्य कारणांमुळे अपूर्ण आहे. परिणामी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत मिळालेली नाही. दरम्यान, शेतकरी आत्महत्येच्या घटनेनंतर अनेकदा तपास कामाला विलंब होतो.विष प्राशन केल्याच्या घटनांमध्ये सहा महिने उलटूनही न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोग शाळेचा अहवाल मिळत नाही. शिवाय तपास कामातही विलंब झाल्याने अनेक आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब शासकीय मदतीपासून वंचित राहतात. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी व शेतकºयांच्या प्रश्नांबाबत राज्याच्या कै.वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनअंतर्गत नुकत्याच झालेल्या एका बैठकीत आत्महत्याग्रस्त शेतकºयांना शासनाकडून तात्काळ नुकसान भरपार्ई देण्याच्या सूचना मुख्य सचिवांनी दिल्या होत्या. त्यानुसार गृह विभागाने आदेश पारित केले आहेत. शेतकरी आत्महत्येच्या घटनेननंतर संबंधित ठाण्याचे पोलीस निरीक्षकांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन तपासाबाबत आवश्यक सूचना द्याव्या, न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोग शाळेने दोन दिवसांमध्ये अहवाल सादर करावा, शेतकरी आत्महत्या प्रकरणाच्या तपासाची सर्व कार्यवाही एका आठवड्यात पूर्ण करण्याबाबत पोलीस अधीक्षकांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.