शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
2
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
3
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
4
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
5
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
6
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
7
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
8
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
9
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
10
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
11
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
12
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
13
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
14
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
15
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
16
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
17
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
18
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
19
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
20
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर

शेतकरी आत्महत्येचा तपास आता पोलीस उपनिरीक्षकांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:57 IST

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला तात्काळ शासकीय मदत मिळावी यासाठी शेतकरी आत्महत्येच्या कारणांचा तपास आठवड्यात पूर्ण करण्याच्या सूचना शासनाने पोलीस प्रशासनास दिल्या आहेत

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला तात्काळ शासकीय मदत मिळावी यासाठी शेतकरी आत्महत्येच्या कारणांचा तपास आठवड्यात पूर्ण करण्याच्या सूचना शासनाने पोलीस प्रशासनास दिल्या आहेत. त्यामुळे यापुढे शेतकरी आत्महत्येचा तपास पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाºयांकडे असणार आहे.मागील काही वर्षांमध्ये नापिकी व कर्जबाजारीपणामुळे राज्यात शेतकरी आत्महत्येच्या घटना वाढल्या आहेत. कायम दुष्काळी भाग असलेल्या मराठवाड्यात हे प्रमाण सर्वाधिक आहे. जालना जिल्ह्यात २०१६ मध्ये ७६ तर २०१७ मध्ये आॅगस्टअखेर ४४ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील अनेक शेतकरी आत्महत्येचा तपास न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल न मिळणे व अन्य कारणांमुळे अपूर्ण आहे. परिणामी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत मिळालेली नाही. दरम्यान, शेतकरी आत्महत्येच्या घटनेनंतर अनेकदा तपास कामाला विलंब होतो.विष प्राशन केल्याच्या घटनांमध्ये सहा महिने उलटूनही न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोग शाळेचा अहवाल मिळत नाही. शिवाय तपास कामातही विलंब झाल्याने अनेक आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब शासकीय मदतीपासून वंचित राहतात. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी व शेतकºयांच्या प्रश्नांबाबत राज्याच्या कै.वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनअंतर्गत नुकत्याच झालेल्या एका बैठकीत आत्महत्याग्रस्त शेतकºयांना शासनाकडून तात्काळ नुकसान भरपार्ई देण्याच्या सूचना मुख्य सचिवांनी दिल्या होत्या. त्यानुसार गृह विभागाने आदेश पारित केले आहेत. शेतकरी आत्महत्येच्या घटनेननंतर संबंधित ठाण्याचे पोलीस निरीक्षकांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन तपासाबाबत आवश्यक सूचना द्याव्या, न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोग शाळेने दोन दिवसांमध्ये अहवाल सादर करावा, शेतकरी आत्महत्या प्रकरणाच्या तपासाची सर्व कार्यवाही एका आठवड्यात पूर्ण करण्याबाबत पोलीस अधीक्षकांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.